शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कृषी दिनी पालकमंत्र्यांनी केली शेतात पेरणी

By admin | Updated: July 2, 2015 02:49 IST

येथून आठ किमी अंतरावर डोंगरांच्या कुशीत वसलेल्या ईचोरी या लहानशा गावात पालकमंत्री संजय राठोड यांनी बुधवारी कृषी दिनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या ...

यवतमाळ : येथून आठ किमी अंतरावर डोंगरांच्या कुशीत वसलेल्या ईचोरी या लहानशा गावात पालकमंत्री संजय राठोड यांनी बुधवारी कृषी दिनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या शेतात परिस्थितीअभावी खोळंबलेली पेरणी स्वत: पूर्ण केली. आपल्यासह शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, कुणीही संकटांमुळे आत्महत्येसारखा विचार मनात आणून कुटुंबाला उघड्यावर पाडू नका, अशी भावनिक सादही त्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना घातली. शासनासह सर्व समाजिक, राजकीय संघटनांनी हरितक्रांतीचे प्रणेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष काम करून साजरी केली. ईचोरी येथील अंकुश विनायक खडके या शेतकऱ्याने २६ जानेवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या कुटुंबाला अद्याप शासनाकडून कोणती मदतही मिळाली नाही. संजय राठोड यांनी या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश शिवसैनिकांना दिले होते. कृषी दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री संजय राठोड यांनी दुपारी शेतात जाऊन अंकुशची पत्नी अनसूया, चौथ्या वर्गात शिकत असलेला मुलगा कुणाल यांची विचारपूस करून माहिती जाणून घेतली. कृषी दिनापासून सुरू झालेला शेतात श्रमदान करण्याचा हा उपक्रम २७ जुलैपर्यंत राबविला जाणार आहे.पालकमंत्र्यांसोबत यावेळी जिल्हाप्रमुख बाळासाहेब मुनगीनवार, हरिहर लिंगनवार, राजेंद्र गायकवाड, किशोर इंगळे, उपप्रमुख संजय रंगे, शहर प्रमुख पराग पिंगळे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)