शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी

By admin | Updated: March 7, 2017 01:25 IST

बाजारपेठेत तुरीचे भाव अचानक खाली आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदी केंद्राकडे कल वळविला आहे.

दारव्हा : बाजारपेठेत तुरीचे भाव घसरले, ग्रेडींग व वजनमापासाठी विलंबदारव्हा : बाजारपेठेत तुरीचे भाव अचानक खाली आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदी केंद्राकडे कल वळविला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणचे केंद्र बंद झाल्याने दारव्हा केंद्रही बंद होईल या धास्तीने शेतकऱ्यांची झुंबड वाढली आहे. येथील वखार महामंडळाच्या गोदामाजवळ गत महिनाभरापासून नाफेडच्या तूर खरेदीस सुरूवात झाली आहे. मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने ग्रेडींग व वजनमापासाठी कालावधी लागत आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी केंद्र लवकरच बंद होईल, असे समजून शेतकरी या केंद्रावर गर्दी करत आहे. यामुळे खरेदी केंद्रावरील यंत्रणांवर ताण पडत आहे. यासंदर्भात पुणे येथील पणन संचालक सुनील पवार यांनी सर्व विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सभापती व सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती यांना एफएक्यू दर्जाच्या तुरीची खरेदी करण्यासाठी सध्या तूर खरेदी केंद्र कार्यरत असून प्रत्यक्ष तूर खरेदीचे कामकाज तेथे सुरू आहे. याबाबत शेतकऱ्यांना अवगत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सध्या बाजारपेठेत तीन हजार ८०० ते तीन हजार ९०० या दराने तूर खरेदी केली जात आहे. केंद्र शासनाने तुरीसाठी पाच हजार ५० रुपये प्रती क्विंटल किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. किंमत स्थिरता निधी या योजनेंतर्गत तूर खरेदीसाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य पणन महासंघ मुंबई यांच्या नाफेड या संस्थेची राज्यस्तरीय एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. (प्रतिनिधी)दारव्हा केंद्रावर २५० क्विंटल खरेदीदारव्हा येथील केंद्रावर दररोज जवळपास २५० क्विंटल तूर खरेदी केली जात आहे. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या तुरीमधील ओलाव्याचे प्रमाण १२ टक्केच्या आत असल्याची तपासणी करून घ्यावी, तसेच नाव नोंदणीनंतर दिलेल्या तारखेला आपला माल केंद्रावर आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव सुधीर जाधव यांनी केले आहे.