शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

शेतकरी आत्महत्या निरंकचा दावा

By admin | Updated: September 21, 2016 02:08 IST

राज्यभरात शेतकरी आत्महत्या वाढत असताना बाभूळगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्या निरंक आहे.

बाभूळगावचा आढावा : प्रशासनाचा प्रबोधन प्रयोग यशस्वीयवतमाळ : राज्यभरात शेतकरी आत्महत्या वाढत असताना बाभूळगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्या निरंक आहे. यामुळे जिल्ह्यापुढे एक नवा आदर्श उभा झाला आहे. ११० गावांतील प्रबोधनासह स्थानिक उपाययोजनांमुळे हे यश मिळाल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात उपाययोजना सुरू आहेत. या उपाययोजनांच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्यांमध्ये घट नोंदविण्यात आली आहे. २०१५ मध्ये जिल्ह्यात २६० शेतकरी आत्महत्यांची नोंद करण्यात आली. २०१६ मध्ये १६७ शेतकरी आत्महत्या झाल्या. गतवर्षाच्या तुलनेत यामध्ये ४५ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.बाभूळगाव तालुक्यात २०१५ मध्ये सात शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. २०१६ मध्ये नऊ महिन्यांत आत्महत्येचा आकडा निरंक आहे. तालुक्यातील ११० गावांमध्ये होत असलेल्या सामाजिक प्रबोधनाचा हा भाग असल्याचे मत तहसीलदार दिलीप झाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. जिल्ह्यातील लाभार्थी योजना, स्पर्धा परीक्षा, विवाह मेळावे, शेतीपूरक व्यवसाय, जोडधंदे, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, फळबागा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यातून शेतकरी आत्महत्येचा कल कमी झाला आहे. जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी केवळ बाभूळगाव तालुक्यातच शेतकरी आत्महत्यांमध्ये घट नोंदविण्यात आली. उर्वरित १५ तालुक्यांची स्थिती मात्र अद्यापही जैसे थे असल्याचे दिसून येत आहे.बाभूळगावप्रमाणे संपूर्ण जिल्हा आत्महत्यामुक्त होण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. या माध्यमातून पुढील काळात आशादायी चित्र दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (शहर वार्ताहर)