शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

शेतकरी आत्महत्या निरंकचा दावा

By admin | Updated: September 21, 2016 02:08 IST

राज्यभरात शेतकरी आत्महत्या वाढत असताना बाभूळगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्या निरंक आहे.

बाभूळगावचा आढावा : प्रशासनाचा प्रबोधन प्रयोग यशस्वीयवतमाळ : राज्यभरात शेतकरी आत्महत्या वाढत असताना बाभूळगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्या निरंक आहे. यामुळे जिल्ह्यापुढे एक नवा आदर्श उभा झाला आहे. ११० गावांतील प्रबोधनासह स्थानिक उपाययोजनांमुळे हे यश मिळाल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात उपाययोजना सुरू आहेत. या उपाययोजनांच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्यांमध्ये घट नोंदविण्यात आली आहे. २०१५ मध्ये जिल्ह्यात २६० शेतकरी आत्महत्यांची नोंद करण्यात आली. २०१६ मध्ये १६७ शेतकरी आत्महत्या झाल्या. गतवर्षाच्या तुलनेत यामध्ये ४५ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.बाभूळगाव तालुक्यात २०१५ मध्ये सात शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. २०१६ मध्ये नऊ महिन्यांत आत्महत्येचा आकडा निरंक आहे. तालुक्यातील ११० गावांमध्ये होत असलेल्या सामाजिक प्रबोधनाचा हा भाग असल्याचे मत तहसीलदार दिलीप झाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. जिल्ह्यातील लाभार्थी योजना, स्पर्धा परीक्षा, विवाह मेळावे, शेतीपूरक व्यवसाय, जोडधंदे, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, फळबागा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यातून शेतकरी आत्महत्येचा कल कमी झाला आहे. जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी केवळ बाभूळगाव तालुक्यातच शेतकरी आत्महत्यांमध्ये घट नोंदविण्यात आली. उर्वरित १५ तालुक्यांची स्थिती मात्र अद्यापही जैसे थे असल्याचे दिसून येत आहे.बाभूळगावप्रमाणे संपूर्ण जिल्हा आत्महत्यामुक्त होण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. या माध्यमातून पुढील काळात आशादायी चित्र दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (शहर वार्ताहर)