शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या निरंकचा दावा

By admin | Updated: September 21, 2016 02:08 IST

राज्यभरात शेतकरी आत्महत्या वाढत असताना बाभूळगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्या निरंक आहे.

बाभूळगावचा आढावा : प्रशासनाचा प्रबोधन प्रयोग यशस्वीयवतमाळ : राज्यभरात शेतकरी आत्महत्या वाढत असताना बाभूळगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्या निरंक आहे. यामुळे जिल्ह्यापुढे एक नवा आदर्श उभा झाला आहे. ११० गावांतील प्रबोधनासह स्थानिक उपाययोजनांमुळे हे यश मिळाल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात उपाययोजना सुरू आहेत. या उपाययोजनांच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्यांमध्ये घट नोंदविण्यात आली आहे. २०१५ मध्ये जिल्ह्यात २६० शेतकरी आत्महत्यांची नोंद करण्यात आली. २०१६ मध्ये १६७ शेतकरी आत्महत्या झाल्या. गतवर्षाच्या तुलनेत यामध्ये ४५ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.बाभूळगाव तालुक्यात २०१५ मध्ये सात शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. २०१६ मध्ये नऊ महिन्यांत आत्महत्येचा आकडा निरंक आहे. तालुक्यातील ११० गावांमध्ये होत असलेल्या सामाजिक प्रबोधनाचा हा भाग असल्याचे मत तहसीलदार दिलीप झाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. जिल्ह्यातील लाभार्थी योजना, स्पर्धा परीक्षा, विवाह मेळावे, शेतीपूरक व्यवसाय, जोडधंदे, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, फळबागा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यातून शेतकरी आत्महत्येचा कल कमी झाला आहे. जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी केवळ बाभूळगाव तालुक्यातच शेतकरी आत्महत्यांमध्ये घट नोंदविण्यात आली. उर्वरित १५ तालुक्यांची स्थिती मात्र अद्यापही जैसे थे असल्याचे दिसून येत आहे.बाभूळगावप्रमाणे संपूर्ण जिल्हा आत्महत्यामुक्त होण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. या माध्यमातून पुढील काळात आशादायी चित्र दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (शहर वार्ताहर)