शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

शेतकरी आत्महत्या निरंकचा दावा

By admin | Updated: September 21, 2016 02:08 IST

राज्यभरात शेतकरी आत्महत्या वाढत असताना बाभूळगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्या निरंक आहे.

बाभूळगावचा आढावा : प्रशासनाचा प्रबोधन प्रयोग यशस्वीयवतमाळ : राज्यभरात शेतकरी आत्महत्या वाढत असताना बाभूळगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्या निरंक आहे. यामुळे जिल्ह्यापुढे एक नवा आदर्श उभा झाला आहे. ११० गावांतील प्रबोधनासह स्थानिक उपाययोजनांमुळे हे यश मिळाल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात उपाययोजना सुरू आहेत. या उपाययोजनांच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्यांमध्ये घट नोंदविण्यात आली आहे. २०१५ मध्ये जिल्ह्यात २६० शेतकरी आत्महत्यांची नोंद करण्यात आली. २०१६ मध्ये १६७ शेतकरी आत्महत्या झाल्या. गतवर्षाच्या तुलनेत यामध्ये ४५ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.बाभूळगाव तालुक्यात २०१५ मध्ये सात शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. २०१६ मध्ये नऊ महिन्यांत आत्महत्येचा आकडा निरंक आहे. तालुक्यातील ११० गावांमध्ये होत असलेल्या सामाजिक प्रबोधनाचा हा भाग असल्याचे मत तहसीलदार दिलीप झाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. जिल्ह्यातील लाभार्थी योजना, स्पर्धा परीक्षा, विवाह मेळावे, शेतीपूरक व्यवसाय, जोडधंदे, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, फळबागा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यातून शेतकरी आत्महत्येचा कल कमी झाला आहे. जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी केवळ बाभूळगाव तालुक्यातच शेतकरी आत्महत्यांमध्ये घट नोंदविण्यात आली. उर्वरित १५ तालुक्यांची स्थिती मात्र अद्यापही जैसे थे असल्याचे दिसून येत आहे.बाभूळगावप्रमाणे संपूर्ण जिल्हा आत्महत्यामुक्त होण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. या माध्यमातून पुढील काळात आशादायी चित्र दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (शहर वार्ताहर)