शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

शेतकरी भाकरी बांधून कर्जमाफीच्या केंद्रांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:02 IST

कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी उद्याचा शुक्रवार शेवटचा दिवस आहे. या एका दिवसांत तब्बल दोन लाख शेतकºयांना अर्ज सादर करायचे आहे.

ठळक मुद्देआज शेवटचा दिवस : दिवसभरात दोन लाख अर्ज मार्गी लावण्याचे आव्हान, सर्वच केंद्रांवर स्थिती सारखीच

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी उद्याचा शुक्रवार शेवटचा दिवस आहे. या एका दिवसांत तब्बल दोन लाख शेतकºयांना अर्ज सादर करायचे आहे. कर्जमाफीसाठी जिवाच्या आकांताने हे शेतकरी चक्क भाकरी बांधून आॅनलाईन केंद्रांवर धडकत असल्याचे हृदयद्रावक चित्र जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसून येते.राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली खरी, मात्र अनेक जाचक अटी लादल्या. या अटींमुळे सर्वच शेतकरी त्रस्त आहे. या अटी व अडचणींबाबत विरोधकही मूग गिळून आहे. काही संघटना सतत याविरूद्ध आवाज उठवीतात. मात्र त्यांचा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोहोचतच नाही. यामुळे शेतकरी वैतागले. अनेक शेतकºयांनी तर ‘भीक नको पण कुत्रा आवर’, अशी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.कर्जमाफीमुळे काही प्रमाणात का होईना आपल्या कुटुंबाला आीर्थक अडचणींतून सोडविण्यास हातभार लागेल, या आशेने अनेक शेतकरी आॅनलाईन केंद्रावर कर्जमाफीची अर्ज भरून देण्यासाठी जात आहे. अनेक अडचणींवर मात करून गेल्या ५० दिवसांत जिल्ह्यातील दोन लाख १५ हजार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. मात्र त्यांनाही कर्जमाफी होईल की नाही, याची हुरहुर लागली.आता अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस येऊन ठेपला आहे. शुक्रवार हा शेवटचा दिवस आहे. या एका दिवसांत एक लाख ७३ हजार शेतकºयांना अर्ज भरायचे आहे. मात्र आॅनलाईन केंद्रांची गती मंदावली आहे. परिणामी शेकडो शेतकरी चक्क भाकरी बांधून या केंद्रांवर पोहोचत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बळीराजाची अशी अवहेलना आत्तापर्यंत कधीच झाली नाही. प्रशासन मात्र शेतकºयांमुळेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, या शक्यतेने पोलीस बंदोबस्त लावण्याच्या तयारीत आहे.भारनियमनाची भरआॅनलाईन अर्जाची लिंक फेल असणे, थम्ब स्वीकार न होणे, मोबाईल नंबर नसणे, आधार कार्ड नसणे, आदी बाबींमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे. त्यांना अर्ज भरणे कठीण झाले आहे. आता या अडचणींत भारनियमनाची भर पडली आहे. यातून मार्ग काढत उद्या शुक्रवारी अखेरच्या दिवशी एक लाख ७९ हजार २०५ शेतकºयांना कर्जमाफीचे अर्ज भरण्याचे दीव्य पार पाडावे लागणार आहे.