शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी भाकरी बांधून कर्जमाफीच्या केंद्रांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:02 IST

कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी उद्याचा शुक्रवार शेवटचा दिवस आहे. या एका दिवसांत तब्बल दोन लाख शेतकºयांना अर्ज सादर करायचे आहे.

ठळक मुद्देआज शेवटचा दिवस : दिवसभरात दोन लाख अर्ज मार्गी लावण्याचे आव्हान, सर्वच केंद्रांवर स्थिती सारखीच

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी उद्याचा शुक्रवार शेवटचा दिवस आहे. या एका दिवसांत तब्बल दोन लाख शेतकºयांना अर्ज सादर करायचे आहे. कर्जमाफीसाठी जिवाच्या आकांताने हे शेतकरी चक्क भाकरी बांधून आॅनलाईन केंद्रांवर धडकत असल्याचे हृदयद्रावक चित्र जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसून येते.राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली खरी, मात्र अनेक जाचक अटी लादल्या. या अटींमुळे सर्वच शेतकरी त्रस्त आहे. या अटी व अडचणींबाबत विरोधकही मूग गिळून आहे. काही संघटना सतत याविरूद्ध आवाज उठवीतात. मात्र त्यांचा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोहोचतच नाही. यामुळे शेतकरी वैतागले. अनेक शेतकºयांनी तर ‘भीक नको पण कुत्रा आवर’, अशी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.कर्जमाफीमुळे काही प्रमाणात का होईना आपल्या कुटुंबाला आीर्थक अडचणींतून सोडविण्यास हातभार लागेल, या आशेने अनेक शेतकरी आॅनलाईन केंद्रावर कर्जमाफीची अर्ज भरून देण्यासाठी जात आहे. अनेक अडचणींवर मात करून गेल्या ५० दिवसांत जिल्ह्यातील दोन लाख १५ हजार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. मात्र त्यांनाही कर्जमाफी होईल की नाही, याची हुरहुर लागली.आता अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस येऊन ठेपला आहे. शुक्रवार हा शेवटचा दिवस आहे. या एका दिवसांत एक लाख ७३ हजार शेतकºयांना अर्ज भरायचे आहे. मात्र आॅनलाईन केंद्रांची गती मंदावली आहे. परिणामी शेकडो शेतकरी चक्क भाकरी बांधून या केंद्रांवर पोहोचत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बळीराजाची अशी अवहेलना आत्तापर्यंत कधीच झाली नाही. प्रशासन मात्र शेतकºयांमुळेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, या शक्यतेने पोलीस बंदोबस्त लावण्याच्या तयारीत आहे.भारनियमनाची भरआॅनलाईन अर्जाची लिंक फेल असणे, थम्ब स्वीकार न होणे, मोबाईल नंबर नसणे, आधार कार्ड नसणे, आदी बाबींमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे. त्यांना अर्ज भरणे कठीण झाले आहे. आता या अडचणींत भारनियमनाची भर पडली आहे. यातून मार्ग काढत उद्या शुक्रवारी अखेरच्या दिवशी एक लाख ७९ हजार २०५ शेतकºयांना कर्जमाफीचे अर्ज भरण्याचे दीव्य पार पाडावे लागणार आहे.