शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

अपघात विमा योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित

By admin | Updated: July 23, 2014 23:51 IST

शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या वैयक्तिक अपघात विमा योजनेचा तालुक्यासह जिल्ह्यात बट्ट्याबोळ होत आहे. या अपघात विमा योजनेचा जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला लाभ मिळाला

महागाव : शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या वैयक्तिक अपघात विमा योजनेचा तालुक्यासह जिल्ह्यात बट्ट्याबोळ होत आहे. या अपघात विमा योजनेचा जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला लाभ मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शासनाने स्वत:च्या तिजोरीतून आतपर्यंत कोट्यवधी रुपये विमा कंपन्यांना दिले. परंतु महसूल विभागाच्या उदासीनतेचा फायदा विमा कंपन्यांनी उचलला आहे. शेतकऱ्यांचा नैसर्गिक आपत्ती व अपघातामुळे मृत्यू झाला किंवा कायम अपंगत्व आले तर मदत मिळावी म्हणून शासनाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४ लाख १७ हजार ४०२ शेतकऱ्यांंना अपघात विमा संरक्षण देण्यात आले. मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या या योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात महसूल विभागाला अपयश आले आहे. महसूल विभागाची अनास्था हेरुन विमा कंपन्यांनी या योजनेतून लाभ लाटला आहे. प्रस्ताव सादर केल्यानंतर अनावश्यक त्रुट्या दाखवीत अनेक मृत शेतकऱ्यांना तथा अपघातग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी कृषी विभागावर सोपविली गेली आहे. परंतु महसूल आणि कृषी विभाग या योजनेविषयी पाहिजे तसा सजग नाही. त्यामुळे विमा कंपन्यांनी स्वत:चे उखळ पांढरे केले आहे. जिल्ह्यात वर्षभरात जवळपास एक हजार शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला. अनेक शेतकऱ्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. या शेतकऱ्यांच्या विमा दाव्याचे प्रकरण कंपनीकडे सादर केले. मात्र या प्रस्तावांची दखल घेतली नाही. १५ आॅगस्ट २००७ पासून आतापर्यंत शेकडो प्रकरणे दाखल करण्यात आली. मात्र अनेक प्रकरणे नामंजूर झाली आहे. अमरावती विभागात या योजनेसाठी शासनाने न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीसोबत करार केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ४ लाख १७ हजार ४०२ शेतकऱ्यांचा विमा उतरविण्यात आला होता. मात्र या योजनेतील गौडबंगालामुळे पात्र शेतकरी कुटुंब विम्यापासून वंचित आहे. अनेक लाभार्थ्यांनी पीक विम्यासाठी प्रस्ताव दाखल केले. विविध कागदपत्र गोळा केली. मात्र विमा कंपनीच्या हेकेखोर धोरणामुळे या लाभार्थ्यांना लाभच मिळत नाही. कोट्यवधी रुपयांचा हप्ता घेतल्यानंतरही विमा कंपन्या या शेतकऱ्यांना विविध कारणे सांगून लाभापासून वंचित ठेवत आहे. (तालुका प्रतिनिधी)