शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

दिग्रसमध्ये शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

शनिवारपासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी बैलबंडी व विविध वाहनांद्वारे येथील बाजार समितीत आपला कापूस विक्रीस आणला आहे. मात्र शनिवारपासून एकाही वाहनातील कापसाचे मोजमाप झाले नाही. सोमवारी सकाळपासून कापूस खरेदीला सुरुवात होईल, अशी शेतकऱ्यांना अपे होती. मात्र सकाळपासून खरेदीसाठी बाजार समितीने पुढाकार घेतला नाही. सायंकाळी ५ वाजतापर्यंत या वाहनांकडे कुणीही फिरकले नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला.

ठळक मुद्देशिवाजी चौकात ठिय्या : कापूस खरेदीसाठी प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तीन दिवसांपासून कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी येथील शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांनी कापूस भरून आणलेली वाहने रस्त्यात आडवी लावल्याने वाहतूक विस्कळीत झाली.शनिवारपासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी बैलबंडी व विविध वाहनांद्वारे येथील बाजार समितीत आपला कापूस विक्रीस आणला आहे. मात्र शनिवारपासून एकाही वाहनातील कापसाचे मोजमाप झाले नाही. सोमवारी सकाळपासून कापूस खरेदीला सुरुवात होईल, अशी शेतकऱ्यांना अपे होती. मात्र सकाळपासून खरेदीसाठी बाजार समितीने पुढाकार घेतला नाही. सायंकाळी ५ वाजतापर्यंत या वाहनांकडे कुणीही फिरकले नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला.सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अनेक शेतकऱ्यांनी आपली कापूस भरलेली विविध वाहने शिवाजी चौकात आणली. पुसद-आर्णी मार्गावरील या चौकात ही वाहने आडवी लावण्यात आली. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तब्बल दोन तास पुसद-यवतमाळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र घटनास्थळी बाजार समितीचे कोणतेही अधिकारी व संचालक पोहोचले नाही. अखेर तहसीलदार राजेश वझिरे यांनी घटनास्थळी भेट दिली.तहसीलदारांनी संतप्त शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकºयांनी कापूस खरेदी होत नसल्याने दररोज वाहन भाड्यापोटी एक ते दीड हजार रुपये मोजावे लागत असल्याबद्दल संताप व्यक्त केला. वझिरे यांनी मंगळवारपासून कापूस खरेदी करण्याची ग्वाही दिली. मात्र संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. भाजपचे महादेवराव सुपारे, माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे, मनोज जाधव, विष्णू राठोड, बापुराव पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसीलदारांचा प्रस्ताव फेटाळून लावला. बाजार समितीने कापूस खरेदी बंद असल्याबाबत साधी नोटीसही दिली नसल्याने शेतकºयांनी संताप व्यक्त केला.तहसीलदारांची मध्यस्थी यशस्वीसायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तहसीलदार वझिरे यांनी आंदोलक शेतकºयांची पुन्हा चर्चा केली. या चर्चेत सर्व ट्रॅक्टर आर्णी येथील बाजार समितीत पाठविण्याचा निर्णय झाला. आर्णी येथे सोमवारीच या ट्रॅक्टरमधील कापूस मोजणी करण्याची ग्वाही देण्यात आले. तसेच बैलबंडीतील कापूस मंगळवारी सकाळी खरेदी करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. आंदोलनस्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल यांनी भेट दिली.