शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

दिग्रसमध्ये शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

शनिवारपासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी बैलबंडी व विविध वाहनांद्वारे येथील बाजार समितीत आपला कापूस विक्रीस आणला आहे. मात्र शनिवारपासून एकाही वाहनातील कापसाचे मोजमाप झाले नाही. सोमवारी सकाळपासून कापूस खरेदीला सुरुवात होईल, अशी शेतकऱ्यांना अपे होती. मात्र सकाळपासून खरेदीसाठी बाजार समितीने पुढाकार घेतला नाही. सायंकाळी ५ वाजतापर्यंत या वाहनांकडे कुणीही फिरकले नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला.

ठळक मुद्देशिवाजी चौकात ठिय्या : कापूस खरेदीसाठी प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तीन दिवसांपासून कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी येथील शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांनी कापूस भरून आणलेली वाहने रस्त्यात आडवी लावल्याने वाहतूक विस्कळीत झाली.शनिवारपासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी बैलबंडी व विविध वाहनांद्वारे येथील बाजार समितीत आपला कापूस विक्रीस आणला आहे. मात्र शनिवारपासून एकाही वाहनातील कापसाचे मोजमाप झाले नाही. सोमवारी सकाळपासून कापूस खरेदीला सुरुवात होईल, अशी शेतकऱ्यांना अपे होती. मात्र सकाळपासून खरेदीसाठी बाजार समितीने पुढाकार घेतला नाही. सायंकाळी ५ वाजतापर्यंत या वाहनांकडे कुणीही फिरकले नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला.सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अनेक शेतकऱ्यांनी आपली कापूस भरलेली विविध वाहने शिवाजी चौकात आणली. पुसद-आर्णी मार्गावरील या चौकात ही वाहने आडवी लावण्यात आली. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तब्बल दोन तास पुसद-यवतमाळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र घटनास्थळी बाजार समितीचे कोणतेही अधिकारी व संचालक पोहोचले नाही. अखेर तहसीलदार राजेश वझिरे यांनी घटनास्थळी भेट दिली.तहसीलदारांनी संतप्त शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकºयांनी कापूस खरेदी होत नसल्याने दररोज वाहन भाड्यापोटी एक ते दीड हजार रुपये मोजावे लागत असल्याबद्दल संताप व्यक्त केला. वझिरे यांनी मंगळवारपासून कापूस खरेदी करण्याची ग्वाही दिली. मात्र संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. भाजपचे महादेवराव सुपारे, माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे, मनोज जाधव, विष्णू राठोड, बापुराव पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसीलदारांचा प्रस्ताव फेटाळून लावला. बाजार समितीने कापूस खरेदी बंद असल्याबाबत साधी नोटीसही दिली नसल्याने शेतकºयांनी संताप व्यक्त केला.तहसीलदारांची मध्यस्थी यशस्वीसायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तहसीलदार वझिरे यांनी आंदोलक शेतकºयांची पुन्हा चर्चा केली. या चर्चेत सर्व ट्रॅक्टर आर्णी येथील बाजार समितीत पाठविण्याचा निर्णय झाला. आर्णी येथे सोमवारीच या ट्रॅक्टरमधील कापूस मोजणी करण्याची ग्वाही देण्यात आले. तसेच बैलबंडीतील कापूस मंगळवारी सकाळी खरेदी करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. आंदोलनस्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल यांनी भेट दिली.