शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दिग्रसमध्ये शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

शनिवारपासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी बैलबंडी व विविध वाहनांद्वारे येथील बाजार समितीत आपला कापूस विक्रीस आणला आहे. मात्र शनिवारपासून एकाही वाहनातील कापसाचे मोजमाप झाले नाही. सोमवारी सकाळपासून कापूस खरेदीला सुरुवात होईल, अशी शेतकऱ्यांना अपे होती. मात्र सकाळपासून खरेदीसाठी बाजार समितीने पुढाकार घेतला नाही. सायंकाळी ५ वाजतापर्यंत या वाहनांकडे कुणीही फिरकले नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला.

ठळक मुद्देशिवाजी चौकात ठिय्या : कापूस खरेदीसाठी प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तीन दिवसांपासून कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी येथील शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांनी कापूस भरून आणलेली वाहने रस्त्यात आडवी लावल्याने वाहतूक विस्कळीत झाली.शनिवारपासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी बैलबंडी व विविध वाहनांद्वारे येथील बाजार समितीत आपला कापूस विक्रीस आणला आहे. मात्र शनिवारपासून एकाही वाहनातील कापसाचे मोजमाप झाले नाही. सोमवारी सकाळपासून कापूस खरेदीला सुरुवात होईल, अशी शेतकऱ्यांना अपे होती. मात्र सकाळपासून खरेदीसाठी बाजार समितीने पुढाकार घेतला नाही. सायंकाळी ५ वाजतापर्यंत या वाहनांकडे कुणीही फिरकले नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला.सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अनेक शेतकऱ्यांनी आपली कापूस भरलेली विविध वाहने शिवाजी चौकात आणली. पुसद-आर्णी मार्गावरील या चौकात ही वाहने आडवी लावण्यात आली. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तब्बल दोन तास पुसद-यवतमाळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र घटनास्थळी बाजार समितीचे कोणतेही अधिकारी व संचालक पोहोचले नाही. अखेर तहसीलदार राजेश वझिरे यांनी घटनास्थळी भेट दिली.तहसीलदारांनी संतप्त शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकºयांनी कापूस खरेदी होत नसल्याने दररोज वाहन भाड्यापोटी एक ते दीड हजार रुपये मोजावे लागत असल्याबद्दल संताप व्यक्त केला. वझिरे यांनी मंगळवारपासून कापूस खरेदी करण्याची ग्वाही दिली. मात्र संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. भाजपचे महादेवराव सुपारे, माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे, मनोज जाधव, विष्णू राठोड, बापुराव पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसीलदारांचा प्रस्ताव फेटाळून लावला. बाजार समितीने कापूस खरेदी बंद असल्याबाबत साधी नोटीसही दिली नसल्याने शेतकºयांनी संताप व्यक्त केला.तहसीलदारांची मध्यस्थी यशस्वीसायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तहसीलदार वझिरे यांनी आंदोलक शेतकºयांची पुन्हा चर्चा केली. या चर्चेत सर्व ट्रॅक्टर आर्णी येथील बाजार समितीत पाठविण्याचा निर्णय झाला. आर्णी येथे सोमवारीच या ट्रॅक्टरमधील कापूस मोजणी करण्याची ग्वाही देण्यात आले. तसेच बैलबंडीतील कापूस मंगळवारी सकाळी खरेदी करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. आंदोलनस्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल यांनी भेट दिली.