शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आर्णीत तूर खरेदीसाठी शेतकऱ्याची वीरूगिरी

By admin | Updated: March 3, 2017 01:59 IST

येथील शासकीय तूर खरेदी केंद्र बंद झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी मुख्य मार्गावर

रास्ता रोको : केंद्र सुरू करण्याची मागणी आर्णी : येथील शासकीय तूर खरेदी केंद्र बंद झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर एका शेतकऱ्याने वीरूगिरी करीत टॉवरवर चढून केंद्र सुरू करण्याची मागणी केली. गेल्या १५ फेब्रुवारीपासून येथील शासकीय तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातच पडून आहे. १५ दिवसांपासून तूर खरेदी झाली नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. या संतापातूनच बुधवारी अनेक शेतकऱ्यांनी येथील मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान ठाणेदार संजय खंदाडे यांनी घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर शेतकरी बाजार समितीच्या प्रांगणात पोहोचले. तेथे विजय ढाले, सचिन यलगंधेवार आदींसह काही शेतकऱ्यांनी टॉवरवर चढून तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली. यावेळी बाजार समितीचे सभापती राजू पाटील, निवासी तहसीलदार आर.जी. मांडवकर, राजू बुटले आदींनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. येत्या ८ मार्चपासून तूर खरेदीची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)