शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

यवतमाळ जिल्ह्यातील बळीराजाने अखेर जनावरे पिकात सोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 14:57 IST

महागाव तालुक्याच्या बोरी(इजारा) येथील शेतकरी बाळू राठोड यांनी पिकांमध्ये जनावरे सोडली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाबीजसह इतर काही कंपन्यांची बियाणे निकृष्ट निघाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फटका बसला. बियाणे उगवलीच नसल्याने पेरणीचा पैसा व्यर्थ गेला. हे संकट टळत नाही तोच सततच्या पावसाने शेती पिके पिवळी पडू लागली आहेत. घरात काहीच सोयाबीन येणार नसल्याची चिन्हे दिसू लागल्याने उभ्या पिकामध्ये जनावरे सोडण्याचा प्रकार यवतमाळ जिल्ह्यात घडला आहे.पिवळे पडलेले सोयाबीन, कपाशीच्या पात्या गळत असल्याचे डोळ्यासमोर दिसत आहे. सुरुवातीला पीक परिस्थिती उत्तम असताना नेमके काय घडले याचे कारण शोधत असताना बराचवेळ निघून गेला. कृषी विभागाकडून सर्वेक्षण होवून नुकसान भरपाई मिळेल ही आशा ठेवून या विभागाला पत्र दिले. मात्र साधी दखलही घेतली गेली नाही. यामुळे महागाव तालुक्याच्या बोरी(इजारा) येथील शेतकरी बाळू राठोड यांनी पिकांमध्ये जनावरे सोडली.काळूलालनगरचे विनोद चव्हाण, मादणी गावातील विकास गर्जे, नायगावचे नंदू चाौधरी आदी शेतकऱ्यांनी लोकमतकडे आपली व्यथा मांडली. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबालाही या अस्मानी संकटाला पुन्हा सामोरे जावे लागत आहे. निकृष्ट बियाण्यांची मदतही नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पदरात पडली नाही. यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.

टॅग्स :agricultureशेती