शहरं
Join us  
Trending Stories
1
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
2
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
5
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
6
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
7
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
8
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
9
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
10
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
11
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
12
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
13
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
14
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
15
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
16
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
17
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
18
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
19
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
20
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   

शासनाच्या निष्क्रियतेने शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 22:24 IST

उमरखेड येथील शेतकरी माधवराव रावते यांची आत्महत्या दडपण्यासाठी शासनाने क्रौर्याची परिसीमा गाठली. घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील शेतकरी शंकर चायरे आणि टिटवी येथील प्रकाश मानगावकर यांची आत्महत्याही बेदखल ठरविली. शासनाच्या निष्क्रयेतेमुळे शेतकरी आत्महत्या होत असून सरकार आणि प्रशासनाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

ठळक मुद्देविखे पाटील : सावळेश्वर, राजूरवाडीला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड/घाटंजी : उमरखेड येथील शेतकरी माधवराव रावते यांची आत्महत्या दडपण्यासाठी शासनाने क्रौर्याची परिसीमा गाठली. घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील शेतकरी शंकर चायरे आणि टिटवी येथील प्रकाश मानगावकर यांची आत्महत्याही बेदखल ठरविली. शासनाच्या निष्क्रयेतेमुळे शेतकरी आत्महत्या होत असून सरकार आणि प्रशासनाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर व घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी त्यांनी रविवारी या दोन्ही गावांना भेट दिली. सावळेश्वर हे गाव मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतल्यामुळे सरकार रावतेंची आत्महत्या दडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. कर्जमाफी आणि बोंडअळीची मदत न मिळाल्याने रावते यांनी आत्महत्या केली. मात्र सरकार पुरावे दडविण्याचा प्रयत्न करीत असून हा अपघात असल्याचा खटाटोप करीत आहे. विखे यांनी रावते कुटुंबाला एक लाख मदतीचा धनादेश दिला. यावेळी माजी आमदार विजय खडसे, जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते राम देवसरकर, तातू देशमुख, भागवत देवसरकर, दत्तराव शिंदे उपस्थित होते.समाजातील सर्व घटक सरकारला कंटाळलेघाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त चायरे कुटुंबाची राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतली. तेथे शेतकरी आत्महत्या, शेतमालाचे पडलेले भाव, वाढती गुन्हेगारी यासह प्रत्येकच क्षेत्रात विद्यमान सरकार सपशेल अपयशी ठरले असून समाजातील सर्वच घटक या सरकारला कंटाळल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था असून गेल्या चार वर्षात शेतमालाचे भाव अर्ध्यावर आले. कर्जमाफीचा लाभ तुरळक शेतकºयांना मिळाला. गुलाबी बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना अद्याप शासनाने जाहीर केलेली भरपाई मिळाली नाही. शेतकरी थेट सरकार व पंतप्रधानांचे नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या करीत आहेत. यावरूनच या सरकार विरोधात किती असंतोष आहे, ते स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले. त्यांनी राजूरवाडी येथे मृत शेतकरी शंकर चायरे व प्रकाश मानगावकर यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. दोन्ही कुटुंबांना काँग्रेसतर्फे प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्याची ग्वाही दिली. शिवाय कुटुंबातील मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी त्यांनी स्विकारली. यावेळी माजी आमदार विजय खडसे, शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार, सैय्यद रफिक बाबू, संजय निकडे, शालिक चवरडोल, संजय डंभारे, गजानन पाथोडे, गोपाल उमरे, रोहितसिंग सिद्धू आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते