शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या निष्क्रियतेने शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 22:24 IST

उमरखेड येथील शेतकरी माधवराव रावते यांची आत्महत्या दडपण्यासाठी शासनाने क्रौर्याची परिसीमा गाठली. घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील शेतकरी शंकर चायरे आणि टिटवी येथील प्रकाश मानगावकर यांची आत्महत्याही बेदखल ठरविली. शासनाच्या निष्क्रयेतेमुळे शेतकरी आत्महत्या होत असून सरकार आणि प्रशासनाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

ठळक मुद्देविखे पाटील : सावळेश्वर, राजूरवाडीला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड/घाटंजी : उमरखेड येथील शेतकरी माधवराव रावते यांची आत्महत्या दडपण्यासाठी शासनाने क्रौर्याची परिसीमा गाठली. घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील शेतकरी शंकर चायरे आणि टिटवी येथील प्रकाश मानगावकर यांची आत्महत्याही बेदखल ठरविली. शासनाच्या निष्क्रयेतेमुळे शेतकरी आत्महत्या होत असून सरकार आणि प्रशासनाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर व घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी त्यांनी रविवारी या दोन्ही गावांना भेट दिली. सावळेश्वर हे गाव मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतल्यामुळे सरकार रावतेंची आत्महत्या दडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. कर्जमाफी आणि बोंडअळीची मदत न मिळाल्याने रावते यांनी आत्महत्या केली. मात्र सरकार पुरावे दडविण्याचा प्रयत्न करीत असून हा अपघात असल्याचा खटाटोप करीत आहे. विखे यांनी रावते कुटुंबाला एक लाख मदतीचा धनादेश दिला. यावेळी माजी आमदार विजय खडसे, जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते राम देवसरकर, तातू देशमुख, भागवत देवसरकर, दत्तराव शिंदे उपस्थित होते.समाजातील सर्व घटक सरकारला कंटाळलेघाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त चायरे कुटुंबाची राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतली. तेथे शेतकरी आत्महत्या, शेतमालाचे पडलेले भाव, वाढती गुन्हेगारी यासह प्रत्येकच क्षेत्रात विद्यमान सरकार सपशेल अपयशी ठरले असून समाजातील सर्वच घटक या सरकारला कंटाळल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था असून गेल्या चार वर्षात शेतमालाचे भाव अर्ध्यावर आले. कर्जमाफीचा लाभ तुरळक शेतकºयांना मिळाला. गुलाबी बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना अद्याप शासनाने जाहीर केलेली भरपाई मिळाली नाही. शेतकरी थेट सरकार व पंतप्रधानांचे नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या करीत आहेत. यावरूनच या सरकार विरोधात किती असंतोष आहे, ते स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले. त्यांनी राजूरवाडी येथे मृत शेतकरी शंकर चायरे व प्रकाश मानगावकर यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. दोन्ही कुटुंबांना काँग्रेसतर्फे प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्याची ग्वाही दिली. शिवाय कुटुंबातील मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी त्यांनी स्विकारली. यावेळी माजी आमदार विजय खडसे, शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार, सैय्यद रफिक बाबू, संजय निकडे, शालिक चवरडोल, संजय डंभारे, गजानन पाथोडे, गोपाल उमरे, रोहितसिंग सिद्धू आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते