शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

शासनाच्या निष्क्रियतेने शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 22:24 IST

उमरखेड येथील शेतकरी माधवराव रावते यांची आत्महत्या दडपण्यासाठी शासनाने क्रौर्याची परिसीमा गाठली. घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील शेतकरी शंकर चायरे आणि टिटवी येथील प्रकाश मानगावकर यांची आत्महत्याही बेदखल ठरविली. शासनाच्या निष्क्रयेतेमुळे शेतकरी आत्महत्या होत असून सरकार आणि प्रशासनाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

ठळक मुद्देविखे पाटील : सावळेश्वर, राजूरवाडीला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड/घाटंजी : उमरखेड येथील शेतकरी माधवराव रावते यांची आत्महत्या दडपण्यासाठी शासनाने क्रौर्याची परिसीमा गाठली. घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील शेतकरी शंकर चायरे आणि टिटवी येथील प्रकाश मानगावकर यांची आत्महत्याही बेदखल ठरविली. शासनाच्या निष्क्रयेतेमुळे शेतकरी आत्महत्या होत असून सरकार आणि प्रशासनाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर व घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी त्यांनी रविवारी या दोन्ही गावांना भेट दिली. सावळेश्वर हे गाव मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतल्यामुळे सरकार रावतेंची आत्महत्या दडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. कर्जमाफी आणि बोंडअळीची मदत न मिळाल्याने रावते यांनी आत्महत्या केली. मात्र सरकार पुरावे दडविण्याचा प्रयत्न करीत असून हा अपघात असल्याचा खटाटोप करीत आहे. विखे यांनी रावते कुटुंबाला एक लाख मदतीचा धनादेश दिला. यावेळी माजी आमदार विजय खडसे, जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते राम देवसरकर, तातू देशमुख, भागवत देवसरकर, दत्तराव शिंदे उपस्थित होते.समाजातील सर्व घटक सरकारला कंटाळलेघाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त चायरे कुटुंबाची राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतली. तेथे शेतकरी आत्महत्या, शेतमालाचे पडलेले भाव, वाढती गुन्हेगारी यासह प्रत्येकच क्षेत्रात विद्यमान सरकार सपशेल अपयशी ठरले असून समाजातील सर्वच घटक या सरकारला कंटाळल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था असून गेल्या चार वर्षात शेतमालाचे भाव अर्ध्यावर आले. कर्जमाफीचा लाभ तुरळक शेतकºयांना मिळाला. गुलाबी बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना अद्याप शासनाने जाहीर केलेली भरपाई मिळाली नाही. शेतकरी थेट सरकार व पंतप्रधानांचे नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या करीत आहेत. यावरूनच या सरकार विरोधात किती असंतोष आहे, ते स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले. त्यांनी राजूरवाडी येथे मृत शेतकरी शंकर चायरे व प्रकाश मानगावकर यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. दोन्ही कुटुंबांना काँग्रेसतर्फे प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्याची ग्वाही दिली. शिवाय कुटुंबातील मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी त्यांनी स्विकारली. यावेळी माजी आमदार विजय खडसे, शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार, सैय्यद रफिक बाबू, संजय निकडे, शालिक चवरडोल, संजय डंभारे, गजानन पाथोडे, गोपाल उमरे, रोहितसिंग सिद्धू आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते