शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

खान्देशातील शेतकऱ्याने फुलविली तिवसा येथे शेती

By admin | Updated: December 21, 2015 02:40 IST

शेतकरी आत्महत्येमुळे यवतमाळ जिल्हा संपूर्ण देशात संवेदनशील झाला आहे. या भागातील तरूण पिढी शेतीपासून दूर जात आहे.

टरबूज लागवडीचा प्रयोग : ३०० टन उत्पादन, २० एकरात सौर फेन्सिंग, मल्चिंग पेपरचा वापररूपेश उत्तरवार  यवतमाळशेतकरी आत्महत्येमुळे यवतमाळ जिल्हा संपूर्ण देशात संवेदनशील झाला आहे. या भागातील तरूण पिढी शेतीपासून दूर जात आहे. या स्थितीत खान्देशातील शेतकऱ्याने माळरानावर हिरवी चादर फुलविली आहे. २० एकरात टरबूज आणि खरबुजाची लागवड केली आहे. हे पीक काढणीला आले आहे. ३०० टन उत्पादनाची शक्यता आहे. या शेतकऱ्याला २४ लाख रूपयांचे टरबूज होण्याची शक्यता आहे. यासाठी त्यांनी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. माळरानावर शेती यशस्वी केली आहे. इच्छाशक्ती असेल तर कुठलीच बाब अशक्य नसल्याचे खान्देशातील शेतकऱ्याने सिद्ध केले आहे.यवतमाळ-दारव्हा मार्गावर १८ किलोमीटर अंतरावर तिवसा गाव आहे. या ठिकाणी संपूर्ण माळरान ओसाड आणि रखरखले आहे. काही किलोमीटरपर्यंत पाण्याचा थेंबही नाही. अशा विपरित परिस्थितीवर मात करीत खान्देशातील अनिल चौधरी या शेतकऱ्याने चंद्रकांत गणेडीवाल यांच्या शेतातील २० एकरात टरबूज आणि खरबुजाची शेती फुलवली आहे.या माळरानालगतचा संपूर्ण परिसर ओसाड पडला आहे. या ठिकाणी पाण्याचा थेंबही नाही. याकरिता त्यांनी एक किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन आणली आहे. शेतशिवारात सिंचनाची व्यवस्था केली आहे. कमी पाण्यात अधिक ओलित करता यावे म्हणून ठिबक सिंचनाचा वापर त्यांनी केला आहे. ओसाड माळरानाच्या दगडावर ही शेती फुलविण्यात आली आहे. सरीवरंबा पद्धतीने टरबूज आणि खरबुजाची लागवड त्यांनी केली आहे. धरणाचा गाळ आणि माती टाकून त्यांनी बियाणे लावले. यासाठी चौधरी यांना राजेश राठोड हा तरुण मदत करतोय. संपूर्ण २० एकर परिसराला नियंत्रित करण्यासाठी ८ वॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. या ठिकाणावरून पाण्याचे नियंत्रण करण्यात आले आहे. खताचे व्यवस्थापन या माध्यमातून करण्यात आले आहे. जंगली प्राण्यापासून संरक्षण मिळावे म्हणून तार कम्पाउंड करण्यात आले आहे. त्याला सौरउर्जेच्या विजेने तारकुंपणाला संरक्षित करण्यात आले आहे. माळरानावरील लाल मातीत टरबुजाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. ८० हजार रोप त्यांनी लावले आहे. एका झाडाला तीन टरबूज याप्रमाणे ८० हजार रोपांपासून ३०० टन टरबूज निघण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या दरानुसार यातून २४ लाख रूपयांचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यासोबतच अंतरपीक म्हणून सुबाभळीची लागवड केली आहे. २० एकरात ४० हजार सुबाभळीचे झाडे लावली आहेत. त्यासाठी कंपनीशी करारही करण्यात आला आहे.