शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
5
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
6
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
7
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
8
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
9
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
10
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
11
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
12
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
13
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
14
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
15
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
16
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
17
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
18
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
19
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
20
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश

खान्देशातील शेतकऱ्याने फुलविली तिवसा येथे शेती

By admin | Updated: December 21, 2015 02:40 IST

शेतकरी आत्महत्येमुळे यवतमाळ जिल्हा संपूर्ण देशात संवेदनशील झाला आहे. या भागातील तरूण पिढी शेतीपासून दूर जात आहे.

टरबूज लागवडीचा प्रयोग : ३०० टन उत्पादन, २० एकरात सौर फेन्सिंग, मल्चिंग पेपरचा वापररूपेश उत्तरवार  यवतमाळशेतकरी आत्महत्येमुळे यवतमाळ जिल्हा संपूर्ण देशात संवेदनशील झाला आहे. या भागातील तरूण पिढी शेतीपासून दूर जात आहे. या स्थितीत खान्देशातील शेतकऱ्याने माळरानावर हिरवी चादर फुलविली आहे. २० एकरात टरबूज आणि खरबुजाची लागवड केली आहे. हे पीक काढणीला आले आहे. ३०० टन उत्पादनाची शक्यता आहे. या शेतकऱ्याला २४ लाख रूपयांचे टरबूज होण्याची शक्यता आहे. यासाठी त्यांनी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. माळरानावर शेती यशस्वी केली आहे. इच्छाशक्ती असेल तर कुठलीच बाब अशक्य नसल्याचे खान्देशातील शेतकऱ्याने सिद्ध केले आहे.यवतमाळ-दारव्हा मार्गावर १८ किलोमीटर अंतरावर तिवसा गाव आहे. या ठिकाणी संपूर्ण माळरान ओसाड आणि रखरखले आहे. काही किलोमीटरपर्यंत पाण्याचा थेंबही नाही. अशा विपरित परिस्थितीवर मात करीत खान्देशातील अनिल चौधरी या शेतकऱ्याने चंद्रकांत गणेडीवाल यांच्या शेतातील २० एकरात टरबूज आणि खरबुजाची शेती फुलवली आहे.या माळरानालगतचा संपूर्ण परिसर ओसाड पडला आहे. या ठिकाणी पाण्याचा थेंबही नाही. याकरिता त्यांनी एक किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन आणली आहे. शेतशिवारात सिंचनाची व्यवस्था केली आहे. कमी पाण्यात अधिक ओलित करता यावे म्हणून ठिबक सिंचनाचा वापर त्यांनी केला आहे. ओसाड माळरानाच्या दगडावर ही शेती फुलविण्यात आली आहे. सरीवरंबा पद्धतीने टरबूज आणि खरबुजाची लागवड त्यांनी केली आहे. धरणाचा गाळ आणि माती टाकून त्यांनी बियाणे लावले. यासाठी चौधरी यांना राजेश राठोड हा तरुण मदत करतोय. संपूर्ण २० एकर परिसराला नियंत्रित करण्यासाठी ८ वॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. या ठिकाणावरून पाण्याचे नियंत्रण करण्यात आले आहे. खताचे व्यवस्थापन या माध्यमातून करण्यात आले आहे. जंगली प्राण्यापासून संरक्षण मिळावे म्हणून तार कम्पाउंड करण्यात आले आहे. त्याला सौरउर्जेच्या विजेने तारकुंपणाला संरक्षित करण्यात आले आहे. माळरानावरील लाल मातीत टरबुजाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. ८० हजार रोप त्यांनी लावले आहे. एका झाडाला तीन टरबूज याप्रमाणे ८० हजार रोपांपासून ३०० टन टरबूज निघण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या दरानुसार यातून २४ लाख रूपयांचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यासोबतच अंतरपीक म्हणून सुबाभळीची लागवड केली आहे. २० एकरात ४० हजार सुबाभळीचे झाडे लावली आहेत. त्यासाठी कंपनीशी करारही करण्यात आला आहे.