शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

प्रसिद्ध उमर्डा नर्सरीतील मौल्यवान चंदन नामशेष

By admin | Updated: November 16, 2015 02:20 IST

चंदनासाठी यवतमाळ वनपरिक्षेत्रातील उमर्डा नर्सरी प्रसिद्ध आहे. परंतु तस्कर आणि वन अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताने येथील चंदन नामशेष झाले आहे.

डोळा सागवानावर : संगनमताने तस्करीत वाढसोनखास : चंदनासाठी यवतमाळ वनपरिक्षेत्रातील उमर्डा नर्सरी प्रसिद्ध आहे. परंतु तस्कर आणि वन अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताने येथील चंदन नामशेष झाले आहे. आता तस्करांचा डोळा शिल्लक राहिलेल्या सागवानावर आहे. येत्या काही वर्षात उरले सुरले सागवानही गायब होणार, अशी शक्यता आहे. गेल्या २५ वर्षांपूर्वी वन विभागातील एका होतकरू अधिकाऱ्याने उमर्डा नर्सरी येथे चंदनाची हजारो झाडे लावली होती. त्याचे संगोपनही व्यवस्थितरित्या करण्यात आले होते. मात्र चंदनाची झाडे मोठी होताच त्यावर तस्करांची वक्रदृष्टी पडली. चंदन तस्करीमधून लाखो रुपयांची कमाई तस्करांनी केली. उमरठा नर्सरीमधील चंदन परराज्यातील तस्करांनी तोडून नेले. यामध्ये अनेक तस्कर वन विभागाच्या हातीही लागले. मात्र तस्करांनी अधिकाऱ्यांनाही आपल्या जाळ्यात ओढून पाहता पाहता संपूर्ण चंदन नष्ट केले. सध्या स्थितीत उमरठा नर्सरीत काही मोजकीच चंदनाची झाडे शिल्लक आहे. हे सर्व चंदन वन विभागातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमतानेच तस्करांनी नष्ट केले. सध्या यवतमाळ व परिसरात फार मोठ्या क्षेत्रामध्ये सागवान वृक्ष आहे. या सागवानाची तस्करीही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. गेल्या तीन महिन्यात तस्करीच्या मोठ्या घटना घडल्या आहे. यामध्ये वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी सामिल असल्याने प्रकरणाची चौकशी पारदर्शकपणे होत नाही. त्यामुळेच तस्करांचेही फावत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास उमरठा नर्सरीच नव्हेतर जिल्हाभरातूनच सागवान वृक्षांचा नायनाट होण्याची शक्यता आहे. वृक्षतोडीने पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला असून वृक्षतोड गुन्हा आहे, तरीही शासन व वन विभागाचे अधिकारी गुन्हेगारांच्या बाबतीत मवाळ भूमिका घेत असल्याचे दिसते. यवतमाळ, लासीना, सोनखास या परिसरात तस्करांकडून मालकी सर्वेनंबरमधील सागवान मोठ्या प्रमाणात तोडले जात आहे. त्यासोबतच वन विभागाच्या हद्दीतील सागवान तोडून परस्पर विकले जात आहे. गेल्या काही दिवसात लासिना (टेकडी), पिंपरी इजारा, जांबवाडी व चिचबर्डी परिसरातून मोठ्या प्रमाणात सागवान तस्करी झाली. तस्कर मात्र अजूनही मोकाट आहेत. शासनाने या गंभीर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)