शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुंगोली वेकोलिच्या विळख्यात

By admin | Updated: September 11, 2015 02:51 IST

तालुक्याच्या अंतिम टोकावर वसलेले मुंगोली गाव चोहोबाजूंनी वेकोलिच्या विळख्यात सापडले आहे.

पुनर्वसन रखडले : गावकरी करताहेत समस्यांचा सामना, २0 वर्षांपासून पदरी निराशाचवणी : तालुक्याच्या अंतिम टोकावर वसलेले मुंगोली गाव चोहोबाजूंनी वेकोलिच्या विळख्यात सापडले आहे. गेल्या २० वर्षांपासून गावकरी भयभीत अवस्थेत गावात वास्तव्य करीत आहे. या गावाचे पुनर्वसन करण्याची गावकऱ्यांची मागणी २० वर्षात वेकोलिकडून पूर्ण झाली नाही. त्यामुळे आता गावकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार हाती घेण्याचे ठरवून येत्या १५ सप्टेंबरला रस्ता रोको आंदोलन करून वेकोलिचे काम बंद पाडण्याचा इशारा दिला आहे.वर्धा नदीच्या खोऱ्यात व वणी-कोरपना तालुक्याच्या सीमा रेषेवर असलेल्या मुंगोली गावाजवळ २0 वर्षांपूर्वी सन १९९४ मध्ये मुंगोली व निर्गुडा कोळसा खाण वेकोलिने सुरू केल्या. त्यासाठी तेथील ७० टक्के शेतकऱ्यांच्या शेती वेकोलिने विकत घेतल्या. मात्र उर्वरित ३० टक्के शेतकऱ्यांच्या शेती न घेतल्याने त्या शेतकऱ्यांना अद्यापही गाव सोडता आले नाही. गावापासून काहीच अंतरावर कोळसा खाणी असल्याने खाणीत होणाऱ्या स्फोटाचे धक्के गावाला बसतात. कोळसा खाणींतील स्फोटांमुळे गावातील अनेकांच्या घरांना तडे गेले आहेत. काही घरे कधीही कोसळू शकतात, या भीतीखाली गावकरी गावात राहात आहे. मुंगोली गावाच्या पूर्वेस वर्धा नदी, पश्चिमेस १०० मीटर अंतरावर वेकोलिची कोळसा खाण, उत्तरेस वेकोलिच्या कैलासनगर वसाहतीच्या शौचालयाचे साचलेले घाण पाणी व दक्षिणेस ८० मीटर अंतरावर वेकोलिने टाकलेले मातीचे ढिगारे, असे चारही बाजूनी गाव कचाट्यात सापडले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने जीव मुठीत धरून व वळसा घालून मार्गक्रमण करावे लागत आहे.खाणीतील स्फोटांच्या धुळीमुळे व उष्णतेमुळे या परिसरातील शेतातील पिकांची वाढ खुटते. सोबतच शेती अनुत्पादक होत आहे. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांची उर्वरित शेती वेकोलिने खरेदी करावी व गावाचे पुनर्वसन शिंदोला गावाजवळ करावे, अशी मागणी गावकरी सतत करीत आले आहे. ग्रामपंचायतीनेही तसा ठराव करून प्रशासनाला व वेकोलिला दिला आहे. मात्र त्याकडे सतत दुर्लक्षच होत आहे. वेकोलिने तत्कालीन खासदार हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत १५ डिसेंबर २०१५ पर्यंत गावाचे पुनर्वसन करण्याचा करारनामा करून दिला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. पालकमंत्री संजय राठोड यांनी वणीला जनता दरबार घेतला होता. त्यावेळीही माजी सरपंच बाबाराव ठाकरे यांनी मुंगोली गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न मांडला होता. त्यावेळी राठोड यांनी गावाची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिल्या होत्या.त्यानुसार महसूल अधिकाऱ्यांनी गावाजवळचे कोळसा काढण्याचे काम वेकोलिने थांबवावे, अशी सूचना वेकोलिला दिली होती. मात्र वेकोलिने काम थांबविले नाही. उलट ७ सप्टेंबरासून वाढीव कामाला सुरूवात केली आहे. त्यामुळे गावकरी आता अधिकच भयभीत झाले आहे. गावकऱ्यांना नरकात राहत असल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे आता १५ सप्टेंबरपासून वेकोलिचे काम बंद पाडण्याचा इशारा सरपंच रूपेश ठाकरे व ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)