शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

उमरखेड समस्यांच्या विळख्यात

By admin | Updated: April 19, 2016 06:14 IST

विकासाचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या नगरपरिषदेतील पदाधिकाऱ्यांनी शहराकडे कमालीचे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे

उमरखेड : विकासाचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या नगरपरिषदेतील पदाधिकाऱ्यांनी शहराकडे कमालीचे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अस्वच्छतेसह शहरात विविध समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. या विरोधात नागरिक वारंवार ओरड करीत असले तरी नगरपरिषद प्रशासन मात्र लक्ष द्यायला तयार नाही. शहरात बनविण्यात आलेल्या सिमेंट नाल्या, रस्त्याच्या कामातील अनियमितता, शहरातील विविध प्रभागातील स्वच्छता आदी समस्या गेल्या अनेक दिवसांपासून कायम आहे. आता या समस्या ऐरणीवर आल्या आहे. त्याविरोधात जनक्षोभ वाढत असून नगरपरिषदेने वेळीच दखल न घेतल्यास मोठे आंदोलन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या संदर्भात महिला आघाडी ग्राहक संरक्षण संस्थेने नुकतेच नगराध्यक्षांना निवेदनसुद्धा दिले आहे. विशेष म्हणजे दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात विविध कामे सुरू आहेत. ही विकास कामे योग्य दिशेने व्हावी, यासाठी महिला आघाडी ग्राहक संरक्षण संस्थेने प्रयत्न सुरू केले आहे. शहरात बनविण्यात आलेल्या सिमेंट नाल्या निकृष्ठ बांधण्यात आल्या आहे. कोणत्याही क्षणी ढासळतील, अशी या नाल्यांची स्थिती आहे. सिमेंट रस्ता कामामध्ये अनियमितता असल्याने गिट्टी, मुरूम अल्प प्रमाणात वापरण्यात आले. त्यातून हे रस्ते थातूरमातूर पद्धतीने बनविण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. नवीन गल्ली व वॉर्डात डांबरी रस्ते करण्यात आले. त्या कामात आॅईलचे प्रमाण डांबरात वापरून गैरप्रकार झाला, असे म्हटले आहे. शहरातील नाल्यांची नियमितपणे सफाई होत नाही. शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. यावर आवर घालणे गरजेचे आहे. कचरागाड्या सामान्य लोकांच्या घरांपर्यंत जात नाही. काही प्रमुख वॉर्ड सोडले तर कित्येक वॉर्डात साफसफाई होत नाही. नाथनगर, रेणुकानगर आणि आदर्शनगर या ठिकाणी वेळेवर पाणीपुरवठा केला जात नाही. लिकेजेस अद्यापही काढण्यात आलेले नाही. रेणुकानगरात खड्डे खोदून ठेवले. मात्र काम पूर्णत्वास गेलेले नाही. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने शहरात धूर फवारणी होणे अत्यंत गरजेचे आहे. ग्राहक संरक्षण संस्थेकडून अनेकदा पाठपुरावा केल्यानंतरही उपाययोजना होत नाही, असे महिला आघाडी ग्राहक संरक्षण संस्थेच्या जिल्हाध्यक्ष वंदना चव्हाण, तालुकाध्यक्ष ज्योती भंडारे, शहराध्यक्ष सुजाता बोलजवार, विजयंता टिंगरे, सुचिता वाघ, अनिता जोशी, ज्योती गिरी, सीमा झाडे, उज्ज्वला आडे, नंदा कदम, माया बोंतले, सुचिता सुरोसे, वंदना बोंडे, प्रा.डॉ. उषा पाटील यांनी म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)