शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

उमरखेड समस्यांच्या विळख्यात

By admin | Updated: April 19, 2016 06:14 IST

विकासाचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या नगरपरिषदेतील पदाधिकाऱ्यांनी शहराकडे कमालीचे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे

उमरखेड : विकासाचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या नगरपरिषदेतील पदाधिकाऱ्यांनी शहराकडे कमालीचे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अस्वच्छतेसह शहरात विविध समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. या विरोधात नागरिक वारंवार ओरड करीत असले तरी नगरपरिषद प्रशासन मात्र लक्ष द्यायला तयार नाही. शहरात बनविण्यात आलेल्या सिमेंट नाल्या, रस्त्याच्या कामातील अनियमितता, शहरातील विविध प्रभागातील स्वच्छता आदी समस्या गेल्या अनेक दिवसांपासून कायम आहे. आता या समस्या ऐरणीवर आल्या आहे. त्याविरोधात जनक्षोभ वाढत असून नगरपरिषदेने वेळीच दखल न घेतल्यास मोठे आंदोलन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या संदर्भात महिला आघाडी ग्राहक संरक्षण संस्थेने नुकतेच नगराध्यक्षांना निवेदनसुद्धा दिले आहे. विशेष म्हणजे दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात विविध कामे सुरू आहेत. ही विकास कामे योग्य दिशेने व्हावी, यासाठी महिला आघाडी ग्राहक संरक्षण संस्थेने प्रयत्न सुरू केले आहे. शहरात बनविण्यात आलेल्या सिमेंट नाल्या निकृष्ठ बांधण्यात आल्या आहे. कोणत्याही क्षणी ढासळतील, अशी या नाल्यांची स्थिती आहे. सिमेंट रस्ता कामामध्ये अनियमितता असल्याने गिट्टी, मुरूम अल्प प्रमाणात वापरण्यात आले. त्यातून हे रस्ते थातूरमातूर पद्धतीने बनविण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. नवीन गल्ली व वॉर्डात डांबरी रस्ते करण्यात आले. त्या कामात आॅईलचे प्रमाण डांबरात वापरून गैरप्रकार झाला, असे म्हटले आहे. शहरातील नाल्यांची नियमितपणे सफाई होत नाही. शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. यावर आवर घालणे गरजेचे आहे. कचरागाड्या सामान्य लोकांच्या घरांपर्यंत जात नाही. काही प्रमुख वॉर्ड सोडले तर कित्येक वॉर्डात साफसफाई होत नाही. नाथनगर, रेणुकानगर आणि आदर्शनगर या ठिकाणी वेळेवर पाणीपुरवठा केला जात नाही. लिकेजेस अद्यापही काढण्यात आलेले नाही. रेणुकानगरात खड्डे खोदून ठेवले. मात्र काम पूर्णत्वास गेलेले नाही. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने शहरात धूर फवारणी होणे अत्यंत गरजेचे आहे. ग्राहक संरक्षण संस्थेकडून अनेकदा पाठपुरावा केल्यानंतरही उपाययोजना होत नाही, असे महिला आघाडी ग्राहक संरक्षण संस्थेच्या जिल्हाध्यक्ष वंदना चव्हाण, तालुकाध्यक्ष ज्योती भंडारे, शहराध्यक्ष सुजाता बोलजवार, विजयंता टिंगरे, सुचिता वाघ, अनिता जोशी, ज्योती गिरी, सीमा झाडे, उज्ज्वला आडे, नंदा कदम, माया बोंतले, सुचिता सुरोसे, वंदना बोंडे, प्रा.डॉ. उषा पाटील यांनी म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)