शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

By admin | Updated: May 2, 2017 00:05 IST

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहे. शेतीला जोडव्यवसायाची साथ देवून क्लस्टर आधारित योजना नव्याने सुरू होत आहे.

महाराष्ट्र दिन : शेतकऱ्यांना पुढे नेण्यासाठी लोकसहभाग आवश्यकयवतमाळ : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहे. शेतीला जोडव्यवसायाची साथ देवून क्लस्टर आधारित योजना नव्याने सुरू होत आहे. या योजना राबवितानाच शेतकऱ्यांना सक्षमपणे पुढे नेण्यासाठी लोकसहभागही आवश्यक आहे, असे पालकमंत्री मदन येरावार यांनी सांगितले.महाराष्ट्र दिनानिमित्त येथील पोस्टल मैदानावर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. यावेळी ते बोलत होते. प्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, नगराध्यक्ष कांचन चौधरी यांच्यासह लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक उपस्थित होते.सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सेवा हमी कायदा आणल्याने कालमर्यादेत कामे होवू लागली आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्ह्याचे रबी क्षेत्र दुपटीने वाढले. यवतमाळ शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ३०२ कोटीची योजना मंजूर झाली. सांडपाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी १४५ कोटींची अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना मंजूर झाली असून, लवकरच ती कार्यान्वित होईल. धडक सिंचन विहिरी योजनेंतर्गत अतिरिक्त विहिरी मंजूर झाल्या आहेत. वीज जोडण्यासाठी १५५ कोटी उपलब्ध होत आहे. फिडर विलगीकरणासाठीही ७५ कोटींचा प्रस्ताव आहे. मार्च २०१८ पर्यंत मागेल त्याला २४ तासात वीज कनेक्शन दिले जातील. यवतमाळात अंडरग्राऊंड वीज वाहिनीचे काम सुरु झाले असून पुसद, वणी, पांढरकवडा, उमरखेड येथेही असे प्रस्ताव तयार केल्या जात आहे. राज्यात सौर उर्जेचे तीन प्रकल्प उभारले जात असून, त्यातील एक प्रकल्प अकोलाबाजारजवळ मांजर्डा येथे उभा राहत आहे. रेल्वे मार्गाचे भूसंपादन गतीने सुरू आहे. थेट खरेदीने चार पटीपेक्षा मोबदला शेतकऱ्यांना दिला जात आहे. समृध्दी महामार्ग शेतकऱ्यांच्या मालाला चांगली बाजारपेठ मिळून देण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे ना.येरावार म्हणाले. शेतकऱ्यांना शेतीत विविध प्रकारच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांचीही माहिती त्यांनी दिली. तूर खरेदीसाठी बाजार हस्तक्षेप योजना राबविण्यात येत आहे. खरेदीसाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. खरेदीच्या नावावर व्यापार होवू दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी टिपेश्वर, पैनगंगा, सहस्त्रकुंड, चिंतामणी देवस्थान कळंब, संकटमोचन ही स्थळे विकसित होत असून यासाठी निधी मंजूर झाला असल्याचे ना. मदन येरावार यांनी यावेळी सांगितले.ध्वजारोहनानंतर पोलीस व विविध दलाच्यावतीने पथसंचलन करून मानवंदना देण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. (वार्ताहर)