शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

By admin | Updated: May 2, 2017 00:05 IST

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहे. शेतीला जोडव्यवसायाची साथ देवून क्लस्टर आधारित योजना नव्याने सुरू होत आहे.

महाराष्ट्र दिन : शेतकऱ्यांना पुढे नेण्यासाठी लोकसहभाग आवश्यकयवतमाळ : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहे. शेतीला जोडव्यवसायाची साथ देवून क्लस्टर आधारित योजना नव्याने सुरू होत आहे. या योजना राबवितानाच शेतकऱ्यांना सक्षमपणे पुढे नेण्यासाठी लोकसहभागही आवश्यक आहे, असे पालकमंत्री मदन येरावार यांनी सांगितले.महाराष्ट्र दिनानिमित्त येथील पोस्टल मैदानावर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. यावेळी ते बोलत होते. प्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, नगराध्यक्ष कांचन चौधरी यांच्यासह लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक उपस्थित होते.सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सेवा हमी कायदा आणल्याने कालमर्यादेत कामे होवू लागली आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्ह्याचे रबी क्षेत्र दुपटीने वाढले. यवतमाळ शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ३०२ कोटीची योजना मंजूर झाली. सांडपाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी १४५ कोटींची अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना मंजूर झाली असून, लवकरच ती कार्यान्वित होईल. धडक सिंचन विहिरी योजनेंतर्गत अतिरिक्त विहिरी मंजूर झाल्या आहेत. वीज जोडण्यासाठी १५५ कोटी उपलब्ध होत आहे. फिडर विलगीकरणासाठीही ७५ कोटींचा प्रस्ताव आहे. मार्च २०१८ पर्यंत मागेल त्याला २४ तासात वीज कनेक्शन दिले जातील. यवतमाळात अंडरग्राऊंड वीज वाहिनीचे काम सुरु झाले असून पुसद, वणी, पांढरकवडा, उमरखेड येथेही असे प्रस्ताव तयार केल्या जात आहे. राज्यात सौर उर्जेचे तीन प्रकल्प उभारले जात असून, त्यातील एक प्रकल्प अकोलाबाजारजवळ मांजर्डा येथे उभा राहत आहे. रेल्वे मार्गाचे भूसंपादन गतीने सुरू आहे. थेट खरेदीने चार पटीपेक्षा मोबदला शेतकऱ्यांना दिला जात आहे. समृध्दी महामार्ग शेतकऱ्यांच्या मालाला चांगली बाजारपेठ मिळून देण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे ना.येरावार म्हणाले. शेतकऱ्यांना शेतीत विविध प्रकारच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांचीही माहिती त्यांनी दिली. तूर खरेदीसाठी बाजार हस्तक्षेप योजना राबविण्यात येत आहे. खरेदीसाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. खरेदीच्या नावावर व्यापार होवू दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी टिपेश्वर, पैनगंगा, सहस्त्रकुंड, चिंतामणी देवस्थान कळंब, संकटमोचन ही स्थळे विकसित होत असून यासाठी निधी मंजूर झाला असल्याचे ना. मदन येरावार यांनी यावेळी सांगितले.ध्वजारोहनानंतर पोलीस व विविध दलाच्यावतीने पथसंचलन करून मानवंदना देण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. (वार्ताहर)