शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

जनावरांची तस्करी रोखण्यात अपयश

By admin | Updated: July 25, 2016 00:45 IST

येथून जाणाऱ्या नागपूर-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गाने जनावरांची तस्करी सुरूच असून नियमितपणे

नागपूरकडून येतात वाहने :  तीन महिन्यांत सहा ट्रक पकडले नरेश मानकर पांढरकवडा येथून जाणाऱ्या नागपूर-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गाने जनावरांची तस्करी सुरूच असून नियमितपणे मोठ्या प्रमाणावर होणारी ही तस्करी रोखण्यास प्रशासन असमर्थ ठरले आहे. महाराष्ट्र राज्यात गोहत्या व गोवंश हत्याबंदी लागू झाल्यानंतरही हैद्राबादच्या कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणावर नियमितपणे जनावरे नेल्या जात आहेत. गोहत्या व गोवंश हत्याबंदी कायदा झाल्यानंतर गोवंश तस्करी बंद होण्याऐवजी वाढतच आहे. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणीच होत नसल्याचे दिसून येत आहे. ज्यांच्यावर ही तस्करी रोखण्याची जबाबदारी आहे, त्यांच्यातीलच काही मंडळीची या तस्करीला मुकसंमती असल्याचे वास्तव आता उघड झाले आहे. पिंपळखुटी चेकपोस्टवरील एका प्रकरणात दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर या प्रकरणात कारवाईसुद्धा करण्यात आली. गेल्या तीन महिन्यात आत्तापर्यंत हैैद्राबादच्या कत्तलखान्यात कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे जवळपास सहा ट्रक पिंपळखुटी चेकपोस्टवर पकडले. शेकडो जनावरांना जीवदान दिले. तरीदेखील जनावरांची तस्करी सुरूच असून नियमितपणे ट्रकव्दारे हैदाबादच्या कत्तलखान्याकडे जनावरे नेली जात आहे. गेल्या १८ जुलै रोजी हैद्राबादच्या कत्तलखान्याकडे ३० जनावरे घेऊन जाणारा ट्रक पिंपळखुटी चेकपोस्टजवळ पकडला. या ३० जनावरांपैकी १२ जनावरांचा ट्रकमध्येच मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा २२ जुलै रोजी हैद्राबादकडे नऊ जनावरांना घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला. आता पुन्हा शनिवारी कोपामांडवीजवळ कत्तलखान्यात पायदळ नेण्यात येत असलेली १४ जनावरे पकडली असून ही जनावरे गोरक्षण मंडळाच्या सुपुर्द करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले. जनावरांच्या तस्करीला आळा न बसता जनावरांची तस्करी सतत सुरूच आहे. त्यामुळे पशूधनच संकटात सापडले आहे. प्रशासन मात्र मुग गिळून गप्प बसले असून या प्रकाराकडे गंभीरतेने पाहत नसल्याचा आरोप विविध संघटनांनी केला आहे. याचा निषेध म्हणून शुक्रवारी विविध संघटनेतर्फे राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळखुटी येथे चक्काजाम आंदोलन देखील करण्यात आले. गोवंश हत्याबंदी कायदा लागू होऊनही मोठ्या प्रमाणावर ट्रकव्दारे कत्तलीसाठी जनावरे नेण्यात येतात. गोवंशाची तस्करी कमी होण्याऐवजी वाढतच आहे. यासाठी पोलीस व आर.टी.ओ. विभाग जबाबदार असल्याचा आरोपही या संघटनांनी केला आहे. विशेष म्हणजे मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणावर ट्रकव्दारे जनावरांची तस्करी होत असतांना हे ट्रक मधात कुठेच अडविल्या जात नाही. पोलीस आणि आर.टी.ओ.विभाग काही मोजक्याच ट्रकवर कारवाई करतात. गोवंशाची हत्या व वाहतूक रोखण्यासाठी राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यांना व परिवहन विभागालासुद्धा आदेश दिले असतांना जनावरे भरलेली वाहने नागपूर शहरातून निघून तेलंगणाच्या सिमेपर्यंत येतातच कशी, हा संशोधनाचा विषय आहे. मध्यप्रदेशातून नागपूरमार्गे जनावरे भरून येणारे ट्रक बिनधास्तपणे तेलंगणात कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याने पोलिसांनी महामार्गावर तपासणी मोहिम राबविली असून अशी वाहने अडवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली आहे. तरीही पोलिसांची नजर चुकवून अनेक ट्रक तेलंगणातील कत्तलखान्यात जात आहे. प्रशासन चिरीमिरीत मश्गुल, जनावरांचा जातोय जीव गोहत्या प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करताना कोणतीही अडचण आल्यास सामाजिकसंघटना, लोकप्रतिनिधींची मदत प्रशासनाने घ्यावयास पाहिजे. परंतु या गंभीर प्रश्नाकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. या अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई होत नसल्यामुळे जनावरे खरेदी करणाऱ्यांची आणि त्यांच्या दलालांची हिम्मत वाढली आहे. ही जनावरे खरेदी करून तेलंगणात नेणाऱ्या तस्करांच्या असभ्य व दहशतवादी कारवायांमुळे सामान्य नागरिक घाबरत आहे. प्रशासनातील मंडळी मात्र चिरीमिरीच्या लोभात गंभीरपणे लक्ष घालून कठोर कारवाई करण्यास तयार नाही. याबाबत येथील नागरिकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देऊन या गंभीर प्रकाराची दखल घेण्याची मागणी केली होती. तथापी प्रशासनाने अद्याप पाहिजे तशी कोणतीही दखल घेतली नाही. परिणामी राष्ट्रीय महामार्गाने हैद्राबादला कत्तलखान्यात जाणारी जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकाराला तातडीने आळा घालण्याची मागणी आता सर्वस्तरातून होत आहे.