शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांची तस्करी रोखण्यात अपयश

By admin | Updated: July 25, 2016 00:45 IST

येथून जाणाऱ्या नागपूर-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गाने जनावरांची तस्करी सुरूच असून नियमितपणे

नागपूरकडून येतात वाहने :  तीन महिन्यांत सहा ट्रक पकडले नरेश मानकर पांढरकवडा येथून जाणाऱ्या नागपूर-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गाने जनावरांची तस्करी सुरूच असून नियमितपणे मोठ्या प्रमाणावर होणारी ही तस्करी रोखण्यास प्रशासन असमर्थ ठरले आहे. महाराष्ट्र राज्यात गोहत्या व गोवंश हत्याबंदी लागू झाल्यानंतरही हैद्राबादच्या कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणावर नियमितपणे जनावरे नेल्या जात आहेत. गोहत्या व गोवंश हत्याबंदी कायदा झाल्यानंतर गोवंश तस्करी बंद होण्याऐवजी वाढतच आहे. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणीच होत नसल्याचे दिसून येत आहे. ज्यांच्यावर ही तस्करी रोखण्याची जबाबदारी आहे, त्यांच्यातीलच काही मंडळीची या तस्करीला मुकसंमती असल्याचे वास्तव आता उघड झाले आहे. पिंपळखुटी चेकपोस्टवरील एका प्रकरणात दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर या प्रकरणात कारवाईसुद्धा करण्यात आली. गेल्या तीन महिन्यात आत्तापर्यंत हैैद्राबादच्या कत्तलखान्यात कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे जवळपास सहा ट्रक पिंपळखुटी चेकपोस्टवर पकडले. शेकडो जनावरांना जीवदान दिले. तरीदेखील जनावरांची तस्करी सुरूच असून नियमितपणे ट्रकव्दारे हैदाबादच्या कत्तलखान्याकडे जनावरे नेली जात आहे. गेल्या १८ जुलै रोजी हैद्राबादच्या कत्तलखान्याकडे ३० जनावरे घेऊन जाणारा ट्रक पिंपळखुटी चेकपोस्टजवळ पकडला. या ३० जनावरांपैकी १२ जनावरांचा ट्रकमध्येच मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा २२ जुलै रोजी हैद्राबादकडे नऊ जनावरांना घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला. आता पुन्हा शनिवारी कोपामांडवीजवळ कत्तलखान्यात पायदळ नेण्यात येत असलेली १४ जनावरे पकडली असून ही जनावरे गोरक्षण मंडळाच्या सुपुर्द करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले. जनावरांच्या तस्करीला आळा न बसता जनावरांची तस्करी सतत सुरूच आहे. त्यामुळे पशूधनच संकटात सापडले आहे. प्रशासन मात्र मुग गिळून गप्प बसले असून या प्रकाराकडे गंभीरतेने पाहत नसल्याचा आरोप विविध संघटनांनी केला आहे. याचा निषेध म्हणून शुक्रवारी विविध संघटनेतर्फे राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळखुटी येथे चक्काजाम आंदोलन देखील करण्यात आले. गोवंश हत्याबंदी कायदा लागू होऊनही मोठ्या प्रमाणावर ट्रकव्दारे कत्तलीसाठी जनावरे नेण्यात येतात. गोवंशाची तस्करी कमी होण्याऐवजी वाढतच आहे. यासाठी पोलीस व आर.टी.ओ. विभाग जबाबदार असल्याचा आरोपही या संघटनांनी केला आहे. विशेष म्हणजे मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणावर ट्रकव्दारे जनावरांची तस्करी होत असतांना हे ट्रक मधात कुठेच अडविल्या जात नाही. पोलीस आणि आर.टी.ओ.विभाग काही मोजक्याच ट्रकवर कारवाई करतात. गोवंशाची हत्या व वाहतूक रोखण्यासाठी राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यांना व परिवहन विभागालासुद्धा आदेश दिले असतांना जनावरे भरलेली वाहने नागपूर शहरातून निघून तेलंगणाच्या सिमेपर्यंत येतातच कशी, हा संशोधनाचा विषय आहे. मध्यप्रदेशातून नागपूरमार्गे जनावरे भरून येणारे ट्रक बिनधास्तपणे तेलंगणात कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याने पोलिसांनी महामार्गावर तपासणी मोहिम राबविली असून अशी वाहने अडवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली आहे. तरीही पोलिसांची नजर चुकवून अनेक ट्रक तेलंगणातील कत्तलखान्यात जात आहे. प्रशासन चिरीमिरीत मश्गुल, जनावरांचा जातोय जीव गोहत्या प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करताना कोणतीही अडचण आल्यास सामाजिकसंघटना, लोकप्रतिनिधींची मदत प्रशासनाने घ्यावयास पाहिजे. परंतु या गंभीर प्रश्नाकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. या अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई होत नसल्यामुळे जनावरे खरेदी करणाऱ्यांची आणि त्यांच्या दलालांची हिम्मत वाढली आहे. ही जनावरे खरेदी करून तेलंगणात नेणाऱ्या तस्करांच्या असभ्य व दहशतवादी कारवायांमुळे सामान्य नागरिक घाबरत आहे. प्रशासनातील मंडळी मात्र चिरीमिरीच्या लोभात गंभीरपणे लक्ष घालून कठोर कारवाई करण्यास तयार नाही. याबाबत येथील नागरिकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देऊन या गंभीर प्रकाराची दखल घेण्याची मागणी केली होती. तथापी प्रशासनाने अद्याप पाहिजे तशी कोणतीही दखल घेतली नाही. परिणामी राष्ट्रीय महामार्गाने हैद्राबादला कत्तलखान्यात जाणारी जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकाराला तातडीने आळा घालण्याची मागणी आता सर्वस्तरातून होत आहे.