शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

सरकारी शाळांमध्ये सुविधांची बोंबाबोंब

By admin | Updated: July 11, 2015 00:11 IST

जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना असुविधांचा सामना करावा लागत आहे.

संगणक संच धूळ खात : जिल्हा परिषद शाळांमधून विद्यार्थ्यांची गळतीकळंब : जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. अलीकडे काही वर्षातील विद्यार्थ्यांची आकडेवारी पाहिल्यास जिल्हा परिषदेच्या शाळांवरील पालकांचा विश्वास उडत असल्याचे दिसून येते. परिणामी विद्यार्थ्यांची होणारी गळती ही शिक्षणतज्ज्ञांसाठी चिंतेची बाब झाली आहे.ग्रामीण भागात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची रोडावणारी संख्या ही तफावत अधोरेखित करणारी आहे. बहुतांश शाळांमध्ये शौचालय, विद्युत पुरवठा, अपंगांसाठी रॅम्प, खेळांचे मैदान यांचा अभाव आहे. शाळेला पुरविण्यात आलेले संगणकही शोभेची वस्तू ठरले आहे. याला काही शाळा अपवाद असतीलही. पण शाळा तपासणीसाठी कोणी आला तरच संगणकावरील धुळ झटकली जाते, ही वास्तविकता नाकारता येणार नाही. एवढेच नव्हे, तर अजूनही काही शाळांना संगणकाची प्रतीक्षा आहे. यासाठी ते लोकप्रतिनिधींकडे वांरवार मागणी करीत आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तालुक्यातील बहुतांश शाळांमध्ये किचन शेडच नाही. जेथे आहे त्याची अवस्था बिकट आहे. फार कमी शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. कुठल्याही शाळेत पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था नाही. गणवेश वाटपामध्येही नेहमीच विलंब होतो. यावरून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पायाभूत सुविधांची अवस्था बिकट असल्याचे स्पष्ट होते. मागील पाच वर्षांची आकडेवारी पाहिल्यास पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी पटसंख्या रोडावत चालल्याचे दिसून येते. याउलट खासगी शाळांमध्ये भरमसाठ फी असतानाही विद्यार्थ्यांनी संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षक पालकांचा विश्वास गमावत आहे, असे म्हणावे लागेल. विद्यार्थी संख्या रोडावण्याऱ्या मुलभूत कारणांची कारणमिमांसा करण्यात शिक्षण विभाग कमी पडत आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. दुसरीकडे शिक्षकवर्गही केवळ पगारासाठी येतात, विद्यार्थ्यांप्रती त्यांची खास बांधिलकी नसते, असा आरोपही पालकातून होत आहे. ही स्थिती कायम राहिल्यास येणाऱ्या काळात फार मोठ्या प्रमाणात शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. (तालुका प्रतिनिधी)