शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी शाळांमध्ये सुविधांची बोंबाबोंब

By admin | Updated: July 11, 2015 00:11 IST

जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना असुविधांचा सामना करावा लागत आहे.

संगणक संच धूळ खात : जिल्हा परिषद शाळांमधून विद्यार्थ्यांची गळतीकळंब : जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. अलीकडे काही वर्षातील विद्यार्थ्यांची आकडेवारी पाहिल्यास जिल्हा परिषदेच्या शाळांवरील पालकांचा विश्वास उडत असल्याचे दिसून येते. परिणामी विद्यार्थ्यांची होणारी गळती ही शिक्षणतज्ज्ञांसाठी चिंतेची बाब झाली आहे.ग्रामीण भागात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची रोडावणारी संख्या ही तफावत अधोरेखित करणारी आहे. बहुतांश शाळांमध्ये शौचालय, विद्युत पुरवठा, अपंगांसाठी रॅम्प, खेळांचे मैदान यांचा अभाव आहे. शाळेला पुरविण्यात आलेले संगणकही शोभेची वस्तू ठरले आहे. याला काही शाळा अपवाद असतीलही. पण शाळा तपासणीसाठी कोणी आला तरच संगणकावरील धुळ झटकली जाते, ही वास्तविकता नाकारता येणार नाही. एवढेच नव्हे, तर अजूनही काही शाळांना संगणकाची प्रतीक्षा आहे. यासाठी ते लोकप्रतिनिधींकडे वांरवार मागणी करीत आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तालुक्यातील बहुतांश शाळांमध्ये किचन शेडच नाही. जेथे आहे त्याची अवस्था बिकट आहे. फार कमी शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. कुठल्याही शाळेत पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था नाही. गणवेश वाटपामध्येही नेहमीच विलंब होतो. यावरून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पायाभूत सुविधांची अवस्था बिकट असल्याचे स्पष्ट होते. मागील पाच वर्षांची आकडेवारी पाहिल्यास पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी पटसंख्या रोडावत चालल्याचे दिसून येते. याउलट खासगी शाळांमध्ये भरमसाठ फी असतानाही विद्यार्थ्यांनी संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षक पालकांचा विश्वास गमावत आहे, असे म्हणावे लागेल. विद्यार्थी संख्या रोडावण्याऱ्या मुलभूत कारणांची कारणमिमांसा करण्यात शिक्षण विभाग कमी पडत आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. दुसरीकडे शिक्षकवर्गही केवळ पगारासाठी येतात, विद्यार्थ्यांप्रती त्यांची खास बांधिलकी नसते, असा आरोपही पालकातून होत आहे. ही स्थिती कायम राहिल्यास येणाऱ्या काळात फार मोठ्या प्रमाणात शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. (तालुका प्रतिनिधी)