शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

सरकारी शाळांमध्ये सुविधांची बोंबाबोंब

By admin | Updated: July 11, 2015 00:11 IST

जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना असुविधांचा सामना करावा लागत आहे.

संगणक संच धूळ खात : जिल्हा परिषद शाळांमधून विद्यार्थ्यांची गळतीकळंब : जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. अलीकडे काही वर्षातील विद्यार्थ्यांची आकडेवारी पाहिल्यास जिल्हा परिषदेच्या शाळांवरील पालकांचा विश्वास उडत असल्याचे दिसून येते. परिणामी विद्यार्थ्यांची होणारी गळती ही शिक्षणतज्ज्ञांसाठी चिंतेची बाब झाली आहे.ग्रामीण भागात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची रोडावणारी संख्या ही तफावत अधोरेखित करणारी आहे. बहुतांश शाळांमध्ये शौचालय, विद्युत पुरवठा, अपंगांसाठी रॅम्प, खेळांचे मैदान यांचा अभाव आहे. शाळेला पुरविण्यात आलेले संगणकही शोभेची वस्तू ठरले आहे. याला काही शाळा अपवाद असतीलही. पण शाळा तपासणीसाठी कोणी आला तरच संगणकावरील धुळ झटकली जाते, ही वास्तविकता नाकारता येणार नाही. एवढेच नव्हे, तर अजूनही काही शाळांना संगणकाची प्रतीक्षा आहे. यासाठी ते लोकप्रतिनिधींकडे वांरवार मागणी करीत आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तालुक्यातील बहुतांश शाळांमध्ये किचन शेडच नाही. जेथे आहे त्याची अवस्था बिकट आहे. फार कमी शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. कुठल्याही शाळेत पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था नाही. गणवेश वाटपामध्येही नेहमीच विलंब होतो. यावरून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पायाभूत सुविधांची अवस्था बिकट असल्याचे स्पष्ट होते. मागील पाच वर्षांची आकडेवारी पाहिल्यास पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी पटसंख्या रोडावत चालल्याचे दिसून येते. याउलट खासगी शाळांमध्ये भरमसाठ फी असतानाही विद्यार्थ्यांनी संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षक पालकांचा विश्वास गमावत आहे, असे म्हणावे लागेल. विद्यार्थी संख्या रोडावण्याऱ्या मुलभूत कारणांची कारणमिमांसा करण्यात शिक्षण विभाग कमी पडत आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. दुसरीकडे शिक्षकवर्गही केवळ पगारासाठी येतात, विद्यार्थ्यांप्रती त्यांची खास बांधिलकी नसते, असा आरोपही पालकातून होत आहे. ही स्थिती कायम राहिल्यास येणाऱ्या काळात फार मोठ्या प्रमाणात शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. (तालुका प्रतिनिधी)