शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

नजर पीक पैसेवारी ६३ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 22:00 IST

जिल्ह्यात अपुºया पावसाने सर्वच पिकांची स्थिती गंभीर असताना जिल्ह्याची नजर पैसेवारी मात्र उत्तम निघाली आहे.

ठळक मुद्देमहसूल सर्वेक्षण : शेतकरी हादरले, स्थिती नाजूक तरीही अहवाल उत्तम !

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात अपुºया पावसाने सर्वच पिकांची स्थिती गंभीर असताना जिल्ह्याची नजर पैसेवारी मात्र उत्तम निघाली आहे. महसूल प्रशासनाने सादर केलेल्या अहवालात नजर पैसेवारी ६३ टक्के असून २०४९ महसूली गावाची पैसेवारी उत्तम असल्याचा निर्वाळा दिला आहे. मूग, उडीद हातचे गेले असून ज्वारीवरही चिकटा आला आहे. सोयाबीन धोक्यात असून कापूस उलंगवाडीच्या मार्गावर आहे. मात्र महसूल प्रशासनाने एका जागेवर बसून केलेल्या हवाई सर्वेक्षणाचा जबर हादरा शेतकºयांना बसला आहे.जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या यंदा ६० टक्केच पावसाची नोंद झाली. पीक फुलोरा अवस्थेत असताना पावसाने पाठ फिरवली. काही भागात तर पाऊस बरसलाच नाही. निसर्गाच्या या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकºयांना बसला आहे. यानंतरही जिल्ह्याची पैसेवारी ६३ टक्के आहे. २०४९ महसूली गावाची पैसेवारी उत्तम असल्याचा निर्वाळा नजर पैसेवारीत जाहीर झाला आहे.प्रारंभीपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू होता तो अखेरपर्यंत कायम राहिला. यामुळे हलक्या जमिनीतील पिकांनी वेळेपूर्वीच अवसान सोडले आहे. मूग आणि उडीद पिकाला याचा सर्वाधिक फटका बसला. १० हजार हेक्टरवर मूग आणि आठ हजार हेक्टरवर शेतकºयांनी उडीदाची पेरणी केली. फुलोरा अवस्थेत या ठिकाणी पाऊस नव्हता. त्यातच किडीचे आक्रमण झाले. यामुळे मूग आणि उडीदाचे पीक जिल्ह्यातील शेतकºयांना झाले नाही. ज्वारीची अवस्था अशीच आहे. सोयाबीनची अवस्था अशीच झाली. यामुळे झाडाला शेंगा लागल्या. आता सोयाबीनचा उताराही निम्माच येत आहे. जिल्ह्यात संपूर्ण पिकांची स्थिती चिंताजनक असताना महसूल प्रशासनाला मात्र शेतात समृद्धी दिसली. जागेवर बसून केलेल्या हवाई सर्वेक्षणात पैसेवारी ६३ टक्के आली. ५० टक्क्याच्यावर पैसेवारी आल्यास स्थिती उत्तम समजून शासनाची कोणतीही मदत मिळत नाही. त्यामुळे हा नजर अहवाल पाहून शेतकरी हादरले आहे.वेळेपूर्वीच कपाशीचे कोवळे बोंड फुटलेएकीकडे अपुरा पाऊस आणि दुसरीकडे उन्हाचा वाढता पारा याचा फटका पिकांना बसत आहे. कपाशीचे बोंड वेळेपूर्वीच परिपक्व होऊन फुटत आहे. त्यामुळे एक-दोन वेच्यातच शेतात उलंगवाडी होण्याची स्थिती आहे.