शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

विधानपरिषदेच्या ‘संधी’वर डोळा

By admin | Updated: October 7, 2015 02:45 IST

नगरपंचायतीच्या नगरसेवकांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदानाची ‘संधी’ मिळणार असल्याने या निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे.

नगरपंचायत निवडणूक : आॅनलाईन नामांकनासाठी धडपड, इच्छुकांची भाऊगर्दी यवतमाळ : नगरपंचायतीच्या नगरसेवकांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदानाची ‘संधी’ मिळणार असल्याने या निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. नामांकन दाखल करण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना यामुळेच राजकीय पक्षांना आपले उमेदवार निश्चित करण्यात अडचण येत आहे. तर दुसरीकडे नामांकनासाठी आॅनलाईन पद्धत असल्याने अनेकांची ‘लिंक’ फेल होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव, झरी आणि महागाव येथे नगरपंचायतीची निवडणूक होऊ घातली आहे. ८ आॅक्टोबर ही नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. राजकीय पक्षांकडे तिकीट मागणाऱ्या उमेदवारांची मोठी गर्दीही दिसत आहे. मात्र अद्यापही कोणत्याही पक्षाने उमेदवारांची अधिकृत नावे जाहीर केली नाही. त्याला कारणही तसेच आहे. नगरपंचायतीतून निवडणूक येणाऱ्या नगरसेवकाला विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाची संधी आहे. जिल्ह्यात आॅक्टोबर २०१६ मध्ये म्हणजेच वर्षभरानंतर विधान परिषदेची निवडणूक होत आहे. ही निवडणूक ‘कॅश’ करण्यासाठी आता नगरपंचायतीचा आधार घेतला जात आहे. यापूर्वी दहा नगरपरिषदेतील २४९ नगरसेवक आणि ६२ जिल्हा परिषद सदस्य विधानपरिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी मतदान करीत होते. आता त्यात १०२ मतदारांची भर पडणार आहे. सहा नगरपंचायतीच्या सदस्यांना हा अधिकार असल्याने खरी चुरस आतापासूनच वाढली आहे.काँग्रेसची ज्येष्ठ मंडळी सत्तेपासून दूर आहे. पाच वर्ष कुठलेच पद नसणे हे त्यांच्यासाठी कठीण ठरणारे आहे. त्यामुळेच नगरपंचायतीच्या माध्यमातून संभाव्य विधान परिषदेचे गणित जुळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी आपल्या मर्जीतील सदस्यच नगरपंचायतीत जावे अशी व्युहरचना आखली जात आहे. नगरपंचायतीतील गठ्ठा १०२ मते आपल्या बाजूने राहिल्यास विधान परिषदेचा मार्ग सुखकर होणार आहे. त्यामुळेच अनेकांनी या निवडणुकीच्या माध्यमातून भविष्यातील राजकीय गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)विधानसभेप्रमाणेच द्यावे लागणार विवरण नगरपंचायतीसाठी नामांकन दाखल करताना स्वतंत्र विवरण पत्र भरण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे. यापूर्वी विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठीच ही पद्धत राबविली जात होती. आता मात्र नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनासुद्धा ११ पानाचे विवरण पत्र भरुन द्यावे लागणार आहे. यात बँक खाते, आर्थिक उत्पन्न व त्याचे स्रोत, न्यायालयीन खटले, दाखल गुन्हे यासह संपूर्ण वैयक्तिक माहिती उमेदवारांना नमूद करावी लागणार आहे. आॅनलाईन पद्धतीचा फटका राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींप्रमाणेच नगरपंचायतीसाठीसुद्धा आॅनलाईन नामांकन दाखल करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र आॅनलाईन अर्ज भरताना लिंक फेल होण्याचे प्रकार घडत आहे. अनेक इच्छुक उमेदवार साईट ओपन होत नसल्याचे सांगत आहे. तर काहींनी सायबर कॅफेवर अर्ज भरण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. प्रशासनाने यावर उपाययोजना म्हणून प्रत्येक तहसील स्तरावर मदत केंद्र उभारण्यात आले आहे.