शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

उडीद व सोयाबीन पिकाचे अतिपावसाने नुकसान

By admin | Updated: September 28, 2016 00:24 IST

सुरुवातीला मौसमी वाऱ्याचा पाऊस यावर्षी समाधानकारक झाल्याने परिसरातील पीक परिस्थिती चांगली होती.

मदतीची अपेक्षा : तोंडातील घास गेल्याने शेतकरी हवालदिलसोनखास : सुरुवातीला मौसमी वाऱ्याचा पाऊस यावर्षी समाधानकारक झाल्याने परिसरातील पीक परिस्थिती चांगली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला आहे. उडीद व सोयाबीनचे पीक अतिवृष्टीमुळे हातातून निघून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे उडीद व सोयाबीनच्या दाण्यांना कोंब फुटत असल्याचे चित्र आहे.यावर्षी सुुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने सोनखास परिसरातील पिकांची परिस्थिती उत्तम होती. बहुतांश शेतकऱ्यांनी उडीद व सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे. उडीदाचे पीक अतिशय चांगले होते. जवळपास २५ टक्के उडीदाची लागवड होती. काही शेतकऱ्यांची उडीद व सोयाबीनची कापणीही झाली. परंतु आता परतीचा पाऊस थांबतच नसल्याने कापणी केलेला उडीद व सोयाबीनच्या दाण्याला कोंब फुटत आहे. पावसाला सुरुवात झाली की झाकून ठेवा, पाऊस थांबताच या पिकांच्या गंजीला उघडे करा एवढेच काम आता शेतकरी करीत असल्याचे दिसून येते. कापून ठेवलेल्या पिकाच्या गंजीतील पिकांना अतिवृष्टीमुळे बुरशी चढत आहे. आणखी काही दिवस असाच पाऊस राहिल्यास ही पिके हातातून निघून जाण्याची तीव्र शक्यता आहे. उत्तरवाढोणा येथील प्रकाश झांबड या शेतकऱ्याने मक्ता बटईने केलेल्या सहा एकर शेतात उडीदाची लागवड केली. उत्तम स्थितीत असलेल्या पिकाची कापणी करून गंजी लाण्यात आली. परंतु आता पाऊस थांबत नसल्याने २० क्विंटलचे जवळपास ५० हजार रुपयांच्या पिकाचे नुकसान त्यांचे झाले आहे. सोयाबीनच्या दाण्यालाही बुरशी लागत असल्याने ते चिंताग्रस्त आहे. परिसरातील सर्वच शेतकऱ्यांची हीच परिस्थिती आहे. यातून मार्ग काढावा कसा हे शेतकऱ्यांना समजेनासे झाले आहे, शासनाच्या कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे. हाती आलेले पीक नष्ट होत असताना शेतकऱ्यांना पहावे लागत आहे. शासनाने अशा शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)परतीचा पाऊस थांबता थांबेनागेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने सोनखास परिसरात चांगलाच कहर केला आहे. अचानक काही वेळ मुसळधार पाऊस येतो आणि नंतर मात्र आकाश स्वच्छ दिसते. पावसाचा वेग पाहता अशावेळी पाच मिनिट जरी पिकांची गंजी ओली झाली तरी त्यामध्ये चांगलेच पाणी मुरते. अशावेळी पिकाच्या गंजीला झाकण्यासाठीसुद्धा पुरेसा वेळ मिळत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे.