शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

उडीद व सोयाबीन पिकाचे अतिपावसाने नुकसान

By admin | Updated: September 28, 2016 00:24 IST

सुरुवातीला मौसमी वाऱ्याचा पाऊस यावर्षी समाधानकारक झाल्याने परिसरातील पीक परिस्थिती चांगली होती.

मदतीची अपेक्षा : तोंडातील घास गेल्याने शेतकरी हवालदिलसोनखास : सुरुवातीला मौसमी वाऱ्याचा पाऊस यावर्षी समाधानकारक झाल्याने परिसरातील पीक परिस्थिती चांगली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला आहे. उडीद व सोयाबीनचे पीक अतिवृष्टीमुळे हातातून निघून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे उडीद व सोयाबीनच्या दाण्यांना कोंब फुटत असल्याचे चित्र आहे.यावर्षी सुुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने सोनखास परिसरातील पिकांची परिस्थिती उत्तम होती. बहुतांश शेतकऱ्यांनी उडीद व सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे. उडीदाचे पीक अतिशय चांगले होते. जवळपास २५ टक्के उडीदाची लागवड होती. काही शेतकऱ्यांची उडीद व सोयाबीनची कापणीही झाली. परंतु आता परतीचा पाऊस थांबतच नसल्याने कापणी केलेला उडीद व सोयाबीनच्या दाण्याला कोंब फुटत आहे. पावसाला सुरुवात झाली की झाकून ठेवा, पाऊस थांबताच या पिकांच्या गंजीला उघडे करा एवढेच काम आता शेतकरी करीत असल्याचे दिसून येते. कापून ठेवलेल्या पिकाच्या गंजीतील पिकांना अतिवृष्टीमुळे बुरशी चढत आहे. आणखी काही दिवस असाच पाऊस राहिल्यास ही पिके हातातून निघून जाण्याची तीव्र शक्यता आहे. उत्तरवाढोणा येथील प्रकाश झांबड या शेतकऱ्याने मक्ता बटईने केलेल्या सहा एकर शेतात उडीदाची लागवड केली. उत्तम स्थितीत असलेल्या पिकाची कापणी करून गंजी लाण्यात आली. परंतु आता पाऊस थांबत नसल्याने २० क्विंटलचे जवळपास ५० हजार रुपयांच्या पिकाचे नुकसान त्यांचे झाले आहे. सोयाबीनच्या दाण्यालाही बुरशी लागत असल्याने ते चिंताग्रस्त आहे. परिसरातील सर्वच शेतकऱ्यांची हीच परिस्थिती आहे. यातून मार्ग काढावा कसा हे शेतकऱ्यांना समजेनासे झाले आहे, शासनाच्या कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे. हाती आलेले पीक नष्ट होत असताना शेतकऱ्यांना पहावे लागत आहे. शासनाने अशा शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)परतीचा पाऊस थांबता थांबेनागेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने सोनखास परिसरात चांगलाच कहर केला आहे. अचानक काही वेळ मुसळधार पाऊस येतो आणि नंतर मात्र आकाश स्वच्छ दिसते. पावसाचा वेग पाहता अशावेळी पाच मिनिट जरी पिकांची गंजी ओली झाली तरी त्यामध्ये चांगलेच पाणी मुरते. अशावेळी पिकाच्या गंजीला झाकण्यासाठीसुद्धा पुरेसा वेळ मिळत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे.