शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
3
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
4
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
5
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
6
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
7
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
8
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
9
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
10
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
11
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
12
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
13
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
14
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
15
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
16
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
17
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
18
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
19
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
20
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत

कालबाह्य एसटी गाड्यांवर डोलारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 21:27 IST

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे बिद्र जोपासणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ सध्या भंगार अवस्थेत रस्त्यावरून धावत आहे. या भंगार बसेसमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांचा विकास केला जात असला तरी वणी आगारातील ५० टक्के बसेस कालबाह्य झाल्या असून त्या अखेरच्या घटका मोजत आहेत. याच कारणाने वणीची लालपरी संकटात सापडली आहे.

ठळक मुद्देवणी आगार : ५० टक्के बसेस भंगारात, आगारप्रमुखाचे पदही ‘प्रभारी’च

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे बिद्र जोपासणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ सध्या भंगार अवस्थेत रस्त्यावरून धावत आहे. या भंगार बसेसमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांचा विकास केला जात असला तरी वणी आगारातील ५० टक्के बसेस कालबाह्य झाल्या असून त्या अखेरच्या घटका मोजत आहेत. याच कारणाने वणीची लालपरी संकटात सापडली आहे.सर्वांत श्रीमंत महामंडळ म्हणून एस.टी.महामंडळाकडे पाहिले जाते. मात्र महामंडळाला नियोजनशून्यतेमुळे तोट्याचा सामना करावा लागतो. अशाही परिस्थितीत जास्त उत्पन्न देणारे आगार म्हणून वणी आगाराची ओळख आहे. सुसज्ज व स्वच्छ वातावरण, भरपूर जागा असलेला हा आगार आहे. २०१८ मध्ये या आगाराचे उत्पन्न ८९ लाख ७५ हजार ४६७ एवढे झाले. परंतु यावर्षी २०१९ मध्ये उत्पन्नात घट झाली असून यावर्षीचे उत्पन्न केवळ ७७ लाख ४६ हजार ३३० रुपये ईतके आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी वणी आगाराला १२ लाख २९ हजार १३७ रुपये तोटा सहन करावा लागला आहे.या आगारामध्ये पाच वर्षांपासून नवीन बसेस आल्याच नाहीत. येथील आगारात निळ्या व लाल रंगाच्या बसेस आहेत. त्यात मानव विकास मिशनच्या १२ बसेस आहेत. ४० लाल रंगाच्या बसेस आहेत. यांपैकी ४५ बसेस सध्या सेवा देत असून सात बसेस पासींगसाठी जिल्हा आगारात पाठविण्यात आल्या आहेत. एक शिवशाही बस वणी येथून नागपूर या मार्गावर धावते. दुसरी शिवशाही बस अकोलासाठी सोडण्यात येत होती. परंतु या बसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने ती बंद करण्यात आली आहे.या आगारामधील २५ बसेस आजवर १० ते १२ लाख किलोमिटर धावल्या असून त्यामुळे त्या आता कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. या आगारामध्ये संपूर्ण परिसरासाठी व लांब पल्ल्यावर पाठविण्यासाठी ५२ बसेसची आवश्यकता आहे. परंतु नवीन बसेस मिळत नसल्याने जुन्याच बसेसना दुरूस्त करून त्याद्वारे प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. गेल्या एक वर्षापासून आगार प्रमुखाचे पद रिक्त असून सध्या या आगाराचा कारभार प्रभारावरच सुरू आहे. या आगारावर कुणाचे नियंत्रण नसल्याने सकाळ पाळीतील बसेसही वेळेवर सुटत नाहीत.प्रवासी वाढविण्यासाठी महामंडळाकडून विविध योजना राबविण्यात येतात. मात्र त्यांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. कोट्यवधी रूपये खर्च करून वणीत बसस्थानक उभारण्यात आले. भंगार बसेसमुळे प्रवाशांचा ओढा खासगी बसमधून प्रवास करण्याकडे होत असल्याचे दिसून येत आहे.वणी आगारात मोठ्या प्रमाणात अडचणी वाढत असल्याचे प्रवासी बोलतात. परंतु त्याचे निराकरण करण्यासाठी प्रवासी वर्गाचे काही कर्तव्य आहे. त्यांनी आगारासंदर्भातील आपल्या तक्रारी तक्रार पेटीत टाकल्या, तर त्यावर कार्यवाही करता येणार आहे.- एस.एस.टिपले,प्रभारी आगार प्रमुख.