शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

तज्ज्ञाविना फिरती प्रयोगशाळा

By admin | Updated: May 22, 2014 01:30 IST

शेतकर्‍यांना आपल्या शेतजमिनीचा पोत कळावा म्हणून डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने फिरती प्रयोगशाळा गावात पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

यवतमाळ : शेतकर्‍यांना आपल्या शेतजमिनीचा पोत कळावा म्हणून डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने फिरती प्रयोगशाळा गावात पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि माती परीक्षणाची वाहने जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचली. मात्र तज्ज्ञ मार्गदर्शक नसल्याने ही वाहने धूळ खात पडली आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा होतो. जवळपास साडेचार लाख शेतकरी दरवर्षी शेती कसतात. शेतीमध्ये तीच ती पारंपरिक पिके घेतली जातात. अधिक उत्पादनासाठी कृषी सेवा केंद्र संचालक शेतकर्‍यांना खताची अमाप मात्रा देण्याचा सल्ला देतात. यातून शेतकर्‍यांना आर्थिक बजेट बिघडतो. उत्पादनही होत नाही. याचे मूळ कारण शोधण्यासाठी शेतकरी कधीच आपल्या शेतजमिनीची पोत तपासत नाही.

यामुळे या संपूर्ण प्रकारावर मात करता यावी म्हणून डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रत्येक जिल्ह्यांना माती परिक्षणाचे फिरते वाहन उपलब्ध करून दिले. यात यवतमाळचाही समावेश आहे. ही वाहने माती परिक्षणासाठी अद्यावत तंत्रज्ञानासह सज्ज आहे. या फिरत्या माती परिक्षण केंद्रामध्ये गावातील शेतकर्‍यांना तत्काळ मातीची पोत तपासून दिली जाणार आहे. परंतु या फिरत्या पथकाला तज्ज्ञच नाही. यामुळे गत चार महिन्यांपासून ही वाहने उभी आहेत.

शेतजमिनीची पोत तपासून पीक निवडल्यास शेतकर्‍यांना अधिक उत्पादन घेण्यास मदत होवू शकते. मात्र माती परिक्षणाची सोयच नसल्याने त्यांच्या निर्णयात अडथळे येत आहे. माती परिक्षण वाहनासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला आहे. केवळ तज्ज्ञाअभावी हे वाहन मातीमोल झाले आहे. तज्ज्ञ नियुक्तीची जबाबदारी कृषी विद्यापीठाची आहे. सध्या तर या वाहनावर चालकही नसल्याने हे वाहन केवळ नावापुरतेच असल्याचे दिसून येते. शेतकर्‍यांसाठी विविध योजना शासनाकडून घोषित करण्यात येत असल्या तरी त्या प्रत्यक्षात राबविणार्‍यांच्या इच्छाशक्तीअभावी या योजना केवळ कागदांवरच दिसून येतात. प्रत्यक्षात अशा योजनांचा कोणताही लाभ शेतकर्‍यांना होताना दिसत नाही. योजनांची सुरवातीला मात्र मोठय़ा प्रमाणात प्रसिद्धी केली जाते. नंतर या योजना कुठे दबतात हे कुणालाही माहिती नसते. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये रोष निर्माण होणे सहाजिक आहे. (शहर वार्ताहर)