शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विहीर अधिग्रहणाच्या मोबदल्यात घोळ

By admin | Updated: October 3, 2016 00:19 IST

पाणीटंचाई काळात अधिग्रहित करण्यात आलेल्या विहिरीचा मोबदला दुसऱ्याच व्यक्तीला देण्यात आल्याचा प्रकार तालुक्यातील बोंडगव्हाण येथे घडला.

नेर : पाणीटंचाई काळात अधिग्रहित करण्यात आलेल्या विहिरीचा मोबदला दुसऱ्याच व्यक्तीला देण्यात आल्याचा प्रकार तालुक्यातील बोंडगव्हाण येथे घडला. संपूर्ण गाव साक्षीदार असलेल्या प्रकरणातही मोबदला मिळविण्यासाठी शेतकऱ्याला पंचायत समितीचे उंबरठे झिजवावे लागत आहे. बोंडगव्हाण येथील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने १५ एप्रिल २०१६ रोजी पांडुरंग राऊत या शेतकऱ्याची विहीर अधिग्रहित केली. ग्रामस्थांना नियमित आणि सुरळीत पाणी मिळावे यासाठी फुटलेली पाईपलाईनही या शेतकऱ्याने दुरुस्त केली. टंचाई काळात गावकऱ्यांनी या विहिरीच्या पाण्याचा वापर केला. ग्रामसेवकाने मात्र मोबदला रामभाऊ राऊत यांना दिला. ३६ हजार रुपयांचा धनादेश त्यांना देण्यात आला. संपूर्ण गावकऱ्यांनी आपल्या विहिरीचे पाणी वापरले असताना मोबदला दुसऱ्याला कसा, असा प्रश्न पांडुरंग राऊत यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, ग्रामस्थांनीही आम्ही पांडुरंग राऊत यांच्या विहिरीचे पाणी वापरल्याचे निवेदन दिले. यानंतरही त्यांना मोबदल्यासाठी संबंधित कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. ग्रामसेवकाने हा घोळ घातल्याचा आरोप आहे. या संदर्भात ग्रामसेवक के.डी. निबोळकर यांना विचारले असता, विहीर अधिग्रहित केल्याचे दोन्ही शेतकऱ्यांचे ठराव पंचायत समितीला सादर केले होते. पांडुरंग राऊत यांचा अर्ज खारिज झाला होता. रामभाऊ राऊत यांचा अर्ज मंजूर झाल्याने धनादेश त्यांच्या नावाने निघाला, असे ते म्हणाले. यावर शेतकरी पांडुरंग राऊत म्हणाले, आपला अर्ज खारिज झाल्याचे पत्र मिळालेच नाही. ग्रामस्थांनी आपल्या विहिरीचे पाणी वापरले. ठराव मंजूरीचे पत्र आपल्याकडे असताना रामभाऊ राऊत यांच्या नावाने धनादेश कसा काढण्यात आला, हा त्यांचा प्रश्न आहे. (तालुका प्रतिनिधी)