शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

रोहित्रांवर वाढला अतिरिक्त दाब

By admin | Updated: November 30, 2014 23:14 IST

खरिपातील नैसर्गिक आपत्तीतून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच भारनियमन आणि कमी दाबाच्या विजेमुळे रबी पिकालाही जबरदस्त फटका बसत आहे. गहू, हरभरा आदी पिकांना पाणी देण्याची मोठी समस्या आहे.

नेर : खरिपातील नैसर्गिक आपत्तीतून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच भारनियमन आणि कमी दाबाच्या विजेमुळे रबी पिकालाही जबरदस्त फटका बसत आहे. गहू, हरभरा आदी पिकांना पाणी देण्याची मोठी समस्या आहे. शिवाय फळबागांसाठीही धोक्याची घंटा ठरत आहे. यावर विद्युत कंपनीकडून कुठलीही उपाययोजना होत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. तालुक्यात निर्धारित वेळेशिवायसुद्धा इतरवेळी भारनियमनाच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित केला जातो. जेव्हा वीज असते तीही कमी दाबाची राहात असल्याने मोटरपंप चालत नाही. शिवाय काही प्रसंगी जळत असल्याने दुहेरी नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना खरीप हंगामात लागवड खर्चाइतकेही उत्पादन झाले नाही. त्यामुळे वर्षभर कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा आणि घेतलेले कर्ज फेडायचे कसे याची चिंता लागली आहे. आता रबीचे पीक घेवून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न होत असतानाच वीज मंडळाचे भारनियमन आणि कमी दाबाच्या विजेचे भूत मानगुटीवर बसले आहे. तालुक्यात गहू, हरभरा, भाजीपाला पिकाचे मोठे क्षेत्र आहे. शिवाय फळबागाही आहे. या पिकांना सद्यस्थितीत पाणी देण्याची अतिशय आवश्यकता आहे. परंतु दिवसभर विजेचा लपंडाव सुरू राहात असल्याने काही शेतकऱ्यांना ओलितासाठी रात्र जागावी लागते. या स्थितीत वन्य जीवांपासूनही त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. क्षमतेपेक्षा जास्त विद्युत जोडण्या असल्याने बऱ्याच रोहित्रांवर अतिरिक्त दाब येत असल्याने पुरवठा सुरळीत ठेवण्यात ते अकार्यक्षम ठरत आहे. परिणामी कृषी पंप जळण्याचे प्रकार वाढले आहे. मोटरपंपाच्या संख्येनुसार नवीन रोहित्र बसविणे गरजेचे आहे. परंतु यासाठी अनेक अडचणी विद्युत कंपनीकडून सांगितल्या जात आहे. शिवाय छोटासा बिघाड काढण्यासाठीही कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना सहकार्य मिळत नाही. अशावेळी त्यांना स्वत:च्या खिशातून खर्च भागवावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. विजेसंबंधीचे प्रश्न तत्काळ निकाली काढावे, या मागणीसाठी विद्युत कंपनीला निवेदन देण्यात आले. यावर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी स्नेहल भाकरे, निखिल जैत, प्रवीण राठोड, सुजित कुंभारे, विशाल चहाकार, गोपाळ चव्हाण, लक्ष्मण कराळे, शंकर चव्हाण, संजय राठोड, किशोर अरसोड, विलास चव्हाण, पंडित चव्हाण आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)