शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

सर्वत्र संततधार, कापूस, सोयाबीनला संजीवनी

By admin | Updated: September 1, 2014 00:16 IST

आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यावर एकदाच वरूणराजा प्रसन्न झाला. गेल्या तीन दिवसांपासून पुसद तालुक्यात संततधार पाऊस कोसळत आहे. गत २४ तासात ६० मिमी पावसाची नोंद झाली.

पुसद : आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यावर एकदाच वरूणराजा प्रसन्न झाला. गेल्या तीन दिवसांपासून पुसद तालुक्यात संततधार पाऊस कोसळत आहे. गत २४ तासात ६० मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाने कापूस, सोयाबीन पिकांना नवसंजीवनी मिळाली असून पूस धरणातही ४० टक्के जलसाठा झाला आहे. यंदा हवामानाचे सर्व अंदाज खोटे ठरवित पावसाने दोन महिने दडी मारली. रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू ही पावसाची नक्षत्रे कोरडी गेली. शेतकऱ्यांची चिंता वाढली. मात्र गत दहा दिवसांपासून पावसाचे आगमन झाले. सर्वत्र पाऊस आल्याने नदी-नाल्यात पाणी वाहू लागले. विहिरी व हातपंपाच्या पाण्याची पातळी वाढली. पूस नदीवरील प्रकल्पात १५ आॅगस्टपर्यंत १८ टक्के जलसाठा होता. याची झळ पुसदकरांना बसणार होती. मात्र आता समाधानकारक पावसाने पूस धरणात तब्बल ४० टक्के पाणीसाठा झाला असल्याची माहिती उपविभागीय अभियंता मनोहर चव्हाण यांनी दिली. गेल्या २४ तासापासून सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळत आहे. २४ तासात तब्बल ६० मिमी पाऊस कोसळल्याची नोंद आहे. आतापर्यंत ३५१ मिमी पाऊस तालुक्यात कोसळल्याचे तहसील कार्यालयातील भाऊ चंद्रवंशी यांनी सांगितले. या पावसाने तालुक्यातील कापूस, ज्वारी, सोयाबीन या पिकांना संजीवनी मिळाली असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. शेतकरी लक्ष्मणराव जाधव म्हणाले, अलिकडचा पाऊस समाधानकारक असून पिकांना पोषक आहे. दुबार पेरणी केलेल्या पिकांनाही नवसंजीवनी मिळणार असल्याचे वरुड येथील शेतकरी संभाजीराव टेटर यांनी सांगितले. वृत्त लिहेस्तोवर पुसद तालुक्यात संततधार पाऊस सुरूच होता. या पावसामुळे कोरडे पडलेले नदी-नाले खळखळून वाहत आहेत. (प्रतिनिधी)