शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपा राष्ट्रवादीच्या दावणीला

By admin | Updated: July 13, 2015 00:12 IST

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यवतमाळ विधानसभेत निर्णायक असलेल्या शहरालगतच्या ग्रामपंचायती राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या आहेत.

नेत्यांची उदासीनता : वाघापूर, पिंपळगावमध्ये एकही उमेदवार नाहीयवतमाळ : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यवतमाळ विधानसभेत निर्णायक असलेल्या शहरालगतच्या ग्रामपंचायती राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या आहेत. मात्र, याही निवडणुकीत भाजपा हा राष्ट्रवादीच्या दावणीला बांधल्याचे स्पष्ट होते. नगर परिषदेतील युती ग्रामपंचायतीमध्येही कायम आहे. इतकेच नव्हेतर वाघापूर, पिंपळगाव या महत्त्वपूर्ण ग्रामपंचायतींमधून भाजपाकडून एकही उमेदवार देण्यात आलेला नाही. यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते मात्र मनातून दुखावले आहेत.ग्रामपंचायतीच्या निवडणुका या राजकीय पक्षांच्या चिन्हावर होत नसल्या तरी शहरालगतच्या वडगाव, लोहारा, भोसा, वाघापूर, पिंपळगाव या मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये थेट राजकीय पक्षांचाच हस्तक्षेप असतो. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांनी तशी तयारीही केली आहे. बहुतांश गावात या तिन्ही पक्षांचे स्वतंत्र पॅनल आहे. मात्र, येथील सत्ताधारी भाजपाने ग्रामपंचायत निवडणुकीत स्वारस्यच दाखविलेले नाही. नेहमीप्रमाणे भाजपाने सोयीची भूमिका घेत राष्ट्रवादीसोबत घरठाव मांडला आहे. यामुळे भाजपातील निष्ठावंत स्थानिक कार्यकर्ते पुन्हा उपरेच ठरले आहेत. स्थानिक पातळीवरील संघटन मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढणे अपेक्षित आहे. नेमके याच ठिकाणी स्थानिक आमदार स्वत:ला अलिप्त ठेवत असल्याने भाजपातील अनेकांची अडचण झाली आहे. केवळ वडगाव, भोसा आणि लोहारा येथे काही मोजक्या जागा घेऊन राष्ट्रवादीसोबत निवडणुकीत उतरण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वीसुद्धा भाजपा आमदाराने नगर परिषदेत भाजपाचे संख्याबळ असतानाही सत्तेचा बहुतांश वाटा राष्ट्रवादीला दिला. याचीही नाराजी स्थानिक नगरसेवक व कार्यकर्त्यांमध्ये आहे. हाच कित्ता आता ग्रामपंचायतीत गिरविला जात आहे. अशा पद्धतीने पक्षवाढ होणे शक्य नाही, असेही जाहीररीत्या बोलले जात आहे. पिंपळगाव आणि वाघापूर या ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या पॅनलमध्येच सरळ लढत होत आहे. लोहारा येथे त्या-त्या प्रभागातील प्रभावशाली नेत्याने प्रभागापुरते पॅनल उभे केले आहे. यात काँग्रेस, भाजपा या दोन प्रमुख पक्षांचा समावेश आहे. मात्र पूर्ण ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र पॅनल येथे नाही. वडगाव या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने भाजपाला आठ जागा दिल्या आहेत. काँग्रेसने १४ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. शिवसेनेकडे मात्र मर्यादित जागांसाठीच उमेदवार आहेत. भोसा येथे नवीनच समीकरण तयार झाले असून भाजपा-राष्ट्रवादी आणि काँग्रेस-शिवसेना अशी युती झाली आहे. येथे राष्ट्रवादीने भाजपाला तीन तर काँग्रेसनेही शिवसेनेला तीन जागा दिल्या आहेत. निवडणूक लढण्यापुरते तयार झालेले हे समीकरण प्रत्यक्ष सरपंच निवडीच्या वेळी बदलण्याचीही शक्यता आहे. मात्र, भाजपाने स्वत:चे स्वतंत्र पॅनल कोठेच उभे केले नाही. (कार्यालय प्रतिनिधी)