शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

सचिव येऊनही ग्रामसेवक, तलाठ्यांचा शोध

By admin | Updated: May 27, 2015 02:14 IST

शेतकरी आत्महत्यांबाबत शासन अतिशय गंभीर असून, चक्क मंत्रालयातील सचिवांना उपविभागात नियुक्त करून या कारणांचा शोध घेण्याचे आदेश दिले.

यवतमाळ : शेतकरी आत्महत्यांबाबत शासन अतिशय गंभीर असून, चक्क मंत्रालयातील सचिवांना उपविभागात नियुक्त करून या कारणांचा शोध घेण्याचे आदेश दिले. मात्र ग्रामविकासात महत्वाची भूमिका बजावणारे ग्रामसेवक, कृषीसहाय्यक आणि तलाठी अद्यापही गंभीर दिसत नाही. एकही कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्या त्यांना कळतच नाही. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ग्रामस्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करण्याची गरज आहे. ग्रामस्थांचा थेट संपर्क असणारे शासकीय कर्मचारीच त्यांना वेळेत उपलब्ध होत नाही. गावातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि प्राथमिक शाळेतील शिक्षक मुख्यालयी राहत नाही. शासनाने या सर्वच कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यासाठी घरभाडे भत्ता लागू केला आहे. अनेकांनी खोटे भाडे करार करून घरभाडे भत्याची उचलही केली आहे. प्रशासन अधिकाधिक लोकाभीमुख करण्यासाठी विशेष करून यवतमाळसारख्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील जनतेला प्रशासनावर पुन्हा विश्वास निर्माण करण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट मंत्रालयातील सचिवांना उपविभागाची जबाबदारी दिली आहे. जिल्ह्यातील सहा उपविभागासाठी सहा सचिव नियुक्त केले आहे. नुकताच त्यांनी आपल्या मुख्यालयी जाऊन आढावाही घेतला आहे. आज प्रशासनातील मुख्य असलेले विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा कृषी अधीक्षक या सर्व मोठ्या अधिकाऱ्यांना सर्वसामान्य माणसांना भेटणे सहज शक्य आहे. आता तर सचिव दर्जाचे अधिकारी गावात येत आहेत. या अधिकाऱ्यांनी जितक्या चकरा गावात मारल्या इतके वेळा त्या गावातील शासकीय कर्मचारी कधीच उपस्थित राहिलेले नाही. मुख्यालयी राहणे बंधनकारक असूनही या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा कारभार तालुका अथवा जिल्ह्याच्या ठिकाणाहून चालतो. त्यामुळे ग्रामविकासाच्या योजना, महसूलाची कामे, आरोग्य सोयी सुविधा आणि ग्रामीण भागातील शिक्षण यांचा पूरता बोजवारा उडाला आहे. आज गावात ग्रामसेवकाला भेटण्यासाठी ग्रामस्थांनी किमान आठ दिवस चकरा माराव्या लागतात असा अनुभव या संवर्गातील सर्वच कर्मचाऱ्यांबाबतचा आहे. ग्रामविकासासाठी शासकीय कर्मचाऱ्याला मुख्यालयी राहणे बंधनकारक करणे आवश्यक आहे. यातून गावातील समस्या निकाली निघतील. शिवाय कर्मचारी वर्ग गावात वास्तव्यास असल्याने एका नवीन संस्कृतीचा उदय गावात होईल. त्या दृष्टिकोनातून कठोर प्रयत्न करणे गरजेचे आहे. काही अपवादात्मक कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून वाखाणण्याजोगी कामगिरी केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)