शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

२० शेतकºयांच्या मृत्यूनंतरही भाजपा सरकार गंभीर नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 23:25 IST

फवारणीतील कीटकनाशकाची विषबाधा होऊन २० शेतकरी मृत्युमुखी पडणे हे ओपन मर्डर आहे. त्यासाठी थेट सरकारवर गुन्हा दाखल केला जावा.

ठळक मुद्देकाँग्रेस आमदारांचा आरोप : प्रदेशला अहवाल देणार, विधानसभाही गाजविणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : फवारणीतील कीटकनाशकाची विषबाधा होऊन २० शेतकरी मृत्युमुखी पडणे हे ओपन मर्डर आहे. त्यासाठी थेट सरकारवर गुन्हा दाखल केला जावा. एवढ्या मोठ्या हत्याकांडानंतरही राज्यातील भाजपा सरकार दोषींवरील कारवाईबाबत गंभीर नाही, असा आरोप वैदर्भीय काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाने केला आहे.जिल्ह्यातील विषबाधेने झालेल्या २० शेतकºयांच्या मृत्यूची दखल घेऊन प्रदेश काँग्रेसने वैदर्भीय आमदारांचे एक शिष्टमंडळ शनिवारी यवतमाळात पाठविले. विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वातील आमदारांच्या शिष्टमंडळात यशोमती ठाकूर, प्रा. वीरेंद्र जगताप, अमित झनक यांचा समावेश आहे. शनिवारी आमदारांच्या या चमूने सर्वप्रथम वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. तेथे उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांची वास्तपूस केली. तेथील औषधोपचार व इतर सोई-सुविधांबाबत वैद्यकीय अधिकाºयांशी चर्चा केली. त्यानंतर या शिष्टमंडळाने जिल्ह्यातील कळंब, घाटंजी तालुक्यातील टिटवी, मानोली व पांढरकवडा तालुक्यातील फवारणीमुळे मृत्युमुखी पडलेल्या शेतकºयांच्या घरी भेट दिली.या आमदारांनी सांगितले की, भाजपा सरकारची केवळ घोषणाबाजी सुरू आहे. सरकार गंभीर नाही. कर्जमाफी अद्याप दिली नाही. मात्र त्यासाठी आॅनलाईन अर्ज भरताना शेतकºयांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. मिशनच्या अध्यक्षांनी एका मृत शेतकºयाच्या पत्नीला नोकरी देण्याचे आश्वासन ‘सीएमओ’च्या हवाल्याने दिले होते. परंतु प्रत्यक्षात २० दिवस लोटूनही काहीच झाले नाही.या आमदारांसोबत जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आदर म्हणून व त्रास होऊ नये म्हणून जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना या दौºयापासून दूर ठेवल्याचे एका आमदाराने सांगितले. मात्र काँग्रेसची यंग ब्रिगेड खांद्याला खांदा लावून काम करीत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.शिवसेनेला सोबत येण्याचे आवाहनकाँग्रेस आमदारांचे शिष्टमंडळ रुग्णालयात पोहोचले असता महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे तेथे बैठक घेत होते. तेव्हा शिवसेनेची जागा आता तेथे नाही, सेनेने जनतेच्या भल्यासाठी काँग्रेस सोबत यावे, असे आवाहन आमदार यशोमती ठाकूर यांनी राठोड यांना उद्देशून केले.२० शेतकºयांचा कीटकनाशक फवारणीतून झालेला मृत्यू म्हणजे खुले हत्याकांड आहे. या प्रकरणी सरकारवर खुनाचा गुन्हा नोंदविला जावा. दोषींवर एफआयआर दाखल व्हावे. या हत्याकांडावरुन काँग्रेस विधानसभा दणाणून सोडेल.- यशोमती ठाकूरआमदार, काँग्रेसविषबाधा प्रकरणात प्रशासनाचा कुणावरही वचक नाही. औषध विक्रेत्यांना राजाश्रय आहे. त्याशिवाय हे घडू शकत नाही. हे प्रकरण विधानसभेत लावून धरु आणि तरीही कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरुन आक्रमकपणे आंदोलन करू.- विजय वडेट्टीवारउपनेते काँग्रेस