शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

३६ वर्षांनंतरही पाणी शेतात पोहोचलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:46 IST

ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या, अशा सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत देण्याची मागणी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. १९८३ ...

ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या, अशा सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत देण्याची मागणी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. १९८३ मध्ये शासनाने अधरपूस प्रकल्पाचे पाणी आर्णी तालुक्यात पोहोचविण्यासाठी कवठाबाजार, साकूर, मुकिंदपूर, कोसदनी, दोनवाडा परिसरातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित केल्या. तब्बल ५० शेतकऱ्यांनी आपली सुपीक जमीन प्रकल्पासाठी दिली. सात-बारावर शासनाचे नाव नोंदविले गेले. परिणामी शेतकरी शेतीपासून वंचित झाले. त्यांना आता ही शेती कसता येत नाही. त्यावर पीककर्ज, शासकीय योजना, अनुदान मिळत नाही. संपादित जमिनीवर कोणतेही काम झाले नाही. जमिनी मूळ शेतकऱ्यांच्या ताब्यात असल्या, तरी त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. कवडीमोल भावात दिलेल्या जमिनी पुन्हा परत मिळाव्यात, याकरिता परिसरातील शेतकरी एकवटले आहेत.

राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली असून राज्य शासनाच्यावतीने वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी समिती गठित केली. त्या समितीचा लवकरच पाहणी दौरा करण्यात येणार असल्याचे संघर्ष समितीचे प्रतिनिधी विवेक दहिफळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रपरिषदेला प्रशांत जाधव, विवेक पांडे, नारायण व्यवहारे, गोविंदराव देशमुख व अन्य शेतकरी उपस्थित होते.