शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

कोरोनामुळे दारव्हात रोटी बँकेची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST

शहरात बाहेरील अनेक कुटुंब अडकून पडले. सर्व व्यवसाय ठप्प पडल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे भिक्षेकऱ्यांसह अनेकांवर उपासमारीची वेळ आली. ही अवस्था बघून रोटी बँकेची संकल्पना पुढे आली. लॉकडाऊन असल्याने अनेकांना गावी परतता आले नाही. अनेक कुटुंब शहरात अडकून पडले. त्यांच्या खाण्या-पिण्याचे वांदे झाले. काहींनी तात्पुरती मदत केली. मात्र १५ दिवस काढायचे असल्याने चिंता वाढली.

ठळक मुद्देमहिलांचा पुढाकार : संचारबंदीत अडचणीतील कुटुंबांना मदत, पुरुषांचे सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : संचारबंदीमुळे कुणावर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये म्हणून शहरात रोटी बँकेची स्थापना करण्यात आली. यासाठी महिलांनी पुढाकार घेतला.शहरात बाहेरील अनेक कुटुंब अडकून पडले. सर्व व्यवसाय ठप्प पडल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे भिक्षेकऱ्यांसह अनेकांवर उपासमारीची वेळ आली. ही अवस्था बघून रोटी बँकेची संकल्पना पुढे आली. लॉकडाऊन असल्याने अनेकांना गावी परतता आले नाही. अनेक कुटुंब शहरात अडकून पडले. त्यांच्या खाण्या-पिण्याचे वांदे झाले. काहींनी तात्पुरती मदत केली. मात्र १५ दिवस काढायचे असल्याने चिंता वाढली. व्यवसाय ठप्प असल्याने रोजमजुरी करणाऱ्यांचा जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. ही अवस्था बघता येथील बंजारा कॉलनीतील नागरिक मदतीसाठी पुढे आले. अ‍ॅड. वैशाली हिरे यांनी ‘रोटी बँके’ची संकल्पना मांडली. त्याला महिला, पुरुषांनी होकार दिला.पोलीस कर्मचारी शुभांगी ऊंबरे यांच्यामार्फत ठाणेदार मनोज केदारे यांच्याकडून परवानगी घेतली. नंतर घरोघरी जाऊन अन्नदान करण्याचे आवाहन केले. १ एप्रिलपासून कॉलनीतील सर्व महिला अ‍ॅड. वैशाली हिरे यांच्या घरी तयार करण्यात आलेल्या रोटी बँकेत दोन वेळा अन्न पदार्थ गोळा करतात. नंतर ते अन्न गरजूंपर्यंत पोहोचविले जाते. यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाते. अन्न देताना खबरदारी घेतली जाते.या उपक्रमाकरिता अ‍ॅड. वैशाली हिरे, रंजना राठोड, कविता चावरे, कविता राठोड, नलिनी ठाकरे, रजनी खिराडे, मनू मापारे, छाया वानखडे, सुषमा मापारे, लता दुधे, प्रा. पद्मावती मेश्राम, बेबी राठोड, लता बुचके, शिला जाधव आदींनी पुढाकार घेतला. या उपक्रमाला विनोद राठोड, डॉ. रामधन हिरे, संजय ठाकरे, डॉ. चावरे, दीपक राठोड, किसन राठोड, संजय ठोकळे, भाऊ चव्हाण, सुदेश राठोड, भाऊ काळे, सुशील मापारे आदी सहकार्य करीत आहे.मदतीसाठी सरसावले अनेक हातमदतीकरिता अनेक जण पुढे येत आहे. किराणा साहित्य, बिस्कीट, पाणी, फळे आदींसह विविध वस्तुंचा पुरवठा करीत आहे. बंजारा कॉलनीत नागरिकांनी घरी स्वत: दोन वेळचे जेवण तयार करून ते सुरक्षितरित्या गरजूंंपर्यंत पोहोचविणे सुरू केले. गरिबांना मोठ्या अडचणीत दानशूर व्यक्तींमुळे दिलासा मिळाला. हा उपक्रम लॉकडाऊन संपेपर्यंत सुरू राहील.