शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोरोनामुळे दारव्हात रोटी बँकेची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST

शहरात बाहेरील अनेक कुटुंब अडकून पडले. सर्व व्यवसाय ठप्प पडल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे भिक्षेकऱ्यांसह अनेकांवर उपासमारीची वेळ आली. ही अवस्था बघून रोटी बँकेची संकल्पना पुढे आली. लॉकडाऊन असल्याने अनेकांना गावी परतता आले नाही. अनेक कुटुंब शहरात अडकून पडले. त्यांच्या खाण्या-पिण्याचे वांदे झाले. काहींनी तात्पुरती मदत केली. मात्र १५ दिवस काढायचे असल्याने चिंता वाढली.

ठळक मुद्देमहिलांचा पुढाकार : संचारबंदीत अडचणीतील कुटुंबांना मदत, पुरुषांचे सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : संचारबंदीमुळे कुणावर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये म्हणून शहरात रोटी बँकेची स्थापना करण्यात आली. यासाठी महिलांनी पुढाकार घेतला.शहरात बाहेरील अनेक कुटुंब अडकून पडले. सर्व व्यवसाय ठप्प पडल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे भिक्षेकऱ्यांसह अनेकांवर उपासमारीची वेळ आली. ही अवस्था बघून रोटी बँकेची संकल्पना पुढे आली. लॉकडाऊन असल्याने अनेकांना गावी परतता आले नाही. अनेक कुटुंब शहरात अडकून पडले. त्यांच्या खाण्या-पिण्याचे वांदे झाले. काहींनी तात्पुरती मदत केली. मात्र १५ दिवस काढायचे असल्याने चिंता वाढली. व्यवसाय ठप्प असल्याने रोजमजुरी करणाऱ्यांचा जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. ही अवस्था बघता येथील बंजारा कॉलनीतील नागरिक मदतीसाठी पुढे आले. अ‍ॅड. वैशाली हिरे यांनी ‘रोटी बँके’ची संकल्पना मांडली. त्याला महिला, पुरुषांनी होकार दिला.पोलीस कर्मचारी शुभांगी ऊंबरे यांच्यामार्फत ठाणेदार मनोज केदारे यांच्याकडून परवानगी घेतली. नंतर घरोघरी जाऊन अन्नदान करण्याचे आवाहन केले. १ एप्रिलपासून कॉलनीतील सर्व महिला अ‍ॅड. वैशाली हिरे यांच्या घरी तयार करण्यात आलेल्या रोटी बँकेत दोन वेळा अन्न पदार्थ गोळा करतात. नंतर ते अन्न गरजूंपर्यंत पोहोचविले जाते. यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाते. अन्न देताना खबरदारी घेतली जाते.या उपक्रमाकरिता अ‍ॅड. वैशाली हिरे, रंजना राठोड, कविता चावरे, कविता राठोड, नलिनी ठाकरे, रजनी खिराडे, मनू मापारे, छाया वानखडे, सुषमा मापारे, लता दुधे, प्रा. पद्मावती मेश्राम, बेबी राठोड, लता बुचके, शिला जाधव आदींनी पुढाकार घेतला. या उपक्रमाला विनोद राठोड, डॉ. रामधन हिरे, संजय ठाकरे, डॉ. चावरे, दीपक राठोड, किसन राठोड, संजय ठोकळे, भाऊ चव्हाण, सुदेश राठोड, भाऊ काळे, सुशील मापारे आदी सहकार्य करीत आहे.मदतीसाठी सरसावले अनेक हातमदतीकरिता अनेक जण पुढे येत आहे. किराणा साहित्य, बिस्कीट, पाणी, फळे आदींसह विविध वस्तुंचा पुरवठा करीत आहे. बंजारा कॉलनीत नागरिकांनी घरी स्वत: दोन वेळचे जेवण तयार करून ते सुरक्षितरित्या गरजूंंपर्यंत पोहोचविणे सुरू केले. गरिबांना मोठ्या अडचणीत दानशूर व्यक्तींमुळे दिलासा मिळाला. हा उपक्रम लॉकडाऊन संपेपर्यंत सुरू राहील.