शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

२१९४ मॉ दुर्गांची स्थापना

By admin | Updated: October 2, 2016 00:17 IST

जिल्ह्यातील दुर्गोत्सवाचा देशपातळीवर लौकिक आहे. मोठ्या उत्साहात जिल्हाभरातील दोन हजार १९४ मंडळांनी मॉ दुर्गेची स्थापना केली.

उत्सव : १४ ठिकाणे संवेदनशील, २६४ शारदादेवी विराजमानयवतमाळ : जिल्ह्यातील दुर्गोत्सवाचा देशपातळीवर लौकिक आहे. मोठ्या उत्साहात जिल्हाभरातील दोन हजार १९४ मंडळांनी मॉ दुर्गेची स्थापना केली. तसेच २६४ शारदा मंडळांनीही मॉ शारदेची स्थापना केली. सर्वत्र उत्सवाचे वातावरण असून जिल्हा मुख्यालयी जय अंबेच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला. यात पावसांच्या सरींनी वेगळीच रंगत भरली. मातेचे भक्त ढोलताशाच्या तालावर थिरकताना दिसत होते. पोलीस दप्तरी नोंद झालेल्या दोन हजार १९४ दुर्गा मंडळांनी पहिल्याच दिवशी मातेची स्थापना केली. यामध्ये शहरी भागातील ६२६ तर ग्रामीण भागातील एक हजार ५६८ दुर्गोत्सव मंडळ आहे. ४५८ गावांनी आदर्शाची परंपरा जोपासत ‘एक गाव एक दुर्गा’ या प्रमाणे स्थापना केली आहे. दुर्गोत्सवाप्रमाणेच शारदा उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा होतो. २६४ मंडळांनी माँ शारदेची स्थापना केली आहे. यातील ४२ मंडळ शहरी भागातील असून ग्रामीण भागात २२२ मंडळे आहेत. एक गाव एक शारदा हा आदर्श १२२ मंडळांनी जोपासला आहे. भावपूर्ण वातावरणात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. गणपती विसर्जनादरम्यान उमरखेड येथे झालेल्या घटनेनंतर संपूर्ण यंत्रणेलाच सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. दुर्गोत्सवाला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये, याची सतर्कता पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. (कार्यालय प्रतिनिधी) ही आहेत जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणे यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, नेर, आर्णी, वणी, मारेगाव, पांढरकवडा, घाटंजी, पुसद, उमरखेड, महागाव ही शहरी भागातील संवेदनशील ठिकाणे आहेत. ग्रामीण भागातील संवेदनशील ठिकाणामध्ये यवतमाळ तालुक्यातील रूईवाई, सावर, दिग्रसमधील कलगाव, महागाव येथील फुलसावंगी, खंडाळा येथील शेंबाळपिंपरी, पुसदमधील काळी दौ., जांबबाजार, वनवार्ला, धनसळ, बीटरगाव येथील ढाणकी, पोफाळी येथील मुळावा, उमरखेड येथील विडूळ, वडकी येथील खैरी, पारवा येथील कुर्ली, सदोबासावळी, वडगाव जंगल येथील अकोलाबाजार, येळाबारा, मेटीखेडा, शिरपूर येथील पुनवट, आर्णी येथील डेहणी, पाटण या ग्रामीण भागांचा संवेदनशील ठिकाणे म्हणून पोलिसात नोंद आहे. येथे विशेष बंदोबस्त लावण्यात आला आहे. दुर्गोत्सवासाठी तीन हजार पोलिसांचा राहणार बंदोबस्त दुर्गोत्सवात शांतता कायम राखण्यासाठी जिल्ह्यात २१०० पोलीस कर्मचारी तैनात केले आहे. ७०० होमगार्ड, एक एसआरपीएफची कंपनी, ६७ सहायक निरीक्षक व फौजदार, २९ पोलीस निरीक्षक, चार उपविभागीय पोलीस अधिकारी आणि या सर्वांचे नियंत्रण करण्याची जबाबदारी अपर पोलीस अधीक्षकांकडे सोपविण्यात आली आहे.