शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

२१९४ मॉ दुर्गांची स्थापना

By admin | Updated: October 2, 2016 00:17 IST

जिल्ह्यातील दुर्गोत्सवाचा देशपातळीवर लौकिक आहे. मोठ्या उत्साहात जिल्हाभरातील दोन हजार १९४ मंडळांनी मॉ दुर्गेची स्थापना केली.

उत्सव : १४ ठिकाणे संवेदनशील, २६४ शारदादेवी विराजमानयवतमाळ : जिल्ह्यातील दुर्गोत्सवाचा देशपातळीवर लौकिक आहे. मोठ्या उत्साहात जिल्हाभरातील दोन हजार १९४ मंडळांनी मॉ दुर्गेची स्थापना केली. तसेच २६४ शारदा मंडळांनीही मॉ शारदेची स्थापना केली. सर्वत्र उत्सवाचे वातावरण असून जिल्हा मुख्यालयी जय अंबेच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला. यात पावसांच्या सरींनी वेगळीच रंगत भरली. मातेचे भक्त ढोलताशाच्या तालावर थिरकताना दिसत होते. पोलीस दप्तरी नोंद झालेल्या दोन हजार १९४ दुर्गा मंडळांनी पहिल्याच दिवशी मातेची स्थापना केली. यामध्ये शहरी भागातील ६२६ तर ग्रामीण भागातील एक हजार ५६८ दुर्गोत्सव मंडळ आहे. ४५८ गावांनी आदर्शाची परंपरा जोपासत ‘एक गाव एक दुर्गा’ या प्रमाणे स्थापना केली आहे. दुर्गोत्सवाप्रमाणेच शारदा उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा होतो. २६४ मंडळांनी माँ शारदेची स्थापना केली आहे. यातील ४२ मंडळ शहरी भागातील असून ग्रामीण भागात २२२ मंडळे आहेत. एक गाव एक शारदा हा आदर्श १२२ मंडळांनी जोपासला आहे. भावपूर्ण वातावरणात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. गणपती विसर्जनादरम्यान उमरखेड येथे झालेल्या घटनेनंतर संपूर्ण यंत्रणेलाच सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. दुर्गोत्सवाला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये, याची सतर्कता पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. (कार्यालय प्रतिनिधी) ही आहेत जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणे यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, नेर, आर्णी, वणी, मारेगाव, पांढरकवडा, घाटंजी, पुसद, उमरखेड, महागाव ही शहरी भागातील संवेदनशील ठिकाणे आहेत. ग्रामीण भागातील संवेदनशील ठिकाणामध्ये यवतमाळ तालुक्यातील रूईवाई, सावर, दिग्रसमधील कलगाव, महागाव येथील फुलसावंगी, खंडाळा येथील शेंबाळपिंपरी, पुसदमधील काळी दौ., जांबबाजार, वनवार्ला, धनसळ, बीटरगाव येथील ढाणकी, पोफाळी येथील मुळावा, उमरखेड येथील विडूळ, वडकी येथील खैरी, पारवा येथील कुर्ली, सदोबासावळी, वडगाव जंगल येथील अकोलाबाजार, येळाबारा, मेटीखेडा, शिरपूर येथील पुनवट, आर्णी येथील डेहणी, पाटण या ग्रामीण भागांचा संवेदनशील ठिकाणे म्हणून पोलिसात नोंद आहे. येथे विशेष बंदोबस्त लावण्यात आला आहे. दुर्गोत्सवासाठी तीन हजार पोलिसांचा राहणार बंदोबस्त दुर्गोत्सवात शांतता कायम राखण्यासाठी जिल्ह्यात २१०० पोलीस कर्मचारी तैनात केले आहे. ७०० होमगार्ड, एक एसआरपीएफची कंपनी, ६७ सहायक निरीक्षक व फौजदार, २९ पोलीस निरीक्षक, चार उपविभागीय पोलीस अधिकारी आणि या सर्वांचे नियंत्रण करण्याची जबाबदारी अपर पोलीस अधीक्षकांकडे सोपविण्यात आली आहे.