शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

यशस्वी जीवनाचा सार ‘ध्याना’त

By admin | Updated: September 21, 2014 00:03 IST

धावपळीच्या युगात वाढलेला कामाचा ताण. यातून वाढलेले विस्मरण अलीकडे प्रत्येकासाठी चिंतेचा विषय झाला आहे. यावर मात करणे सहज शक्य आहे. त्यासाठी दररोज अर्धा तास ध्यान करण्याची आवश्यकता आहे.

जागतिक स्मृतिभ्रंश दिवस : मार्इंड पॉवर, मेंदूला हवी आठवणीची सवयंयवतमाळ : धावपळीच्या युगात वाढलेला कामाचा ताण. यातून वाढलेले विस्मरण अलीकडे प्रत्येकासाठी चिंतेचा विषय झाला आहे. यावर मात करणे सहज शक्य आहे. त्यासाठी दररोज अर्धा तास ध्यान करण्याची आवश्यकता आहे. याबाबत ‘लोकमत’ने मार्इंड पॉवरच्या कार्यकर्त्याशी साधलेला संवाद.जगातील यशस्वी लोकांनी आपल्या बुध्दीमत्तेचा केवळ दहा टक्केच वापर केला. अलीकडील तीन दशकाचा विचार केला तर अलबर्ड आईनस्टाईन हे सर्वात विद्वान व्यक्ती मानले जाते. परंतु त्यांनीही केवळ ४.५ टक्केच मेंदूचा वापर केला. सर्वसामान्य लोक आपल्या बुध्दीमत्तेचा दररोज केवळ ०.५ टक्केच वापर करतात. त्यांना आपल्या बुध्दीमत्तेचा वापर अधिक वाढविणे सहज शक्य आहे. दुसऱ्या भाषेत सांगायचे झाल्यास त्यांनी बुध्दीमत्तेचा वापर वाढविल्यास जीवनात यशाचे शिखर गाठणे सहज शक्य आहे.या बाबत सामाजिक प्रबोधन करणारे अजित डेहणकर यांनी सोप्या पध्दती सांगितल्या आहे. मेंदूला आठवण ठेवण्यासाठी सवय करावी लागते. आपण महत्त्वाच्या घटनांनाच लक्षात ठेवतो. प्रत्यक्षात प्रत्येक गोष्ठ मेंदूत रेकॉर्ड होते, ती बाहेर काढण्यासाठी शास्त्रशुध्द पध्दत आहे. यामध्ये ध्यान हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. यासोबतच हिप्नोथेरपीमधूनही माहिती मिळविणे शक्य आहे.आपले वय जितके तितकाच वेळ ध्यान केल्यास स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. यासाठी मांडी घालून बसणे आणि श्वासांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. दररोज आपण झोपी गेल्यावर जागृत मन झोपते. मात्र अर्धजागृत मन यावेळी कार्य करते. त्यामुळे उठल्यावर आपल्या मनात जे विचार येतात ते नोंदविले पाहिजे. कुठलीही घटना आपल्या सोबत घडण्यापूर्वी ती आपल्या डोक्यात घर करते. नंतर घटना घडते. त्यामुळे आपल्या डोक्यात सकारात्मक विचार असावे. आपल्या प्रत्येक विचाराचा वर्तनावर परिणाम होतो. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचे ध्ये निश्चित करून वाटचाल करीत राहिल तर, नेहमीच त्यामध्ये यश मिळते. त्यासाठी आत्मविश्वासाची आवश्यकता आहे. स्मृतिभ्रंश होऊ नये म्हणून दररोज घरातील सर्व वस्तू पाहून त्या कागदावर लिहिण्याचा प्रयत्न करावा. अथवा बाजारात ज्या गोष्टी आपण पाहिल्या, त्या लिहिण्याचा प्रयत्न केला तर या गोष्टी आपल्याला सहज आठवतात. (शहर वार्ताहर)