शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

शेतीचे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे

By admin | Updated: July 6, 2015 02:38 IST

हवामानाच्या बदलासोबतच कृषीचे तंत्रही बदलत आहे. या बदलासोबत शेतकऱ्यांनी बदल करणे आवश्यक आहे.

दिनेशकुमार जैन : कृषी प्रदर्शन व परिसंवादयवतमाळ : हवामानाच्या बदलासोबतच कृषीचे तंत्रही बदलत आहे. या बदलासोबत शेतकऱ्यांनी बदल करणे आवश्यक आहे. अलिकडे शेतीक्षेत्रात आलेल्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अंगिकार करण्यासोबतच आधुनिक पध्दतीने शेती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कृषी व फलोत्पादन विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी केले. कृषी जागृती सप्ताहानिमित्त बचत भवन येथे कृषी प्रदर्शनी व शेतकरी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्गाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुळकर्णी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, आत्माचे प्रकल्प संचालक अनिल इंगळे, कृषी विकास अधिकारी जगन राठोड उपस्थित होते. सुरूवातीस मान्यवरांच्या हस्ते कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन व दालनांची पाहणी करण्यात आली. अजुनही ५५ टक्के नागरिक शेती करतो. त्यामुळे शेती व्यवसायाकडे कदापी दुर्लक्ष करता येत नाही. शेती क्षेत्राला ऊर्जा देण्यासाठी शासन विविध प्रकारच्या योजना व अनुदानाचे कार्यक्रम राबविते. अलिकडे हवामानातील बदलामुळे शेती पिकांवर परिणाम होत आहे. या बदलानुसार शेतकऱ्यांनीही बदलने आवश्यक असून तशी पिकपध्दती व तंत्रज्ञान अंगिकारावे, असे जैन म्हणाले. एकापेक्षा जास्त पिके घेता यावे म्हणून शेतकऱ्यांनी शाश्वत सिंचनाच्या सोईकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने शेततळे बांधण्याबाबत विचार करणे आवश्यक आहे. शेततळे उभे राहिल्यास एकापेक्षा जास्त पिके घेता येईल, पयार्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत होणार आहे. शेततळ्यांच्या जनजागृतीचा कार्यक्रम घेण्याची सूचना यावेळी जैन यांनी केली. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन कॉल सेंटरची योजना राबवित आहे. तसेच हवामान आधारीत सल्ला, पाऊस पाण्याचा अंदाज याबाबतची माहिती शेतकऱ्यांना विनामुल्य दिली जाते. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करून घ्यावी, असेही जैन यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी आपल्या मातीचे परिक्षण करावे. कृषी विभागाच्या ग्रामीण पातळीवरील सहाय्यकांनी शेतकऱ्यांशी संपर्क वाढवावा. त्यांच्या अडचणी सोडविण्यास त्यांना मदत करावी, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी शेतकऱ्यांनी स्वत: बियाणे तयार करावे, असे सांगितले. बियाण्यांसोबतच कृषी उत्पादन कंपन्या शेतकऱ्यांच्या तयार झाल्या पाहिजे. शेतकऱ्यांनी आत्मविश्वासाने पुढे गेले पाहिजे. त्यासाठी अधिक मेहनतीची तयारी ठेवावी असेही ते म्हणाले. यावेळी डॉ. कलशेट्टी यांचेही भाषण झाले. (शहर वार्ताहर)सचिवांची पाठ फिरताच प्रदर्शनी गुंडाळलीरविवारी आयोजीत कृषी प्रदर्शनीला शेतकऱ्यांची प्रचंडी गर्दी झाली होती. अप्पर मुख्य सचिवांनी कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन केले. त्यांचे मार्गदर्शनपर भाषण आटोपताच अप्पर सचिव परतले. अप्पर सचिव परतताच प्रदर्शन गुंडाळण्यात आले. ४ वाजताच्या सुमारास या प्रदर्शनस्थळी भेट देण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. अनेक शेतकरी अनभिज्ञकृषी सप्ताहानिमित्त कृषी विभागाने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाची पूर्व प्रसिद्धीच करण्यात आली नाही. ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांना सोडाच प्रसिद्धी माध्यमातील प्रतिनिधींनाही या कार्यक्रमाची माहिती अगदी एक दिवस अगोदर मिळाली. यावरून कृषी विभागाच्या नियोजनातील फोलपणा दिसून येते.