शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

दाभा येथील चाळीस दिवसांच्या दिंडीची समाप्ती

By admin | Updated: September 26, 2016 02:42 IST

सर्वधर्म समभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या दाभा(पहूर) येथील चाळीस दिवसांच्या दिंडीची समाप्ती उत्साहात झाली.

एकात्मतेचे प्रतीक : विविध कार्यक्रमांची रेलचेल, भजनी मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग, युवकांचे लोटांगणदाभा(पहूर) : सर्वधर्म समभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या दाभा(पहूर) येथील चाळीस दिवसांच्या दिंडीची समाप्ती उत्साहात झाली. ८९ वर्षांपासून ही दिंडी काढली जात आहे. बग्गी जावराचे श्री संत रामजी महाराज यांनी महामारीच्या काळात १९२७ साली आषाढ कृष्ण बारस या दिवसापासून ४० दिवसांची दिंडी सुरू करायला लावली. संत रामजी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे यादवराव परोपटे यांनी एकट्याने ही दिंडी सुरू केली. आज ही दिंडी संपूर्ण गावाची दिंडी आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून दिंडी निघाली. यात पालखी, वारकरी, भजन मंडळ, श्री गुरुदेव सेवा मंडळ, शंकरराव शेंडे व रंजन ठवकर यांची अवधुती भजन मंडळाची मांड, भोलेनाथ भजन मंडळ, आदिवासी भजन मंडळ, अंबिका महिला भजनी मंडळ, श्री संत मोहन महाराज महिला भजनी मंडळ आदी मंडळांचा समावेश होता. दिंडीसोबत योगेश फाळे, अवधुत ठवकर, अंकुश मुडे, रोशन वनवे, मंगेश सडसडे, अमोल बानते, संदीप बानते, सागर राऊत, युवराज भडके, मंगेश शेंडे, सुमित डायरे, आकाश गावंडे, सुनील बानते, अरविंद पंचबुद्धे, गोपाल भडके, अक्षय बानते, संतोष पोयाम, फकिरा वानखेडे, सागर पंचबुद्धे हे उघड्या अंगाने हात जोडून लोटांगण गेले. विठ्ठल रुक्मिणी मंदिर, संत मोहन महाराज मंदिर, राम मंदिर, संत बळीराम महाराज मठ, हनुमान मंदिर, संत मोहन महाराज तपोभूमी मंदिराच्या पायऱ्या लोटांगणाने चढले व उतरले. गावातील काही चौकात गजर व भारूडाच्या तालावर गोफ विणून उकलले. निखिल मेहत्रे, वृषभ अंजीकर, प्रवीण गांजरे, गोलू फाळे, सुरज बोकाडे, निखिल बाहुटे, कपिल घावडे, निखिल परोपटे, माधव अंजीकर, प्रमोद फाळे, सुनील अंजीकर, शालिग्राम कानतोडे, श्रावण परोपटे, आकाश लोखंडे आदी सहभागी झाले होते. आमदार प्रा.डॉ. अशोक उईके यांनीही दिंडीला भेट दिली. माजी मंत्री वसंत पुरके दिंडीत सहभागी झाले होते. या मान्यवरांचा मानाचे शेले, नारळ देऊन सन्मान करण्यात आला. दिंडीत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पोहोचल्यावर पारंपरिक आरत्या झाल्या. हभप गणेश महाराज येलकर यांच्या हस्ते काला वाटपानंतर दिंडीची समाप्ती झाली. यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पदाधिकारी व ट्रस्टींनी भजन मंडळ आणि साधूसंतांचा मानाचे शेले व नारळ देऊन सन्मान केला. (वार्ताहर)