शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

अतिक्रमण हटावला आडकाठी

By admin | Updated: June 11, 2015 02:23 IST

येथील जत्रा मैदानावरील अतिक्रमण हटविण्यासाठी पोलिसांची आडकाठी आडवी येत आहे.

वणी : येथील जत्रा मैदानावरील अतिक्रमण हटविण्यासाठी पोलिसांची आडकाठी आडवी येत आहे. पोलीस बंदोबस्त न मिळाल्यामुळे बुधवारपासून सुरू होणारी अतिक्रमण हटाव मोहीम तूर्तास तरी रखडली आहे.येथील नगरपरिषदेला ब्रिटीश सरकारने २ जुलै १९३३ रोजी ७४ एकर जागा साप्ताहिक बाजार, बैल बाजार व अन्य सामाजिक, सार्वजनिक कामासाठी दिली होती. गेल्या ८२ वर्षांपासून ही जागा नगरपरिषदेच्या मालकीची आहे. मात्र या विस्तीर्ण जागेकडे कुणाचेच लक्ष नाही. गेल्या ८२ वर्षांच्या कालावधीत नगरपरिषदेला ही जागा सुरक्षित ठेवता आली नाही. परिणामी व्यावसायीकांनी तेथे अतिक्रमण करून आपले दुकान थाटले. या जत्रा मैदानावर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढतच गेले. त्यामुळे ७४ एकर जागेपैकी आता केवळ ३० एकर जागाच शिल्लक असल्याचे दिसनू येत आहे.नगरपरिषदेला ब्रिटीशांकडून मिळालेली ही जागा नगरपरिषदेला विकता येत नाही अथवा कुणाला हस्तांतरीतही करता येत नाही. या विस्तीर्ण जागेचे क्षेत्रफळ ३२ लाख ७३ हजार ३९८ चौरस फूट आहे. शहरात मोक्याच्या ठिकाणी ही जागा आहे. मात्र आजपर्यंत या जागेकडे नगरपरिषदेचे दुर्लक्षच झाले. परिणामी अतक्रिमणधारकांनी अतिक्रमणाचा सपाटा अद्याप सुरूच ठेवला. दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत गेल्याने आता या जागेवर आठवडी बाजारही भरणे कठीण झाले आहे. याच जागेवर दरवर्षी रंगनाथ स्वामींची यात्रा भरते. आता यात्रेसाठीही मोजकीच जागा शिल्लक आहे.याच जागी विदभातील प्रसिद्ध बैलबाजार भरतो. दरवर्षी दसरा उत्सव होतो. इतर विविध कार्यक्रमही होतात. नगरपरिषदेच्या सर्व शाळांचा क्रीडा महोत्सव तेथेच होतो. चिमुकल्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमही होतात. तथापि या मैदानाच्या सभोवताल अतिक्रमण झाल्याने मोठी बिकट परिस्अिती निर्माण झाली आहे. भविष्यात नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाच खेळण्याकरिता मैदान राहील की नाही, अशी परिस्थिती उत्पन्न झली आहे. या जागी आता चिकन, मटन विक्रेते, इतर उद्योग, लाकडांचे टाल, भंगाराची दुकाने लागली. आठवडी बाजारालाही नियोजित जागा भेटत नाही. परिणामी बाजार रस्त्यावरच भरतो. त्यामुळे ही समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. तरीही अतक्रिमणधारकांना साधी नोटीसही बजावण्यात येत नव्हती. याबाबत ‘लोकमत’ने नुकतेच ५ जूनच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. त्या वृत्तानंतर नगरपरिषद व प्रशासन खडबडून जागे झाले. लगेच प्रशासनाने जाहीर सूचना व नोटीस देऊन हे अतिक्रमण १0 जूनपासून हटविण्याची घोषणा केली. मात्र बुधवारी १0 जून उजाडताच ही मोहीम सुरूच झाली नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.नगरपरिषदेने जाहीर सूचना व नोटीस दिल्यानंतर काही अतिक्रमणधारकांनी विविध लोकप्रतिनिधी तथा पुढाऱ्यांकडे धाव घेतली. मात्र नसती झंझट नको म्हणून कुणीही या प्रकरणात हात घातलाच नाही. अतिक्रमणधारकांनी पावसाळ्याच्या तोंडावर आम्ही कुठे जावे असे म्हणत, ही मोहीम सुरू करण्यास विरोध दर्शविला. अतिक्रमण हटविण्यासाठी विशिष्ट मुदत देण्याची मागणीही त्यांनी केली. दुसरीकडे काही अतिक्रमणधारकांनी मोहीम सुरू होण्याच्या धाकाने स्वत:हूनच अतिक्रमण काढणेही सुरू केले. दरम्यान पुरेसा पोलीस बंदोबस्त न मिळाल्यामुळे ही अतिक्रमण हटाव मोहीम तूर्तास रखडल्याचे मुख्याधिकारी गोपिचंद पवार यांनी सांगितले. त्यामुळे अतिक्रमण हटावला आता पोलिसांची आडकाठी कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी) उपविभागीय अधिकाऱ्यांशी करणार चर्चापोलिसांना नगरपरिषदेने पोलीस बंदोबस्ताच मागणी केली होती. त्यासाठी पैसे भरण्याचीही तयारी दर्शविली होती. मात्र बुधवारी पोलिसांनी बंदोबस्त पुरविलाच नाही. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होऊ शकली नाही. आता मुख्याधिकारी गोपिचंद पवार आजच या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार होते. मात्र तेथे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी पवार यांना वणीत जाऊन उपविभागीय अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करण्याची सूचना दिली. त्यामुळे पवार आता वणीत परतल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करणार आहे. या चर्चेतून कोणता तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.