शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
2
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
3
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
4
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
5
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
6
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
7
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
8
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
9
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
10
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
11
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
12
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
13
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
14
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
15
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
16
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
17
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
18
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
20
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी

पुसद शहरातील पुतळ्यांसमोर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:43 IST

फोटो पुसद : नगर परिषदेने महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोरील अतिक्रमण काढून एक आठवडा उलटला. मात्र, पुन्हा तेथे अतिक्रमण करण्यात ...

फोटो

पुसद : नगर परिषदेने महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोरील अतिक्रमण काढून एक आठवडा उलटला. मात्र, पुन्हा तेथे अतिक्रमण करण्यात आले. याच्या निषेधार्ह अखिल भारतीय समता परिषदेने सर्व पुतळ्यांसमोर भाजीपाला व फळ विक्रीचे हातगाडे लावून निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरात रस्ते, जागा शिल्लक असताना मुद्दाम महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोरच अतिक्रमण करण्यात आले. यामुळे पुतळ्याची वारंवार विटंबना होत आहे. नगर परिषदेकडून त्याला संरक्षण दिले जात असल्याचा आरोप समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम जाधव यांनी केला आहे.

मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड यांना अतिक्रमण काढण्याची विनंती केली. मात्र, अद्याप अतिक्रमण काढण्यात आले नाही. रस्त्यावर अतिक्रमण करून भाजीपाला व फळे विकणारे मास्क वापरत नाहीत. सामाजिक अंतर ठेवत नाहीत. कोरोनाविषयी काळजी घेत नाही. यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच आरोपही त्यांनी केला. काही लोकप्रतिनिधी अतिक्रमण करणाऱ्यांच्या पाठीशी असल्यामुळेच असे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप आत्माराम जाधव यांनी केला.

महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर अतिक्रमण करणारा फळविक्रेता नगर परिषद, महसूल, पोलीस प्रशासन आणि नागरिकांना वरचढ ठरत आहे. या कृतीच्या निषेधार्थ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने आंदोलनाची हाक दिली आहे.

बॉक्स

सर्व पुतळ्यांसमोर दुकाने लावणार

आता समता परिषदेने धरणे किंवा उपोषण न करता संचारबंदी संपल्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वसंतराव नाईक, महात्मा गांधी, बाबासाहेब मुखरे, सुभाषचंद्र बोस आदींच्या पुतळ्यासमोरच भाजीपाला, फळे आदींचे गाडे लावण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी गरीब नागरिकांना व्यवसाय सुरू करून देण्याचे नियोजन केले. महात्मा फुले पुतळ्यासमोरील अतिक्रमण मुख्याधिकारी, नगरसेवक, आमदार, महसूल व पोलीस प्रशासन यांना मान्य असेल, तर त्यांनी आमचे अतिक्रमण मान्य करावे व आम्ही करणार असलेले अतिक्रमण काढू नये, त्यालाही संरक्षण द्यावे, अशी मागणी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम जाधव यांनी केली.

आता समता परिषदेने धरणे किंवा उपोषण न करता संचारबंदी संपल्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वसंतराव नाईक, महात्मा गांधी, बाबासाहेब मुखरे, सुभाषचंद्र बोस आदींच्या पुतळ्यासमोरच भाजीपाला, फळे आदींचे गाडे लावण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी गरीब नागरिकांना व्यवसाय सुरू करून देण्याचे नियोजन केले. महात्मा फुले पुतळ्यासमोरील अतिक्रमण मुख्याधिकारी, नगरसेवक, आमदार, महसूल व पोलीस प्रशासन यांना मान्य असेल, तर त्यांनी आमचे अतिक्रमण मान्य करावे व आम्ही करणार असलेले अतिक्रमण काढू नये, त्यालाही संरक्षण द्यावे, अशी मागणी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम जाधव यांनी केली.