शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
2
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
3
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
4
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
5
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
6
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
7
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
8
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
9
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
10
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
11
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
12
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
13
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
14
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
15
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
16
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
17
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
18
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
19
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
20
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!

वणीतील जत्रा मैदानावर अतिक्रमणाचा सपाटा सुरू

By admin | Updated: November 3, 2014 23:33 IST

वणी शहरात दरवर्षी गुढी पाडव्यापासून जवळपास ३५ दिवस चालणारी जत्रा भरते. या जत्रेसाठी खास ३५ एकरांचे मैदान उपलब्ध आहे. मात्र आता नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे या मैदानावर अतिक्रमणाचा

वणी : वणी शहरात दरवर्षी गुढी पाडव्यापासून जवळपास ३५ दिवस चालणारी जत्रा भरते. या जत्रेसाठी खास ३५ एकरांचे मैदान उपलब्ध आहे. मात्र आता नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे या मैदानावर अतिक्रमणाचा सपाटा सुरू असल्याने भविष्यात हे मैदानच नामशेष होण्याची भीती वर्तविली जात आहे.नगरपरिषदेजवळ तब्बल ३५ एकरांचे भव्य यात्रा मैदान आहे़ या मैदानावर दरवर्षी रंगनाथ स्वामींच्या नावाने जत्रा भरते़ यावेळी भरणारा बैलबाजार विदर्भात ख्यातीप्राप्त आहे़ या मैदानावर आता अतिक्रमणाचा सपाटा सुरू असल्याने हे मैदान दिवसेंदिवस छोटे होत आहे. येत्या काही वर्षांत जत्रेसाठी मैदान शिल्लक राहील की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे रंगनाथ स्वामी जत्रेपासून नगरपरिषदेला चांगले उत्पन्नही मिळते. याच जत्रा मैदानावर दरवर्षी दसरा महोत्सव होतो़ आता या मैदानाकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत आहे़ या मैदानाच्या ऐन मध्यभागी हनुमान मंदिर बांधले गेले आहे. त्यासाठी मैदानाची बरीच जागा व्यापली गेली आहे़ या मंदिरात सभा मंडप, स्वयंपाकगृहाची व्यवस्था आहे. परिणामी मंदिर समिती हे सभागृह मंगल कार्यासाठी किरायाने देऊन उत्पन्न प्राप्त करीत आहे. तथापि त्या जागेचा कर मात्र नगरपरिषद भरते. विशेष म्हणजे नगरपरिषदेची कोणतीही परवानगी न घेता, या परिसरात दारू दुकाने, बीअर बार, सिनेमा टॉकिज, आरामशीन थाटण्यात आली आहे. वणीची जत्रा जवळपास महिनाभर सुरू राहाते. रंगपंचमीपर्यंत ही जत्रा सुरू राहाते. या जत्रेला पूर्वी खूप गर्दी होत होती. आता मात्र मनोरंजनाची साधने घरीच उपलब्ध झाल्याने अनेकांनी जत्रेकडे पाठ फिरविली आहे. त्यातच जत्रेत नेहमी येणारे संगीत कलापथक बंद झाल्यानेही जत्रेवर अवकळा आली आहे. तरीही परिसरातील अनेक नागरिक या जत्रेला दरवर्षी हजेरी लावत असतात. शहरातील नागरिकही विरंगुळा म्हणून जत्रेला भेट देत असतात. आता मात्र तेथे योग्य सुविधा मिळत नसल्याने अनेक जण जत्रेत जाण्याचे टाळतात.जत्रेसाठी ३५ एकरांचे मैदान असूनही जत्रेत सुटसुटीत जागा नसते. दाटीवाटीने दुकाने लागलेली असतात. तेथे सतत धूळही उडत असते. साधे पाणी मारण्याची तसदी कुणी घेत नाही. धुळीमुळे वातावरणात प्रदूषण होते. नागरिकांच्या शरीरात धुळीचे कण जाऊन त्यांना त्रास सहन करावा लागतो. विस्तीर्ण मैदान असूनही त्याची योग्य देखभाल होत नसल्याने हे परिस्थिती ओढवली आहे. हे मैदान दिवसेंदिवस छोटे होत असल्याने भविष्यात तर तेथे खरच जत्रा भरणार की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)