शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
4
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
5
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
6
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
7
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
8
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
9
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
10
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
11
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
12
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
13
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
14
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
15
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
16
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
17
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
18
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
19
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
20
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी निवाऱ्यांना अतिक्रमणाचा विळखा

By admin | Updated: September 9, 2014 23:59 IST

लाखो रुपये खर्च करून नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेले येथील दारव्हा नाक्यावरील प्रवासी निवारे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. एवढेच नव्हे तर प्रवाशांना बसण्यासाठी

यवतमाळ : लाखो रुपये खर्च करून नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेले येथील दारव्हा नाक्यावरील प्रवासी निवारे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. एवढेच नव्हे तर प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या बाकड्यांना आॅईल लावून ठेवले जाते. जेणे करून त्यावर कुणीही बसणार नाही. ही बाब वारंवार संबंधितांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे एसटी महामंडळाकडूनही कुठलीही कारवाई केली जात नाही. निवाऱ्याच्या अगदी बाजूला विविध प्रकारच्या व्यावसायिकांनी आपली दुकानदारी थाटली आहे. निरूपयोगी वस्तू या निवाऱ्याच्या अगदी बाजूला टाकून दिल्या जातात. त्याच्या दुर्गंधीमुळे निवाऱ्याजवळ थांबणाऱ्या नागरिकांचा जीव कासावीस होतो. त्यामुळे ते सुस्थितीत असलेल्या प्रवासी निवाऱ्याऐवजी भर पावसात बाहेर थांबून बसची प्रतीक्षा करतात.अमरावती, दारव्हा मार्गावर धावणाऱ्या बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांचा उन्ह, पावसापासून बचाव व्हावा यासाठी दारव्हा नाक्यावर उत्कृष्ट दर्जाचे दोन प्रवासी निवारे उभारण्यात आले आहे. जवळपास नागरिक याचा उपयोगही घेतात. शिवाय, या मार्गावर असलेल्या शाळा-महाविद्यालयांमध्ये जाणारे विद्यार्थीसुद्धा स्कूल बस आदी वाहनांची प्रतीक्षा या ठिकाणी बसून करतात. परंतु अलीकडे या निवाऱ्यावर अतिक्रमण करणाऱ्यांची वक्रदृष्टी पडली आहे. या निवाऱ्याच्या मागील बाजूस काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. काहींनी तर निवाऱ्याच्या अगदी बाजूला आपला व्यवसाय थाटला आहे. सकाळपासूनच या ठिकाणी होणारी गर्दी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. विविध प्रकारचे शिल्लक राहिलेले खाद्य पदार्थ निवाऱ्याच्या अगदी बाजूला टाकले जाते. पावसामुळे कुजलेल्या या पदार्थाच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. ही बाब जागरूक नागरिकांनी संबंधित विभागाच्या लक्षात आणून दिली. परंतु सुरुवातीपासूनच सहकार्याविषयी नकारात्मक भूमिका घेतलेल्या एसटी महामंडळाने ही बाबही फारशी गांभीर्याने घेतली नाही. प्रवासी निवारा नियमित स्वच्छ राहावा, यासाठी महामंडळाला पत्र देण्यात आले होते. मात्र त्यांनी हात वर केले. आता अतिक्रमणात सापडलेले प्रवासी निवारे मुक्त करावे, यासाठी नागरिकांनी केलेल्या पाठपुराव्यालाही ठोकरण्यात आले. दारव्हा, नेर, अमरावती मार्गाने धावणाऱ्या बसद्वारे प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. लांब पल्ल्याच्या जसे औरंगाबाद, पुणे, बीड, अकोला, परतवाडा, शेगाव, सोलापूर, शिर्डी आदी बसने प्रवास करणारे नागरिकही या प्रवासी निवाऱ्यात बसची प्रतीक्षा करत थांबतात. त्यांना अतिक्रमणधारकांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. संबंधितांनी गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)