शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

दत्त चौक रोड परिसराला अतिक्रमणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 05:00 IST

दहा मीटर रुंदीचा हा मार्ग प्रत्यक्षात पाच मीटरही वाहनधारकांना वापरायला मिळत नाही. एक तर दुकानांचे साहित्य रस्त्यावर आले, त्यापुढे ग्राहकांंचे पार्किंग, त्यापुढे हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण अशी रस्त्याच्या दुतर्फा अवस्था आहे. त्यामुळे तेथून वाहन काढताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. शहराचे हृदयस्थळ असल्याने तेथे सतत गर्दी पहायला मिळते. अतिक्रमण हे या गर्दीचे प्रमुख कारणे मानले जाते.  

ठळक मुद्देनगरपालिकेचे दुर्लक्ष : दुकानांचे साहित्य रस्त्यावर, वाहन पार्किंग वांद्यात, फेरीवाल्यांची गर्दी

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेने दोन कोटी रुपये खर्चून बांधकाम केलेल्या नेताजी चौक ते संतसेना चौक, पुढे दत्त मंदिर - बसस्थानक पर्यंतच्या सुमारे एक किलोमीटरच्या मार्गावर ठिकठिकाणी अतिक्रमण झाले आहे. दहा मीटर रुंदीचा हा मार्ग प्रत्यक्षात पाच मीटरही वाहनधारकांना वापरायला मिळत नाही. एक तर दुकानांचे साहित्य रस्त्यावर आले, त्यापुढे ग्राहकांंचे पार्किंग, त्यापुढे हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण अशी रस्त्याच्या दुतर्फा अवस्था आहे. त्यामुळे तेथून वाहन काढताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. शहराचे हृदयस्थळ असल्याने तेथे सतत गर्दी पहायला मिळते. अतिक्रमण हे या गर्दीचे प्रमुख कारणे मानले जाते.  यवतमाळ शहरात आर्णी रोड, पांढरकवडा रोड, दारव्हा रोड, धामणगाव रोड अशा सर्वच प्रमुख मार्गांवर अतिक्रमणाची ही समस्या आहे. त्यातही हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण सर्वाधिक आहे. वाहतूक पोलीस तैनात असूनही या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे शहराचे आरोग्य बिघडले. 

हातगाड्यांचे सर्वाधिक अतिक्रमण नेताजी चौक ते संत सेना चौक अर्थात दत्त मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर फळे, भाजीपाला विकणाऱ्या हातगाडी व्यावसायिकांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे. आधीच व्यावसायिक दुकानाबाहेर, त्याच्या पुढे हातगाड्या अशी अवस्था पहायला मिळते. 

वाहन चालक वाहतूक पोलिसांच्या निशाण्यावर

 दत्त चौक परिसरात वाहनांच्या पार्किंगला जागाच नाही. त्यात तेथे वाहतूक पोलीस तैनात असतात. अशा वेळी दुकानासमोर वाहन पार्क केल्यास ते रस्त्यावर आले असे म्हणून वाहनचालकांना पोलिसांकडून दंडाचे चलान दिले जाते. 

 यवतमाळ शहरात प्रमुख मार्गांवर कुठेच पार्किंगची अधिकृत व्यवस्था नाही. नव्याने बांधलेल्या आर्णी रोडवर तर आणखीच अडचण आहे. फुटपाथच्या बाहेर रस्त्यावर पार्किंग केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. 

अतिक्रमण हटाव मोहीम ६ डिसेंबरपूर्वी राबविली जाणार आहे. त्यासाठी पोलिसांना मदत मागण्यात आली आहे. तक्रारी आलेले अतिक्रमण प्राधान्याने उठविले जाणार आहे. कुठे अतिक्रमण असेल तर नागरिकांनी तक्रारी कराव्या. शहरातील सर्व रस्त्यांवरचे वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविले जाणार आहे. दुकानांचे अतिक्रमण असेल तर व्यावसायिकांना त्यासाठी नोटीस बजावली जाणार आहे. - राहुल पळसकरअतिक्रमण विरोधी पथक प्रमुख 

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण