शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

जुन्या पेंशनसाठी कर्मचाऱ्यांची धडक

By admin | Updated: October 16, 2016 00:53 IST

परिभाषित अंशदायी सेवानिवृत्ती योजनेमुळे कर्मचाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

जिल्हा कचेरीवर मोर्चा : मागण्यांचे निवेदन सादर यवतमाळ : परिभाषित अंशदायी सेवानिवृत्ती योजनेमुळे कर्मचाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. यावेळी ‘एकच मिशन जुनी पेन्शन’ या घोषणेने वातावरण दणाणून गेले होते. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या नेतृत्वात दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जिल्हा परिषद परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली. यात वणी, पांढरकवडा, घाटंजी, पुसद, नेर, आर्णी, दिग्रस अशा सर्वच तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. मोर्चा बसस्थानक चौक, नगर भवन अशा मार्गाने एलआयसी चौकात पोहोचला. तेथे सभा घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी मार्गदर्शन केले. एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांना मागणीचे निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष नदीम पटेल, जिल्हा सचिव प्रवीण बहादे, शुभांगी जोई, संजय येवतकर, आशीष जयसिंगपुरे, शैलेश राऊत, सुरेंद्र दाभाडकर, मिलिंद सोळंकी, प्रवीणा पाटील आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)१३०० कुटुंब वाऱ्यावर१ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना १९८२ ची पेन्शन योजना रद्द करून नवीन अंशदान पेन्शन योजना लागू करण्यात आली. या योजनेमुळे सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना तुटपुंजा लाभ मिळतो. २००५ नंतर लागलेले १३७५ कर्मचारी मृत्यू पावले असून त्यांच्या कुटुंबियांना शासनाने वाऱ्यावर सोडल्याचे निवेदनात म्हटले आहे.