शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
5
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
6
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
7
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
8
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
9
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
10
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
11
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
12
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
13
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
14
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
15
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
16
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
17
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
18
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
19
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
20
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान

जुन्या पेंशनसाठी कर्मचाऱ्यांची धडक

By admin | Updated: October 16, 2016 00:53 IST

परिभाषित अंशदायी सेवानिवृत्ती योजनेमुळे कर्मचाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

जिल्हा कचेरीवर मोर्चा : मागण्यांचे निवेदन सादर यवतमाळ : परिभाषित अंशदायी सेवानिवृत्ती योजनेमुळे कर्मचाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. यावेळी ‘एकच मिशन जुनी पेन्शन’ या घोषणेने वातावरण दणाणून गेले होते. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या नेतृत्वात दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जिल्हा परिषद परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली. यात वणी, पांढरकवडा, घाटंजी, पुसद, नेर, आर्णी, दिग्रस अशा सर्वच तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. मोर्चा बसस्थानक चौक, नगर भवन अशा मार्गाने एलआयसी चौकात पोहोचला. तेथे सभा घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी मार्गदर्शन केले. एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांना मागणीचे निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष नदीम पटेल, जिल्हा सचिव प्रवीण बहादे, शुभांगी जोई, संजय येवतकर, आशीष जयसिंगपुरे, शैलेश राऊत, सुरेंद्र दाभाडकर, मिलिंद सोळंकी, प्रवीणा पाटील आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)१३०० कुटुंब वाऱ्यावर१ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना १९८२ ची पेन्शन योजना रद्द करून नवीन अंशदान पेन्शन योजना लागू करण्यात आली. या योजनेमुळे सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना तुटपुंजा लाभ मिळतो. २००५ नंतर लागलेले १३७५ कर्मचारी मृत्यू पावले असून त्यांच्या कुटुंबियांना शासनाने वाऱ्यावर सोडल्याचे निवेदनात म्हटले आहे.