शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

कर्मचाऱ्यांचे हलचल रजिस्टरच गायब

By admin | Updated: August 4, 2016 00:58 IST

जिल्हा परिषदेच्या अनेक विभागातून हलचल रजिस्टरच गायब झाले आहे. बुधवारी काही विभागात या रजिस्टरबाबत विचारणा केली असता,

जिल्हा परिषद : शासकीय वेळेत कर्मचारी राहतात खासगी कामात व्यस्त यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या अनेक विभागातून हलचल रजिस्टरच गायब झाले आहे. बुधवारी काही विभागात या रजिस्टरबाबत विचारणा केली असता, ते नेमके कुठे ठेवले आहे, याबाबत बहुतांश कर्मचारी अनभिज्ञ आढळले. मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेचा थेट जनतेशी संबंध येतो. शासनाच्या विविध योजना याच स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत राबविण्यात येतात. जनतेचे प्रतिनिधी याच सभागृहात निवडून येतात. ते आपल्या परिसरातील समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेचा उपयोग करतात. त्यातून ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न होतो. तथापि सध्या अनेक योजना थेट ग्रापंचायतीमार्फत राबविण्यात येत असल्याने अलिकडे या संस्थेचे महत्त्व कमी होऊ लागले आहे. जिल्हा परिषदेचा पसारा खूप मोठा आहे. विविध विभाग आहेत. या विभागांमध्ये शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना शासन निर्णयानुसार विविध सुट्या आणि हक्काच्या रजाही मिळतात. ही सुविधा असूनही अनेक कर्मचारी कार्यालयीन वेळेतही आपले वैयक्तीक काम उरकताना दिसतात. रजा न घेता ते अनेकदा कार्यालयातून गायब होतात. जिल्ह्यातून आलेल्या ग्रामस्थांनी त्या विभागात विचारणा केली असता, त्यांना संबंधित कर्मचारी अमुक बैठकीला गेले, तमुक ठिकाणी कामानिमित्त गेले, साहेबांकडे गेले, दौऱ्यावर गेले, अशी उत्तरे दिली जातात. वास्तविक कार्यालयातून बाहेर पडताना कर्मचाऱ्याला हलचल रजिस्टरवर तो नेमका कोणत्या कामासाठी कुठे जात आहे, याचे लेखी विवरण लिहिणे आवश्यक असते. मात्र बहुतांश विभागात हलचल रजिस्टर कुठे ठेवले आहे, हेच त्यांना माहिती नाही. माहित असले, तरी त्यावर नोंद करणे त्यांच्या सोयीचे नसते. त्यामुळे कुणीही कधीच या रजिस्टरला विचारत नाही. त्यामुळे त्या विभागातील कर्मचारी नेमका कुठे गेला, हे विभाग प्रमुखालाही अनेकदा माहिती नसते. (शहर प्रतिनिधी)