शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

नेर नगरपरिषदेमध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा

By admin | Updated: June 25, 2017 00:09 IST

नगरपरिषदेत निर्माण झालेला कर्मचाऱ्यांचा तुटवडा शहर विकासात अडथळा ठरत आहे.

केवळ तिघांवर काम : १५ कर्मचाऱ्यांची एकाचवेळी बदली लोकमत न्यूज नेटवर्क नेर : नगरपरिषदेत निर्माण झालेला कर्मचाऱ्यांचा तुटवडा शहर विकासात अडथळा ठरत आहे. केवळ तीन कर्मचाऱ्यांच्या भरवशावर या पालिकेचा कारभार सुरू आहे. कार्यरत असलेल्या १८ पैकी १५ कर्मचाऱ्यांची बदली झाली. यात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. १ जून रोजी या पालिकेच्या कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. मात्र रिक्त जागांवर नवीन कर्मचारी पाठविण्यात आलेला नाही. शहरातील ४५ हजार नागरिकांचा थेट संबंध नगरपरिषदेशी येतो. शहर स्वच्छतेसह सांडपाण्याच्या नाल्या, पिण्याचे पाणी आदी बाबींची पूर्तता नगरपरिषदेकडून केली जाते. शहराचा व्याप पाहता आधीच तुटवडा असताना बदली सत्र राबविण्यात आले. एका-एका कर्मचाऱ्याकडे दोन-दोन टेबलचा प्रभार होता. आता या टेबलवरील सर्व कामे ठप्प पडली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता, पर्यवेक्षक स्थापत्य अभियंता, नगर अभियंता (विद्युत), लेखा परिक्षक, लेखापाल, कार्यालय निरीक्षक, कर निरीक्षक, सहायक निरीक्षक, मिळकत पर्यवेक्षक, सहायक विधी व कामगार पर्यवेक्षक, सहायक अग्निशमन पर्यवेक्षक, नगर रचनाकार, सहायक समाज कल्याण अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आदी पदे एकाचवेळी रिक्त झाली आहेत. त्यामुळे तीन कर्मचाऱ्यांवर कारभार सुरू आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी धीरजकुमार गोहाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.