शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
4
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
5
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
6
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
7
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
8
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
9
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
10
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
11
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
12
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
14
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
15
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
16
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
17
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
18
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
19
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा

कर्मचारी चिंतेत, तर नागरिक कोंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 22:37 IST

महामंडळाने आर्थिक नाकेबंदी केल्याने त्यांचा उधार-उसणवार करून उदरनिर्वाह सुरू आहे. दुसरीकडे एसटी बसेस बंद असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. बस नसल्याने दुचाकीवरून महत्त्वाची कामे उरकावी लागत आहे. शिवाय, खासगी वाहनांसाठी अतिरिक्त भाडे मोजावे लागत आहे.

विलास गावंडेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपावरून ६५ दिवस ओलांडून गेले आहेत. या काळात कर्मचारी वर्गही चिंतेत पडला आहे. महामंडळाने आर्थिक नाकेबंदी केल्याने त्यांचा उधार-उसणवार करून उदरनिर्वाह सुरू आहे. दुसरीकडे एसटी बसेस बंद असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. बस नसल्याने दुचाकीवरून महत्त्वाची कामे उरकावी लागत आहे. शिवाय, खासगी वाहनांसाठी अतिरिक्त भाडे मोजावे लागत आहे.

आतापर्यंत ३१५ निलंबित

संपात सहभागी झालेल्या यवतमाळ विभागातील ३१५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय १०६ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. ९८ जणांची बदली झाली आहे.

आता लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे

दोन महिन्यांपासून पगार नाही. आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आता लक्ष न्यायालयाकडे आहे. आम्हाला न्याय मिळेल.- गणेश शेंडगे, वाहक

आर्थिक परिस्थिती खूप खराब झाली आहे. उधार-उसणवार करून उदरनिर्वाह सुरू आहे. बसेस बंद असल्याने नागरिकांनाही त्रास होत आहे.- गीता श्रीवास, वाहक

एसटीनेच सुरक्षित प्रवास

एसटी बस नसल्याने दुचाकी व इतर साधनांद्वारे प्रवास करावा लागत आहे. एसटी बस सर्वसामान्य नागरिकांची गरज आहे. ती लवकर सुरू व्हावी.- दीपक रामटेके, प्रवासी

कार्यप्रसंगासाठी खासगी वाहनाने प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. बस सुरू झाल्यास एकट्यालाही प्रवास करणे सोयीचे जाते. - धीरज भोयर, प्रवासी

दिवसभरात २०४३ जणांचा एसटीने प्रवास- यवतमाळ विभागातील सात आगारामधून मंगळवारी एसटी बसेस सोडण्यात आल्या. या माध्यमातून २०४३ जणांनी प्रवास केला. - यवतमाळ विभागातील पुसद आणि उमरखेड या दोन आगारातून मंगळवारी एकही बसफेरी सुटली नाही. दारव्हा आगारातून केवळ एक बस यवतमाळकरीता सुटली.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप