शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
8
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
11
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
12
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
13
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
15
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
16
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
17
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
20
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश

दुरूस्ती कामे सोडून कर्मचारी वसुलीवर

By admin | Updated: June 27, 2017 01:28 IST

गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच वणीसह मारेगाव, झरी व पांढरकवडा या चार तालुक्यातील नागरिक विजेच्या समस्येनी हैराण आहेत.

मान्सूनपूर्व कामांना तिलांजली : वीज समस्यांनी चार तालुक्यातील नागरिक हैराणलोकमत न्यूज नेटवर्कवणी : गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच वणीसह मारेगाव, झरी व पांढरकवडा या चार तालुक्यातील नागरिक विजेच्या समस्येनी हैराण आहेत. वरिष्ठांकडून मिळालेल्या कारवाईच्या धसक्याने वीज कर्मचाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी वसुलीवर लक्ष केंद्रीत केल्याने मॉन्सूनपूर्व कामेच करण्यात न आल्याने पावसाळ्याच्या सुरूवातीपासूनच विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहेत. अजुनही ही समस्या सोडविण्यात वीज वितरण कंपनीला यश आले नाही. साधारणत: मे महिन्यात वीज वितरण कंपनीकडून पावसाळापूर्वीची कामे केली जातात. वीज वितरणासाठी अडथळा निर्माण करणाऱ्या त्रुटी दुरूस्त केल्या जातात. त्यात वीज तारांना स्पर्श करणारी झाडे तोडणे, तुटलेल्या तारांना बदलविणे, वाकलेले पोल बदलविणे आदी देखभाल दुरूस्तीची कामे केली जातात. ३१ मार्चपूर्वी वीज बिल वसुलीची कामे पूर्ण केली जातात. मात्र यंदा वीज वितरण कंपनीने आपल्या धोरणात बदल केला. ज्या काळात देखभाल दुरूस्तीची कामे करावयाची होती, त्या काळात वीज कर्मचाऱ्यांना वसुलीसाठी पिटाळण्यात आले. परिणामी ८५ टक्के वसुली झाली. वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा या चार तालुक्यांतील ग्राहकांकडे वीज वितरण कंपनीचे आठ करोड ३२ लाख रुपये थकीत होते. सारेच वीज कर्मचारी वसुलीच्या मागे लागल्याने सात करोड २५ लाख रुपये वसुल करण्यात वीज वितरण कंपनीला यश आले. तत्पूर्वी वीज वितरण कंपनीतील एका बड्या अधिकाऱ्याने ‘वसुली करून आणा अन्यथा कारवाईला सामोरे जा’ अशी धमकीच कर्मचाऱ्यांना दिली होती, असे सांगितले जाते. कारवाईच्या भितीने कर्मचारीही वसुलीच्या मागे लागलेत. यामुळे वीज ग्राहकांकडे थकीत असलेली रक्कम वसुल झाली खरी पण विजेची समस्या मात्र सुटली नाही. वसुलीच्या कामामुळे देखभाल दुरूस्तीच्या कामांना वेळच न मिळाल्याने यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीपासूनच वीज ग्राहकांना विजेच्या लपंडावाशी सामना करावा लागत आहे. थोडी जरी हवा आली तरी वीज गुल होते. वीज पुरवठा पुन्हा कधी सुरू होईल, याचाही नेम नसतो. ग्रामीण भागात ही समस्या वाढली आहे. यंदा पाऊस लवकर येईल, असे भाकीत हवामान खात्याने व्यक्त केले होते. मात्र जूनचा शेवटचा आठवडा सुरू झाल्यानंतरही समाधानकारक पाऊस न पडल्याने नागरिक उकाड्याशी सामना करीत होते. त्यात वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या मनस्तापात भर पडत आहे. केवळ ग्रामीण भागच नाही तर शहरी भागातही हीच समस्या आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शहरातील नागरिकही त्रस्त झाले आहेत. आता वीज कर्मचाऱ्यांना उसंत मिळाल्याने देखभाल दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र पावसात ही कामे करताना वीज कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.