शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

दुरूस्ती कामे सोडून कर्मचारी वसुलीवर

By admin | Updated: June 27, 2017 01:28 IST

गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच वणीसह मारेगाव, झरी व पांढरकवडा या चार तालुक्यातील नागरिक विजेच्या समस्येनी हैराण आहेत.

मान्सूनपूर्व कामांना तिलांजली : वीज समस्यांनी चार तालुक्यातील नागरिक हैराणलोकमत न्यूज नेटवर्कवणी : गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच वणीसह मारेगाव, झरी व पांढरकवडा या चार तालुक्यातील नागरिक विजेच्या समस्येनी हैराण आहेत. वरिष्ठांकडून मिळालेल्या कारवाईच्या धसक्याने वीज कर्मचाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी वसुलीवर लक्ष केंद्रीत केल्याने मॉन्सूनपूर्व कामेच करण्यात न आल्याने पावसाळ्याच्या सुरूवातीपासूनच विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहेत. अजुनही ही समस्या सोडविण्यात वीज वितरण कंपनीला यश आले नाही. साधारणत: मे महिन्यात वीज वितरण कंपनीकडून पावसाळापूर्वीची कामे केली जातात. वीज वितरणासाठी अडथळा निर्माण करणाऱ्या त्रुटी दुरूस्त केल्या जातात. त्यात वीज तारांना स्पर्श करणारी झाडे तोडणे, तुटलेल्या तारांना बदलविणे, वाकलेले पोल बदलविणे आदी देखभाल दुरूस्तीची कामे केली जातात. ३१ मार्चपूर्वी वीज बिल वसुलीची कामे पूर्ण केली जातात. मात्र यंदा वीज वितरण कंपनीने आपल्या धोरणात बदल केला. ज्या काळात देखभाल दुरूस्तीची कामे करावयाची होती, त्या काळात वीज कर्मचाऱ्यांना वसुलीसाठी पिटाळण्यात आले. परिणामी ८५ टक्के वसुली झाली. वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा या चार तालुक्यांतील ग्राहकांकडे वीज वितरण कंपनीचे आठ करोड ३२ लाख रुपये थकीत होते. सारेच वीज कर्मचारी वसुलीच्या मागे लागल्याने सात करोड २५ लाख रुपये वसुल करण्यात वीज वितरण कंपनीला यश आले. तत्पूर्वी वीज वितरण कंपनीतील एका बड्या अधिकाऱ्याने ‘वसुली करून आणा अन्यथा कारवाईला सामोरे जा’ अशी धमकीच कर्मचाऱ्यांना दिली होती, असे सांगितले जाते. कारवाईच्या भितीने कर्मचारीही वसुलीच्या मागे लागलेत. यामुळे वीज ग्राहकांकडे थकीत असलेली रक्कम वसुल झाली खरी पण विजेची समस्या मात्र सुटली नाही. वसुलीच्या कामामुळे देखभाल दुरूस्तीच्या कामांना वेळच न मिळाल्याने यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीपासूनच वीज ग्राहकांना विजेच्या लपंडावाशी सामना करावा लागत आहे. थोडी जरी हवा आली तरी वीज गुल होते. वीज पुरवठा पुन्हा कधी सुरू होईल, याचाही नेम नसतो. ग्रामीण भागात ही समस्या वाढली आहे. यंदा पाऊस लवकर येईल, असे भाकीत हवामान खात्याने व्यक्त केले होते. मात्र जूनचा शेवटचा आठवडा सुरू झाल्यानंतरही समाधानकारक पाऊस न पडल्याने नागरिक उकाड्याशी सामना करीत होते. त्यात वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या मनस्तापात भर पडत आहे. केवळ ग्रामीण भागच नाही तर शहरी भागातही हीच समस्या आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शहरातील नागरिकही त्रस्त झाले आहेत. आता वीज कर्मचाऱ्यांना उसंत मिळाल्याने देखभाल दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र पावसात ही कामे करताना वीज कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.