शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

३१ हजार उमेदवारांची शिक्षक पदाची पात्रता संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 12:57 IST

Yawatmal News तीन वर्षांपासून सुरू झालेली शिक्षक भरती प्रक्रिया अद्यापही पूर्णत्वास गेलेली नाही. तर दुसरीकडे राज्यातील ३१ हजार टीईटीधारक उमेदवारांची पात्रताच आता डिसेंबरमध्ये संपुष्टात येणार आहे.

ठळक मुद्देभरती मात्र तीन वर्षांपासून अर्धवट२०१३ मध्ये टीईटी पास झालेले प्रतीक्षेतअभियोग्यता धारकांचीही बोळवण

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तीन वर्षांपासून सुरू झालेली शिक्षक भरती प्रक्रिया अद्यापही पूर्णत्वास गेलेली नाही. तर दुसरीकडे राज्यातील ३१ हजार टीईटीधारक उमेदवारांची पात्रताच आता डिसेंबरमध्ये संपुष्टात येणार आहे.राज्यात शिक्षक भरतीसाठी २०१३ मध्ये पहिल्यांदा शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात आली. त्यावेळी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पात्रतेची ‘वैधता’ सात वर्षे राहील, असा निकष केंद्र शासनाने जाहीर केला. गेल्या सात वर्षात वेळोवेळी झालेल्या परीक्षेत एकूण ८६ हजार २९८ उमेदवार पात्र ठरले. तर पहिल्या वर्षी म्हणजे २०१३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या ३१ हजार ७२ विद्यार्थ्यांच्या पात्रतेची ‘वैधता’ डिसेंबर २०२० मध्ये संपुष्टात येणार आहे.

२०१३ नंतर राज्यात थेट २०१७ मध्येच शिक्षक भरतीला परवानगी मिळाली. तेव्हा अभियोग्यता चाचणीही बंधनकारक करण्यात आली. त्यात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक पदासाठी पावणे दोन लाख उमेदवारांनी परीक्षा दिली. परंतु, चक्क दोन वर्षानंतर म्हणजे आॅगस्ट २०१९ मध्ये उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले. त्यातही केवळ ५ हजार ८२२ उमेदवारांचीच पहिली यादी आली. त्यानंतर पुढील यादीची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे.आता २०१३ मध्ये टीईटी उत्तीर्ण झालेल्या ३१ हजार उमेदवारांची ‘वैधता’च संपणार असल्याने दुसºया यादीत त्यांचा समोवश होतो किंवा नाही, याबाबत सभ्रम निर्माण झाला आहे. तर कोरोनामुळे मे महिन्यापासून शिक्षक भरतीवर पुन्हा एकदा बंदी आणली गेली आहे.पवित्र पोर्टलद्वारे सुरू झालेली आणि अर्धवट असलेल्या शिक्षक भरतीला विशेष परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि वित्तमंत्र्यांकडे लेखी स्वरुपात केली आहे._ संतोष मगरअध्यक्ष, डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशन

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र