शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

३१ हजार उमेदवारांची शिक्षक पदाची पात्रता संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 12:57 IST

Yawatmal News तीन वर्षांपासून सुरू झालेली शिक्षक भरती प्रक्रिया अद्यापही पूर्णत्वास गेलेली नाही. तर दुसरीकडे राज्यातील ३१ हजार टीईटीधारक उमेदवारांची पात्रताच आता डिसेंबरमध्ये संपुष्टात येणार आहे.

ठळक मुद्देभरती मात्र तीन वर्षांपासून अर्धवट२०१३ मध्ये टीईटी पास झालेले प्रतीक्षेतअभियोग्यता धारकांचीही बोळवण

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तीन वर्षांपासून सुरू झालेली शिक्षक भरती प्रक्रिया अद्यापही पूर्णत्वास गेलेली नाही. तर दुसरीकडे राज्यातील ३१ हजार टीईटीधारक उमेदवारांची पात्रताच आता डिसेंबरमध्ये संपुष्टात येणार आहे.राज्यात शिक्षक भरतीसाठी २०१३ मध्ये पहिल्यांदा शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात आली. त्यावेळी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पात्रतेची ‘वैधता’ सात वर्षे राहील, असा निकष केंद्र शासनाने जाहीर केला. गेल्या सात वर्षात वेळोवेळी झालेल्या परीक्षेत एकूण ८६ हजार २९८ उमेदवार पात्र ठरले. तर पहिल्या वर्षी म्हणजे २०१३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या ३१ हजार ७२ विद्यार्थ्यांच्या पात्रतेची ‘वैधता’ डिसेंबर २०२० मध्ये संपुष्टात येणार आहे.

२०१३ नंतर राज्यात थेट २०१७ मध्येच शिक्षक भरतीला परवानगी मिळाली. तेव्हा अभियोग्यता चाचणीही बंधनकारक करण्यात आली. त्यात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक पदासाठी पावणे दोन लाख उमेदवारांनी परीक्षा दिली. परंतु, चक्क दोन वर्षानंतर म्हणजे आॅगस्ट २०१९ मध्ये उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले. त्यातही केवळ ५ हजार ८२२ उमेदवारांचीच पहिली यादी आली. त्यानंतर पुढील यादीची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे.आता २०१३ मध्ये टीईटी उत्तीर्ण झालेल्या ३१ हजार उमेदवारांची ‘वैधता’च संपणार असल्याने दुसºया यादीत त्यांचा समोवश होतो किंवा नाही, याबाबत सभ्रम निर्माण झाला आहे. तर कोरोनामुळे मे महिन्यापासून शिक्षक भरतीवर पुन्हा एकदा बंदी आणली गेली आहे.पवित्र पोर्टलद्वारे सुरू झालेली आणि अर्धवट असलेल्या शिक्षक भरतीला विशेष परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि वित्तमंत्र्यांकडे लेखी स्वरुपात केली आहे._ संतोष मगरअध्यक्ष, डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशन

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र