शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शिक्षक बदली धोरणाविरुद्ध एल्गार

By admin | Updated: June 18, 2017 00:55 IST

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांच्या नव्या धोरणात दुरुस्त्या करण्यात याव्या, अवघड गावांचे निकष निश्चित करावे,

जिल्हा परिषद : १४ संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांच्या नव्या धोरणात दुरुस्त्या करण्यात याव्या, अवघड गावांचे निकष निश्चित करावे, या प्रमुख मागणीसाठी विविध १४ संघटनांनी शनिवारी एल्गार पुकारला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या मोर्चात जिल्हाभरातील शिक्षकांनी सहभाग घेतला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चाला प्रारंभ झाला. जिल्हा परिषदेपासून मुख्य मार्गाने मोर्चा तिरंगा चौकात पोहोचला. तेथे मुख्य समन्वयक मधुकर काठोळे, राजूदास जाधव आदींनी मार्गदर्शन केले. त्यानंतर विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे मधुकर काठोळे, प्राथमिक शिक्षक समितीचे ज्ञानेश्वर नाकाडे, जिल्हा परिषद शिक्षक संघटनेचे राजूदास जाधव, इंडियन बहुजन टिचर्स असोसिएशनचे दिवाकर राऊत, शिक्षक सेनेचे रवींद्र कोल्हे, अ.भा.प्राथमिक शिक्षक संघाचे रमाकांत मोहरकर, शिक्षक परिषदेचे सतपाल सोवळे, पदवीधर व केंद्रप्रमुख सभेचे महेंद्र वेळूकर, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे कैलास राऊत, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे शरद घारोड, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे किरण मानकर, पुरोगामी शिक्षक संघटनेचे मनीष राठोड, प्राथमिक शिक्षक संघटनेचे गजानन मडावी, उर्दू शिक्षक संघटनेचे हयात खान आदींचा समावेश होता.