शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

अमृत योजनेच्या कामासाठी चक्क वीज चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 23:14 IST

‘अमृत’ योजनेतून होत असलेल्या कामांसाठी विजेची चोरी केली जात आहे. टाकीच्या बांधकामासाठी तारांवर आकोडे टाकून वीज घेण्यात येत आहे.

ठळक मुद्देपाण्याच्या टाकीचे बांधकाम : भरवस्तीत तारांवर आकोडे, महावितरण मेहेरबान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘अमृत’ योजनेतून होत असलेल्या कामांसाठी विजेची चोरी केली जात आहे. टाकीच्या बांधकामासाठी तारांवर आकोडे टाकून वीज घेण्यात येत आहे. लोहारा येथे दिवसाढवळ्या सुरू असलेला प्रकार पुढे आला आहे. आणखी किती ठिकाणी अशाच प्रकारे वीज चोरी होत आहे, याचा शोध घेण्याचे आव्हान विद्युत कंपनीपुढे आहे.बेंबळाचे पाणी आणून यवतमाळ शहराला २४ तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. ३०२ कोटींच्या ‘अमृत’ योजनेतून यासाठीची तयारी सुरू आहे. शहराच्या विविध भागात नवीन पाईपलाईन टाकली जात आहे. पाच ते सोळा लाख लिटरपर्यंतच्या टाक्या उभ्या केल्या जात आहे. मात्र या कामांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून घेण्यात आलेल्या नाही. बांधकामासाठीचा सर्वात महत्वाचा भाग असलेले पाणी घेण्यासाठीच्या सोयी नाममात्र आहे. यातूनच वीज चोरीसारखे प्रकार होत आहे.लोहारा मार्गावर असलेल्या वसंत गृहनिर्माण सोसायटी परिसरातील अंगणवाडी केंद्रामागे पाण्याची टाकी बांधली जात आहे. याच ठिकाणी मोठी विहीर आहे. त्यातील पाणी या कामासाठी घेण्यात येत आहे. तीन-चार दिवसांपासून काँक्रिटच्या कामाला हात लागला आहे. या कामांसाठी तारावर आकोडे टाकून वीज वापरली जात आहे. या भागात वस्ती आहे. नागरिकांची सतत वर्दळ सुरू असते. तरीही आकोडे टाकून वीज वापरण्यात येत आहे. टाकीचे बांधकाम बरेच महिने चालणार आहे. त्यासाठी पाणी आवश्यक आहे. काम पूर्ण होईपर्यंत चोरीचीच वीज वापरली जाईल काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सर्वच ठिकाणी बोंबाबोंबयोजनेच्या कामासाठी पाणी आवश्यक आहे, हे माहीत असतानाही कंत्राटदार कंपनीने कुठेही विजेचे मीटर घेतलेले नाही. खुद्द विद्युत कंपनीची ही माहिती आहे. पाणी टँकरने आणले तरी वर चढविण्यासाठी दाब आवश्यक आहे, हे सांगण्यासाठी कुण्या तज्ञाची गरज नाही. शहरात आठ ते नऊ टाक्यांच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी कंपनीने काय उपाययोजना केल्या, याचा शोध घेण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. शासकीय योजनेच्या कामासाठी वीज चोरीचा प्रकार अयोग्य आहे.अजय बेले, प्रभारी कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, यवतमाळ