शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
8
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
9
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
10
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
11
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
12
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
13
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
14
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
15
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
16
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
18
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
19
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
20
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?

एक कोटींची वसुली तरीही वीज संकट

By admin | Updated: October 5, 2014 23:12 IST

सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. अशा स्थितीतही वीज कंपनीने कृषी संजीवनीच्या माध्यमातून एक कोटी १४ लाख ७९ हजार रुपयांची थकबाकी वसूल केली.

यवतमाळ : सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. अशा स्थितीतही वीज कंपनीने कृषी संजीवनीच्या माध्यमातून एक कोटी १४ लाख ७९ हजार रुपयांची थकबाकी वसूल केली. दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील ८८ हजार शेतकऱ्यांना संकटाच्या खाईत लोटले आहे. या योजनेने वीज वितरणला ‘संजीवनी’ मिळाली असली तरी शेतकरी मात्र विजेअभावी मरणपंथाला लागल्याचे दिसत आहे.पावसाने दडी मारल्याने सध्या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांकडे सर्व साधन सामुग्री उपलब्ध असताना वीज पुरवठा मात्र सुरळीत होत नाही. अवघी दोन ते तीन तास वीज मिळत असल्याने ओलित करणे शक्य होत नाही. अनेक गावांमध्ये कमी दाबाचा वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे मोटारीही जळत आहे. अशा स्थितीत शेतकरी एकेक झाड वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र वीज वितरणला काहीही फरक पडत नाही. अशाही स्थितीत वीज वितरणने कृषी संजीवनीच्या माध्यमातून दोन हजार १२२ शेतकऱ्यांकडून एक कोटी १४ लाख ७९ हजार रुपयांची थकबाकी वसूल केल्याची माहिती पुढे आली आहे. कृषी संजीवनी योजनेंतर्गत थकबाकीदार ग्राहकांना व्याज आणि दंड माफ करण्यात आला. आणखी शेतकरी याकडे आकर्षित होतील, असा वीज वितरणचा अंदाज होता. मात्र गेल्या महिनाभरापासून विजेचे संकट आणखी तीव्र झाले आहे. पैसे भरूनही वीज मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. जिल्ह्यातील अनेक वीज केंद्रावर शेतकरी धावून जात आहे. यातून तोडफोडी सारखेही प्रकार घडले आहेत. मात्र त्यानंतरही वीज वितरण सुधारायचे नाव घेत नाही. दररोज वीज पुरवठा खंडित होत आहे. (शहर वार्ताहर)