शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

एक कोटींची वसुली तरीही वीज संकट

By admin | Updated: October 5, 2014 23:12 IST

सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. अशा स्थितीतही वीज कंपनीने कृषी संजीवनीच्या माध्यमातून एक कोटी १४ लाख ७९ हजार रुपयांची थकबाकी वसूल केली.

यवतमाळ : सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. अशा स्थितीतही वीज कंपनीने कृषी संजीवनीच्या माध्यमातून एक कोटी १४ लाख ७९ हजार रुपयांची थकबाकी वसूल केली. दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील ८८ हजार शेतकऱ्यांना संकटाच्या खाईत लोटले आहे. या योजनेने वीज वितरणला ‘संजीवनी’ मिळाली असली तरी शेतकरी मात्र विजेअभावी मरणपंथाला लागल्याचे दिसत आहे.पावसाने दडी मारल्याने सध्या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांकडे सर्व साधन सामुग्री उपलब्ध असताना वीज पुरवठा मात्र सुरळीत होत नाही. अवघी दोन ते तीन तास वीज मिळत असल्याने ओलित करणे शक्य होत नाही. अनेक गावांमध्ये कमी दाबाचा वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे मोटारीही जळत आहे. अशा स्थितीत शेतकरी एकेक झाड वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र वीज वितरणला काहीही फरक पडत नाही. अशाही स्थितीत वीज वितरणने कृषी संजीवनीच्या माध्यमातून दोन हजार १२२ शेतकऱ्यांकडून एक कोटी १४ लाख ७९ हजार रुपयांची थकबाकी वसूल केल्याची माहिती पुढे आली आहे. कृषी संजीवनी योजनेंतर्गत थकबाकीदार ग्राहकांना व्याज आणि दंड माफ करण्यात आला. आणखी शेतकरी याकडे आकर्षित होतील, असा वीज वितरणचा अंदाज होता. मात्र गेल्या महिनाभरापासून विजेचे संकट आणखी तीव्र झाले आहे. पैसे भरूनही वीज मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. जिल्ह्यातील अनेक वीज केंद्रावर शेतकरी धावून जात आहे. यातून तोडफोडी सारखेही प्रकार घडले आहेत. मात्र त्यानंतरही वीज वितरण सुधारायचे नाव घेत नाही. दररोज वीज पुरवठा खंडित होत आहे. (शहर वार्ताहर)