शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

कृषिजन्य वस्तूंपासून वीज

By admin | Updated: July 30, 2015 02:13 IST

टाकाऊ कृषीजन्य वस्तूंपासून विजनिर्मितीच्या हालचाली राज्यात सुरू झाल्या आहेत.

राज्याचा पुढाकार : खेड्यांतच उभारणार प्रकल्प, रोजगाराच्या संधी उपलब्ध होणारविवेक ठाकरे  दारव्हाटाकाऊ कृषीजन्य वस्तूंपासून विजनिर्मितीच्या हालचाली राज्यात सुरू झाल्या आहेत. अशा ऊर्जास्त्रोद्वारे वीजनर्मितीचे उद्दिष्ट केंद्रसरकारने जाहीर केल्यानंतर राज्याने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. असे प्रकल्प थेट ग्रामीण भागातच स्थापन होणार असल्याने खेड्यातील विजेच्या समस्या बऱ्याच अंशी सुटण्याची शक्यता आहे.राज्यातील पवन, सौर या इतर स्त्रोतांचा वीजनिर्मितीसाठी गांभीर्याने विचार सुरू झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितरीत्या धोरण आखून राज्यात पारेषण संलग्न विविध क्षमतेचे प्रकल्प स्थापन करण्याचे निश्चित केले आहे. पवनऊर्जेपासून पाच हजार मेगावॅट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प, उसाच्या चिपाडावर किंवा कृषी अवशेषांवर आधारित एक हजार मेगावॅट क्षमतेचा सहवीजनिर्मिती प्रकल्प, ४०० मेगावॅट क्षमतेचा लघूजलविद्युत प्रकल्प, कृषीजन्य अवशेषांवर आधारित ३०० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प, औद्योगिक टाकाऊ पदार्थांपासून २०० मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प आणि सौरऊर्जेपासून सात हजार ५०० मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याद्वारे एकूण १४ हजार ४०० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. हे प्रकल्प जलद विकसित होण्यासाठी केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय मंत्रालयाकडून महाउर्जा कार्यालयाकडून सहाय्य घेण्यात येणार आहे. शेतातील टाकाऊ कृषीजन्य अवशेषापासून अतिरिक्त वीजनिर्मिती होऊ शकते. अशा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळविता येऊ शकतो. शिवाय ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होऊ शकते. अशा प्रकल्पांना कायमस्वरुपी टाकाऊ कृषीजन्य अवशेष मिळत राहणेही तेवढेच आवश्यक आहे. त्यासाठी कृषीजन्य अवशेष संकलनक्षेत्र निधारित करणे गरजेचे असते. या धोरणांतर्गत कम्बशन व गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाद्वारे वीजनिर्मिती प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. यातून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती होऊन ग्रामीण भागातील अनेक प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे.