शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

कृषिजन्य वस्तूंपासून वीज

By admin | Updated: July 30, 2015 02:13 IST

टाकाऊ कृषीजन्य वस्तूंपासून विजनिर्मितीच्या हालचाली राज्यात सुरू झाल्या आहेत.

राज्याचा पुढाकार : खेड्यांतच उभारणार प्रकल्प, रोजगाराच्या संधी उपलब्ध होणारविवेक ठाकरे  दारव्हाटाकाऊ कृषीजन्य वस्तूंपासून विजनिर्मितीच्या हालचाली राज्यात सुरू झाल्या आहेत. अशा ऊर्जास्त्रोद्वारे वीजनर्मितीचे उद्दिष्ट केंद्रसरकारने जाहीर केल्यानंतर राज्याने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. असे प्रकल्प थेट ग्रामीण भागातच स्थापन होणार असल्याने खेड्यातील विजेच्या समस्या बऱ्याच अंशी सुटण्याची शक्यता आहे.राज्यातील पवन, सौर या इतर स्त्रोतांचा वीजनिर्मितीसाठी गांभीर्याने विचार सुरू झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितरीत्या धोरण आखून राज्यात पारेषण संलग्न विविध क्षमतेचे प्रकल्प स्थापन करण्याचे निश्चित केले आहे. पवनऊर्जेपासून पाच हजार मेगावॅट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प, उसाच्या चिपाडावर किंवा कृषी अवशेषांवर आधारित एक हजार मेगावॅट क्षमतेचा सहवीजनिर्मिती प्रकल्प, ४०० मेगावॅट क्षमतेचा लघूजलविद्युत प्रकल्प, कृषीजन्य अवशेषांवर आधारित ३०० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प, औद्योगिक टाकाऊ पदार्थांपासून २०० मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प आणि सौरऊर्जेपासून सात हजार ५०० मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याद्वारे एकूण १४ हजार ४०० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. हे प्रकल्प जलद विकसित होण्यासाठी केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय मंत्रालयाकडून महाउर्जा कार्यालयाकडून सहाय्य घेण्यात येणार आहे. शेतातील टाकाऊ कृषीजन्य अवशेषापासून अतिरिक्त वीजनिर्मिती होऊ शकते. अशा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळविता येऊ शकतो. शिवाय ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होऊ शकते. अशा प्रकल्पांना कायमस्वरुपी टाकाऊ कृषीजन्य अवशेष मिळत राहणेही तेवढेच आवश्यक आहे. त्यासाठी कृषीजन्य अवशेष संकलनक्षेत्र निधारित करणे गरजेचे असते. या धोरणांतर्गत कम्बशन व गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाद्वारे वीजनिर्मिती प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. यातून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती होऊन ग्रामीण भागातील अनेक प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे.