शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
5
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
6
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
7
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
8
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
9
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
10
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
11
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
12
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
13
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
14
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
15
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
16
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
17
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
18
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
19
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
20
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी

विजेचा अपव्यय

By admin | Updated: October 18, 2014 23:02 IST

नागरिकांना एकीकडे भारनियमन आणि अनियमित वीजपुरवठ्याला तोड द्यावे लागत आहे, तर दुसरीकडे दिवसाही सुरू राहणाऱ्या दिव्यामुळे विजेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.

दुर्लक्ष : नगरपरिषद व ग्रामपंचायतीही उदासीनयवतमाळ : नागरिकांना एकीकडे भारनियमन आणि अनियमित वीजपुरवठ्याला तोड द्यावे लागत आहे, तर दुसरीकडे दिवसाही सुरू राहणाऱ्या दिव्यामुळे विजेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. शासनाच्या वीज बचतीच्या आवाहनला विद्युत कंपनी, ग्रामपंचायती आणि नगर पालिकांकडूनच मूठमाती दिली जात आहे. यवतमाळ शहर आणि लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील पथदिवे दिवसाही सुरू राहतात. गेली कित्येक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. एखाद्या खांबावरील दिवा नादुरूस्त झाला तरच तो बंद असतो. याप्रकारात विजेचा अपव्यय होत आहे. शहराच्या काही भागात तासनतासाचे भारनियमन केले जाते. याशिवाय काही भागामध्ये विजेचा सातत्याने लपंडाव सुरू असतो. नागरिकांना नियमित विजेला मुकावे लागत असताना होणारा विजेचा अपव्यय संताप निर्माण करणार आहे. लोहारा ग्रामपंचायत क्षेत्रात येत असलेल्या अनेक भागातील पथदिवे कधीच बंद राहत नाही दिवसाही ते प्रकाश देतात. याप्रकाराविषयी संबंधित ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यानंतरही दखल घेतली जात नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींचे पदाधिकारी वीज बचतीविषयी किती दक्ष आहे, हे दिसून येते. यवतमाळ नगर परिषद क्षेत्रात येणाऱ्या काही भागातही हा प्रकार सुरू आहे. पथदिवे सतत सुरू राहण्याविषयीचा प्रश्न निकाली काढल्या जात नाही हा नागरिकांचा प्रश्न आहे. विजेचे अवास्तव येणारे बिल भरताना वीज ग्राहकांना नाकीनऊ येत आहे. सरासरी बिल पाचवीलाच पुजले आहे. आता नवीन मीटर लावण्याचे काम विद्युत कंपनीने हाती घेतले आहे. यातून वीज बिलांमध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा नागरिकांना आहे. लोहारा विद्युत कार्यालयांतर्गत येत असलेल्या भागांमध्ये दिवसाही पथदिवे सुरू राहण्याची समस्या मोठी आहे. शिवाय वीज चोरीही कमालीची वाढली आहे. वीज बचतीच्या शासनाच्या आवाहनाला या कार्यालयाकडून कुठलाही थारा नाही. त्यामुळे वरिष्ठांनी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. (वार्ताहर)