शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

विजेचा अपव्यय

By admin | Updated: October 18, 2014 23:02 IST

नागरिकांना एकीकडे भारनियमन आणि अनियमित वीजपुरवठ्याला तोड द्यावे लागत आहे, तर दुसरीकडे दिवसाही सुरू राहणाऱ्या दिव्यामुळे विजेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.

दुर्लक्ष : नगरपरिषद व ग्रामपंचायतीही उदासीनयवतमाळ : नागरिकांना एकीकडे भारनियमन आणि अनियमित वीजपुरवठ्याला तोड द्यावे लागत आहे, तर दुसरीकडे दिवसाही सुरू राहणाऱ्या दिव्यामुळे विजेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. शासनाच्या वीज बचतीच्या आवाहनला विद्युत कंपनी, ग्रामपंचायती आणि नगर पालिकांकडूनच मूठमाती दिली जात आहे. यवतमाळ शहर आणि लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील पथदिवे दिवसाही सुरू राहतात. गेली कित्येक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. एखाद्या खांबावरील दिवा नादुरूस्त झाला तरच तो बंद असतो. याप्रकारात विजेचा अपव्यय होत आहे. शहराच्या काही भागात तासनतासाचे भारनियमन केले जाते. याशिवाय काही भागामध्ये विजेचा सातत्याने लपंडाव सुरू असतो. नागरिकांना नियमित विजेला मुकावे लागत असताना होणारा विजेचा अपव्यय संताप निर्माण करणार आहे. लोहारा ग्रामपंचायत क्षेत्रात येत असलेल्या अनेक भागातील पथदिवे कधीच बंद राहत नाही दिवसाही ते प्रकाश देतात. याप्रकाराविषयी संबंधित ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यानंतरही दखल घेतली जात नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींचे पदाधिकारी वीज बचतीविषयी किती दक्ष आहे, हे दिसून येते. यवतमाळ नगर परिषद क्षेत्रात येणाऱ्या काही भागातही हा प्रकार सुरू आहे. पथदिवे सतत सुरू राहण्याविषयीचा प्रश्न निकाली काढल्या जात नाही हा नागरिकांचा प्रश्न आहे. विजेचे अवास्तव येणारे बिल भरताना वीज ग्राहकांना नाकीनऊ येत आहे. सरासरी बिल पाचवीलाच पुजले आहे. आता नवीन मीटर लावण्याचे काम विद्युत कंपनीने हाती घेतले आहे. यातून वीज बिलांमध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा नागरिकांना आहे. लोहारा विद्युत कार्यालयांतर्गत येत असलेल्या भागांमध्ये दिवसाही पथदिवे सुरू राहण्याची समस्या मोठी आहे. शिवाय वीज चोरीही कमालीची वाढली आहे. वीज बचतीच्या शासनाच्या आवाहनाला या कार्यालयाकडून कुठलाही थारा नाही. त्यामुळे वरिष्ठांनी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. (वार्ताहर)