शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

महागाव तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द

By admin | Updated: April 2, 2015 00:05 IST

तालुक्यातील पहिल्या टप्प्यात लागलेल्या ४२ ग्रामपंचायतींपैकी चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत.

नामांकन प्रक्रिया सुरू : ३८ ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी कायममहागाव : तालुक्यातील पहिल्या टप्प्यात लागलेल्या ४२ ग्रामपंचायतींपैकी चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत. पैकी ३८ ग्रामपंचायतींची रणधुमाळी मात्र कायम असून, त्यासाठी ३१ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत नामांकन दाखल करावयाचे आहेत. घोनसरा, कान्हा, सारखणी आणि कवठा या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींची मुदत आॅगस्टमध्ये संपत असून, त्या दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात असलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, ३१ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. ८ एप्रिल रोजी छाणणी, १० ला विड्रॉल आणि २२ ला मतदान देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचे सुरू झालेल्या ग्रामपंचायतमध्ये गावागावात बैठका सुरू झालेल्या असून, बहुतांश ठिकाणी सदस्य संख्या वाढलेली असून, वार्डाचे नव्याने गठन करण्यात आलेले असल्यामुळे हमखास आता मीच निवउून येतो असे कोणीही छाती ठोपणे सांगु शकत नाही. सारेच गावपुढारी संभ्रमात पडले आहेत. गावावर आपले किंवा आपल्या गटाचे वर्चस्व सिद्ध करणारी ही निवडणूक असल्यामुळे उमेदवाराची निवड करताना पॅनल प्रमुखाची चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतला मिळणाऱ्या विविध विकास फंडामुळे अतिशय महत्व प्राप्त झाले असून, सरपंच होण्यासाठी अनेक पुढारी आता पासूनच कंबर कसून बसले आहेत. पॅनल तयार करणे आणि तयार झालेल्या पॅनलसाठी कागदपत्राची जुळवाजुळव करणे यातच बरीच धांदल उडत असून, राखीव जागेसाठी काही ठिकाणी जात पडताळणी नसल्यामुळे उमेदवार मिळेनासे झाले आहे. तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींपैकी निम्म्या ग्रामपंचायतमध्ये पाणी टंचाईचे सावट असूनही निवडणुकीचा ज्वर चढल्यामुळे नागरिक आणि गाव पुढारी सारेच पाणीटंचाईचे चटके सहन करून गावागावात कॉर्नर बैठका घेण्यात मग्न झाले आहेत. तर जो कुणी पाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करण्याचे आश्वासन देर्ईल, त्यालाच निवडून देण्याचा निर्धार महिलांनी केला आहे. (शहर प्रतिनिधी)