शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

महागाव तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द

By admin | Updated: April 2, 2015 00:05 IST

तालुक्यातील पहिल्या टप्प्यात लागलेल्या ४२ ग्रामपंचायतींपैकी चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत.

नामांकन प्रक्रिया सुरू : ३८ ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी कायममहागाव : तालुक्यातील पहिल्या टप्प्यात लागलेल्या ४२ ग्रामपंचायतींपैकी चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत. पैकी ३८ ग्रामपंचायतींची रणधुमाळी मात्र कायम असून, त्यासाठी ३१ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत नामांकन दाखल करावयाचे आहेत. घोनसरा, कान्हा, सारखणी आणि कवठा या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींची मुदत आॅगस्टमध्ये संपत असून, त्या दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात असलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, ३१ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. ८ एप्रिल रोजी छाणणी, १० ला विड्रॉल आणि २२ ला मतदान देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचे सुरू झालेल्या ग्रामपंचायतमध्ये गावागावात बैठका सुरू झालेल्या असून, बहुतांश ठिकाणी सदस्य संख्या वाढलेली असून, वार्डाचे नव्याने गठन करण्यात आलेले असल्यामुळे हमखास आता मीच निवउून येतो असे कोणीही छाती ठोपणे सांगु शकत नाही. सारेच गावपुढारी संभ्रमात पडले आहेत. गावावर आपले किंवा आपल्या गटाचे वर्चस्व सिद्ध करणारी ही निवडणूक असल्यामुळे उमेदवाराची निवड करताना पॅनल प्रमुखाची चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतला मिळणाऱ्या विविध विकास फंडामुळे अतिशय महत्व प्राप्त झाले असून, सरपंच होण्यासाठी अनेक पुढारी आता पासूनच कंबर कसून बसले आहेत. पॅनल तयार करणे आणि तयार झालेल्या पॅनलसाठी कागदपत्राची जुळवाजुळव करणे यातच बरीच धांदल उडत असून, राखीव जागेसाठी काही ठिकाणी जात पडताळणी नसल्यामुळे उमेदवार मिळेनासे झाले आहे. तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींपैकी निम्म्या ग्रामपंचायतमध्ये पाणी टंचाईचे सावट असूनही निवडणुकीचा ज्वर चढल्यामुळे नागरिक आणि गाव पुढारी सारेच पाणीटंचाईचे चटके सहन करून गावागावात कॉर्नर बैठका घेण्यात मग्न झाले आहेत. तर जो कुणी पाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करण्याचे आश्वासन देर्ईल, त्यालाच निवडून देण्याचा निर्धार महिलांनी केला आहे. (शहर प्रतिनिधी)