शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

महागाव तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द

By admin | Updated: April 2, 2015 00:05 IST

तालुक्यातील पहिल्या टप्प्यात लागलेल्या ४२ ग्रामपंचायतींपैकी चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत.

नामांकन प्रक्रिया सुरू : ३८ ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी कायममहागाव : तालुक्यातील पहिल्या टप्प्यात लागलेल्या ४२ ग्रामपंचायतींपैकी चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत. पैकी ३८ ग्रामपंचायतींची रणधुमाळी मात्र कायम असून, त्यासाठी ३१ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत नामांकन दाखल करावयाचे आहेत. घोनसरा, कान्हा, सारखणी आणि कवठा या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींची मुदत आॅगस्टमध्ये संपत असून, त्या दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात असलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, ३१ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. ८ एप्रिल रोजी छाणणी, १० ला विड्रॉल आणि २२ ला मतदान देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचे सुरू झालेल्या ग्रामपंचायतमध्ये गावागावात बैठका सुरू झालेल्या असून, बहुतांश ठिकाणी सदस्य संख्या वाढलेली असून, वार्डाचे नव्याने गठन करण्यात आलेले असल्यामुळे हमखास आता मीच निवउून येतो असे कोणीही छाती ठोपणे सांगु शकत नाही. सारेच गावपुढारी संभ्रमात पडले आहेत. गावावर आपले किंवा आपल्या गटाचे वर्चस्व सिद्ध करणारी ही निवडणूक असल्यामुळे उमेदवाराची निवड करताना पॅनल प्रमुखाची चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतला मिळणाऱ्या विविध विकास फंडामुळे अतिशय महत्व प्राप्त झाले असून, सरपंच होण्यासाठी अनेक पुढारी आता पासूनच कंबर कसून बसले आहेत. पॅनल तयार करणे आणि तयार झालेल्या पॅनलसाठी कागदपत्राची जुळवाजुळव करणे यातच बरीच धांदल उडत असून, राखीव जागेसाठी काही ठिकाणी जात पडताळणी नसल्यामुळे उमेदवार मिळेनासे झाले आहे. तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींपैकी निम्म्या ग्रामपंचायतमध्ये पाणी टंचाईचे सावट असूनही निवडणुकीचा ज्वर चढल्यामुळे नागरिक आणि गाव पुढारी सारेच पाणीटंचाईचे चटके सहन करून गावागावात कॉर्नर बैठका घेण्यात मग्न झाले आहेत. तर जो कुणी पाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करण्याचे आश्वासन देर्ईल, त्यालाच निवडून देण्याचा निर्धार महिलांनी केला आहे. (शहर प्रतिनिधी)